शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात सादर करता येणार सुटीचे प्रमाणपत्र

By admin | Updated: April 3, 2017 03:03 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीचे नियम कडक केल्यामुळे ‘पीएचडी’ इच्छुकांचे धाबे दणाणले आहे.

नागपूर विद्यापीठ : संशोधनासाठी इच्छुक उमेदवारांना दिलासा देण्याबाबत अंतिम निर्णय नाही नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीचे नियम कडक केल्यामुळे ‘पीएचडी’ इच्छुकांचे धाबे दणाणले आहे. यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने संभ्रम दूर केला असला तरी नागपूर विद्यापीठाने तीन वर्षांच्या सुट्यांच्या अटीत दिलासा देण्याबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही. मात्र ‘पीएचडी’साठी नोंदणी करण्यासाठी अनिवार्य असलेली सर्व प्रमाणपत्रे वर्षभरात सादर करण्याची सूट विद्यापीठाने दिली आहे. त्यामुळे उमेदवारांना वेळ मिळाला असला तरी तीन वर्षांच्या सुटीची अट कधी रद्द होईल, हा प्रश्न मात्र त्यांच्यासमोर आहेच. विद्यापीठाच्या नवीन नियमांनसार ‘पीएचडी’साठी नोंदणी करायची असेल तर संबंधित उमेदवारांनी आस्थापनांच्या व्यवस्थापनांकडून तीन वर्ष रजेचे प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र एका महिन्याच्या आत सादर केले तरच नोंदणी शक्य होणार आहे, असे ‘आरआरसी’च्या निर्णयात नमूद करण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘पीएचडी’ ही नियमित पूर्णकालीन पदवी असल्याचे नियमांत नमूद केले आहे. पूर्णकालीन पदवी असताना उमेदवार इतर शिक्षण किंवा इतर ठिकाणी नोकरी कशी करू शकणार असा तर्क ठेवत विद्यापीठाने ही अट लावली होती. याबाबत आयोगाकडेदेखील अनेक तक्रारी गेल्या. यावर अखेर विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्टीकरण जारी केले. ‘पीएचडी’ पदवी ही नियमित असली तरी ती पूर्णकालीन किंवा अंशकालीन तत्त्वावर घेतली जाऊ शकते. केवळ ती विद्यापीठांच्या नियमांच्या मर्यादेत असावी. केवळ दूरस्थ शिक्षण पद्धतीतून घेतलेल्या ‘पीएचडी’ पदवीला मान्यता राहणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले. नागपूर विद्यापीठात अंशकालीन तत्त्वावरील ‘पीएचडी’संदर्भात कुठलेही नियम किंवा दिशानिर्देश अस्तित्वात नाहीत. त्यामुळे जून महिन्यापर्यंत हे दिशानिर्देश तयार करण्यात येतील व पुढील सत्रात त्यांची अंमलबजावणी होईल. मात्र तोपर्यंत यंदाच्या ‘आरआरसी’ने ज्यांचे ‘सिनॉप्सिस’ मंजूर केले आहेत, त्यांना लावण्यात आलेल्या तीन वर्षांच्या सुटीबाबत विद्यापीठाने अंतिम निर्णय घेतलेला नाही. हे प्रमाणपत्र वर्षभराच्या आत कधीही सादर करता येणार आहे. तशी नियमांत तरतूदच आहे. ज्या दिवशी उमेदवार हे प्रमाणपत्र सादर करतील, त्या दिवशीपासून त्यांच्या नोंदणीचा दिनांक ग्राह्य धरण्यात येईल, असे प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले. सुटीच्या अटीबाबत आम्ही सखोल विचार करून निर्णय घेऊ, असेदेखील त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)