शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

हरभऱ्याचे पीक मातीमाेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:23 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : अवकाळी पावसाने माैदा तालुक्यातील बोरगाव, सिंगोरी, चिरव्हा, मारोडी, कुराड, नवेगाव या परिसराला चांगलेच झाेडपले. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : अवकाळी पावसाने माैदा तालुक्यातील बोरगाव, सिंगोरी, चिरव्हा, मारोडी, कुराड, नवेगाव या परिसराला चांगलेच झाेडपले. सतत दाेन तास काेसळलेल्या पावसामुळे कापणीला आलेल्या हरभऱ्याचे पीक मातीमाेल झाले असून, गहू व मिरचीसह भाजीपाल्याच्या पिकांचे माेठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे खरीप पिके खराब झाल्यानंतर आता अवकाळी पावसामुळे रबी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या काेलमडले आहेत. त्यामुळे शासनाने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच चिंतामण रेवतकर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

माैदा तालुक्यात सर्वाधिक धानाचे पीक घेतले जाते. यावर्षी कापणीच्या वेळी पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांनी गंजी लावल्यानंतर धानाला अंकूर फुटले हाेते. त्याआधी धानावर माेठ्या प्रमाणात तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाल्याने धानाच्या उत्पादनात घट आली हाेती. शिवाय, फवारणीचा खर्च वाढल्याने धानाचा उत्पादनखर्च वाढला हाेता. या संकटातून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी हरभरा, गहू व मिरचीच्या पिकावर लक्ष्य केंद्रित केले हाेते.

हरभऱ्याचे पीक कापणीला तसेच गव्हाचे पीक पक्व हाेत असतानाच अवकाळी पावसामुळे या दाेन्ही पिकांसह मिरची, वांगी, टाेमॅटाे व इतर भाजीपाल्याच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हाताताेंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेल्याने तसेच शेतकरी त्यांचा संपूर्ण खर्च शेतमालाच्या विक्रीतून करीत असल्याने शासनाने नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने सर्वेक्षण करावे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच चिंतामन मदनकर, बाेरगावचे माजी सरपंच सूर्यकांत ढाेबळे यांच्यासह इतर गावांमधील सरपंच व नागरिकांनी केली आहे.

...

पीकविम्याच्या परताव्याची प्रतीक्षा

तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी त्यांच्या खरीप व रबी पिकांचा विमा उतरविला आहे. त्यासाठी त्यांनी विमा कंपनीला हप्त्याची रक्कमही अदा केली आहे. खरीप हंगामात धानाच्या पिकाचे तुडतुडे व अतिवृष्टीमुळे माेठे नुकसान हाेऊनही विमा कंपनीने शेतकऱ्यांना परतावा (नुकसान भरपाई)पाेटी एक रुपयाही दिला नाही. आता अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांपनी पाहणी करून परतावा द्यावा, अशी मागणीही पीकविमाधारक शेतकऱ्यांनी केली आहे.

...

नुकसान भरपाईची मागणी

अवकाळी पावसामुळे हरभऱ्यासह रबी तसेच भाजीपाल्याच्या पिकांचे माेठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले असून, शासनाने नुकसान भरपाई जाहीर करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य शालिनी देशमुख यांनी केली आहे. यावर्षी उत्पादनखर्च वाढल्याने धानाच्या पिकात शेतकऱ्यांना आर्थक नुकसान सहन करावे लागले. त्यामुहे त्यांची सर्व भिस्त रबी व भाजीपाल्याच्या पिकांवर हाेती. पावसामुळे ती पिकेही संपल्यागत झाल्याने शासनाने शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी पदाधिकारी राजेंद्र लांडे यांनी केली आहे.