शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

स्टॉक मर्यादेमुळे धान्य बाजार बंद होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:07 IST

नागपूर : केंद्र सरकारने डाळींवर पुन्हा स्टॉक मर्यादा लावल्याने आणि आयात पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिल्याने धान्य व्यापाऱ्यांमध्ये रोष ...

नागपूर : केंद्र सरकारने डाळींवर पुन्हा स्टॉक मर्यादा लावल्याने आणि आयात पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिल्याने धान्य व्यापाऱ्यांमध्ये रोष आहे. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनाही अडचणी येणार आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. या निर्णयामुळे धान्य बाजार बंद होण्याची शक्यता असून, त्याची सुरुवात अमरावती धान्य बाजारापासून झाली आहे.

या संदर्भात होलसेल ग्रेन अ‍ॅण्ड सीड्स मर्चंट्स असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी म्हणाले, पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर सरकारने सर्व व्यापाऱ्यांसाठी डाळींची आयात सुरू केली, तर २ जुलैला परिपत्रक काढून डाळींच्या साठवणुकीवर तत्काळ स्टॉक मर्यादा लागू करण्याची घोषणा केली. या घोषणेनुसार होलसेल व्यापारी २०० टन अर्थात दोन हजार क्विंटल डाळींचा स्टॉक ठेवू शकेल. त्यात केवळ एक हजार क्विंटल डाळींचे प्रकार ठेवता येईल. चिल्लर परवान्यासाठी पाच टन अर्थात ५० क्विंटल डाळींची मर्यादा निर्धारित केली आहे. दाल मिलर्सला ही मर्यादा तीन महिन्यांचे उत्पादन वा वार्षिक क्षमतेच्या २५ टक्के, यापैकी जी जास्त राहील ती असणार आहे. धान्यासाठी कोणतीही मर्यादा राहणार नाही.

शेतकरी अडचणीत येणार

मोटवानी म्हणाले, या निर्णयामुळे व्यापारी मर्यादित स्टॉक ठेवतील. पण, शेतकऱ्यांच्या उत्पादनाची विक्री न झाल्याने त्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे ते अडचणीत येतील. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे भाव आकाशाला भिडले असून, त्याकडे सरकार लक्ष देत नाही. दुसरीकडे साठेबाजी थांबविण्यासाठी स्टॉक मर्यादा लागू केली आहे. आयात खुला केल्याने व्यापारी आणि शेतकऱ्यांवर दुहेरी संकट येणार आहे. याच कारणांनी अमरावती धान्य बाजारात काम बंद आहे. लवकरच नागपूरसह राज्यातील अन्य बाजारपेठाही बंद होण्याची शक्यता आहे.