शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगार चालविताहेत टोळी

By admin | Updated: January 4, 2016 05:09 IST

उपराजधानीतील गुन्हेगार हप्ता वसुली आणि जमीन हडपण्यासाठी कंपनी चालवित आहेत. अजय राऊत आणि त्याच्या धर्तीवर

मोकळे फिरताहेत आरोपी : पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हजगदीश जोशी ल्ल नागपूरउपराजधानीतील गुन्हेगार हप्ता वसुली आणि जमीन हडपण्यासाठी कंपनी चालवित आहेत. अजय राऊत आणि त्याच्या धर्तीवर अपहरण केलेली दुसरी घटना याची साक्ष देत आहे. गुन्हेगारी तत्त्व ज्या पद्धतीने धुमाकूळ घालत आहेत त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. परिस्थिती एवढी बिघडली आहे की, गुन्हेगार तुरुंगातून सुटल्याबरोबर टोळी तयार करीत आहेत. पोलीसही अनेक दिवसांपासून या परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहे. परंतु त्याचा निपटारा करण्यासाठी कोणतीच उपाययोजना करताना दिसत नाहीत.हप्ता वसुलीसाठी व्यापारी, बिल्डर, सट्टेबाजांचे अपहरण करणे ही गुन्हेगारांची जुनीच पद्धत आहे. त्याची सुुरुवात खूप आधी इतवारीमधून झाली. एका वर्षापूर्वी इतवारीच्या एका गारमेंट व्यापाऱ्याचे पाचपावली येथील एका जुगार अड्ड्यावरून अपहरण करून लाखो रुपयांची खंडणी घेतली होती. खंडणी दिल्यानंतर या व्यापाऱ्याने पोलिसात तक्रार दिली नव्हती. ‘लोकमत’मध्ये बातमी प्रकाशित झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून गुन्हेगारांना पकडले. अजय राऊतचे अपहरण करणारी टोळी अनेक दिवसांपासून नागपुरात सक्रिय आहे. आरोपी मोंटी, सागिर, पिंटु शिर्के हत्याकांडात तसेच अंबाझरी एनआरआय महिलेची जमीन हडपण्याच्या प्रकरणात गुंतलेले आहेत. गुन्हेगारी जगतावर अंकुश ठेऊन आपला वचक निर्माण करण्याचे काम ते करीत आहेत. त्याच धर्तीवर त्यांनी ‘सॉफ्ट टार्गेट’ निवडण्याचे काम सुरू केले. सूत्रांनुसार चार महिन्यात अनेक गुन्हेगारांनी नागरिकांचे अपहरण करून कोट्यवधी रुपयांची कमाई केली. अपहरण केलेल्या अजय राऊत शिवाय इतवारीचा गारमेंट व्यापारी, कामठी मार्ग आणि महालचा सट्टेबाज, बिल्डर यांचा समावेश आहे. गुन्हेगारांना अजय राऊत यांच्या धर्तीवर सर्व जणांची माहिती होती. त्यामुळे ते अपहरण करण्यात यशस्वी झाले. त्यांनी दोन महिन्यात ५ कोटीची वसुली केली. सर्वाधिक खंडणी अजय राऊतपासून घेतली. अजयला दिवसाढवळ्या प्रतापनगरातून उचलून नेले. या घटनेला अनेकांनी पाहिले त्यामुळे पोलिसांना त्याबाबत माहिती मिळाली. त्यामुळे आरोपींचे कृत्य समोर आले. उपराजधानीत मकोकासारख्या गंभीर प्रकरणातील आरोपी तुरुंगातून सुटत आहेत. ३१ डिसेंबरला हेमंत दियेवार हत्याकांड आणि मकोकाच्या आरोपींची सुटका झाली. दियेवार हत्याकांडातील आरोपींची अनेक दिवसांपासून चर्चा होती. या प्रकरणात इतवारीच्या टोळीने महत्त्वाची भूमिका बजावली. अजय राऊत प्रकरण चर्चेत आल्यानंतर ही टोळी पुन्हा कामाला लागली. हप्ता वसुली विरोधक पथकाचे गठन ४मोंटी हत्याकांड आणि अंबाझरी एनआरआय महिलेची जमीन बळकावणाऱ्या आरोपींनी मनीषनगरात कार्यालय उघडले आहे. येथूनच गुन्हेगारी कारवायांचे संचालन करण्यात येते. नुकत्याच सुमित ठाकूर आणि पिंटु शिर्के हत्याकांडातील दोषींना सोडून सर्व गुन्हेगार शहरात आहेत. त्यांच्यात वर्चस्वावरून नेहमीच भांडण होते. अशा परिस्थितीत पोलिसांसाठी पुढील दिवस डोकेदुखीचे ठरू शकतात. हप्ता वसुली थांबविण्यासाठी गुन्हे शाखेत हप्ता विरोधी पथकाचे गठन करण्यात आले आहे. अजय राऊत प्रकरणात लोकमतने पूर्वीच अनेक लोकांचे अपहरण करून हप्ता वसुली केल्याचा खुलासा केला होता. पोलिसांच्या तपासातही त्याची पुष्टी होत आहे. अशा स्थितीत हप्ता वसुली विरोधी पथकाने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना गुन्हेगारांच्या हालचालीची माहिती मिळू नये हे आश्चर्यजनक आहे. अजय राऊत प्रकरणात एक गँग आणि मोंटी हत्याकांडातील आरोपी संशयाच्या भोवऱ्यात आहेत. या आरोपींचे तुरुंगात एका कबाडी व्यावसायिकाशी संबंध होते. कबाडी व्यावसायिकाने तुरुंगात राहून एका जमिनीचा पत्नीच्या नावाने सौदा केला होता. या दिशेने तपास केल्यास कबाडी व्यावसायिकाला तुरुंगाआड जावे लागू शकते.सोशल मीडियाचा प्रभाव ४गुन्हेगार सोशल मीडियाचा चांगलाच फायदा घेत आहेत. व्हाट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून ते तरुणांना आकर्षित करीत आहेत. या गुन्हेगारांचे फेसबुक अकाऊंट पाहिल्यानंतर कुणालाही आश्चर्य वाटेल. हे फेसबुक अकाऊंट अपडेट होत राहते.जमिनीचीही सुपारी४हप्ता वसुलीसोबतच जमिनीवर ताबा मिळविण्यासाठी गुन्हेगार महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. नुकतेच त्यांनी रामनगर चौकातील एक अपार्टमेंट खाली करवून घेतले. एका महिला भाडेकरूला आरोपींनी एकुलत्या एका मुलासोबत अप्रिय घटना घडवून आणण्याची धमकी दिली. त्यामुळे महिलेने घर खाली करून देण्याचा निर्णय घेतला. या अपार्टमेंटची किंमत कोट्यवधी रुपयांची आहे.