शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

‘अ’मराठीत फसली मराठीची सक्ती

By admin | Updated: March 8, 2016 03:03 IST

आॅटोचालकांना परवान्यासाठी बंधनकारक करण्यात आलेला मराठी सक्तीचा वाद उच्च न्यायालयात पोहोचला आहे. पण अकृषी

जितेंद्र ढवळे ल्ल नागपूरआॅटोचालकांना परवान्यासाठी बंधनकारक करण्यात आलेला मराठी सक्तीचा वाद उच्च न्यायालयात पोहोचला आहे. पण अकृषी विद्यापीठातील विविध विद्याशाखातील मराठीची सक्ती ‘अ’मराठीत (बहुभाषेत) फसली आहे. विद्यापीठातील सर्व विद्याशाखांना मराठी विषय अनिवार्य करण्यासंदर्भात कार्यवाही करावी, असे पत्र राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कुलसचिवांना पाठविले आहे. मात्र अभियांत्रिकी, विधी, विज्ञान आणि औषधीशास्त्र शाखेला मराठीची सक्ती कशी करावी, असा यक्षप्रश्न अभ्यास मंडळांना पडला आहे. मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी, नवीन पिढीत लेखन, वाचन, विचार कौशल्य आणि व्यावहारिक मराठी भाषा कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यातील सर्व प्रकारच्या विद्यापीठातील किमान पदवीच्या प्रथम वर्षाकरिता मराठी विषय अनिवार्य करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे एन.व्ही. शिंदे यांनी राज्य सरकारकडे केली होती. यासंदर्भात शिंदे यांनी कुलपती (राज्यपाल) कार्यालयाकडे पाठपुरावाही केला होता. यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अकृषी विद्यापीठांना विविध विद्याशाखेतील अभ्यासक्रमात मराठी विषय अनिवार्य करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत. शिंदे यांच्या पत्रानुसार अभियांत्रिकी, वैद्यकीय, पॉलिटेक्निक, पारंपरिक-व्यावसायिक महाविद्यालयात मराठी विषय अनिवार्य करण्यात यावा, असे म्हटले आहे. यासोबतच बी.कॉम. भाग-१ साठी बहुतांश विद्यापीठात मराठी विषय अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र त्याची अंमलबजावाणी होत नाही, असे वास्तवही शिंदे यांनी सरकारपुढे मांडले आहे. ‘मराठी भाषा उपयोजन आणि संस्कार’ या शीर्षकांतर्गत मराठी विषयाची अभ्यासपत्रिका असावी, अशी त्यांची मागणी असल्याने अकृषी विद्यापीठांनी या पत्राची दखल घेत विविध विद्याशाखांच्या अभ्यास मंडळाकडे हा विषय वर्ग केला आहे. मात्र अभियांत्रिकी, विधी, विज्ञान आणि औषधीशास्त्र या शाखांतून केवळ मराठी भाषिक विद्यार्थी शिक्षण घेत नसून अमराठी विद्यार्थ्यांना मराठी विषय कसा अनिवार्य करावा, असा नवा पेच निर्माण झाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांतील अभ्यास मंडळाची बैठक अलीकडेच झाली. तीत केवळ ‘नोटेड’ अशी भूमिका घेत अभ्यास मंडळांनी हा विषय फाईलबंद केला. तो फाईलबंदच राहील की केवळ मराठी भाषा दिवस आला की मराठीची आठवण होईल, यावर निश्चितच मंथन करावे लागणार आहे. इच्छाशक्ती तिथे मार्गमराठी भाषा विषय अनिवार्य करण्यासाठी विद्यार्थ्यांचे माध्यम हा महत्त्वाचा घटक नाही. मुळात मराठी भाषेतील प्रेरक आणि संस्कारयुक्त साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा भाषा कौशल्य विकास होऊ शकतो. शेवटी इच्छाशक्ती असेल तिथे मार्गही निघतो, असे मत एन.व्ही. शिंदे यांनी या विषयावर व्यक्त केले.बार कौन्सिल आॅफ इंडियाने विधी विद्या शाखेसाठी इंग्रजी माध्यम निश्चित केले आहे. कनिष्ठ न्यायालयाचे कामकाज मराठीतून चालते. गोंडवाना विद्यापीठात विधी शाखेत मराठी विषय लागू केला होता. तो मर्यादित स्वरूपात होता. या विद्याशाखांतील विद्यार्थ्यांना मराठी भाषेतून पेपर सोडविण्याची मुभा आधीच देण्यात आली आहे. पण मराठी भाषा विषय अनिवार्य करणे कठीणच आहे.- अंजली हस्तक, माजी अधिष्ठाता, विधी विद्याशाखा