शहरं
Join us  
Trending Stories
1
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
2
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
3
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
4
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
5
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
6
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
7
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
8
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
9
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
10
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
11
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
12
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
13
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
14
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
15
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
16
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
17
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
18
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
19
कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
Ola Electric ची मोठी घोषणा; करणार २ हजार कोटींची गुंतवणूक, काय आहे कंपनीचा प्लॅन? 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांचा शेतमाल आता थेट ग्राहकांपर्यंत

By admin | Updated: May 16, 2014 00:09 IST

शेतकर्‍यांच्या शेतातील भाजीपाला, फळे या नाशवंत उत्पादनाला दलालांच्या मध्यस्थीमुळे योग्य दर मिळत नाही. यामुळे नाशवंत उत्पादनांची विक्री शेतकर्‍यांनी थेट खुल्या बाजारात करण्याची ...

प्रक्रिया प्रारंभ : फळे व भाजीपाला विक्रीतील दलाल होणार बाद

प्रफुल्ल लुंगे - सेलू (वर्धा)

शेतकर्‍यांच्या शेतातील भाजीपाला, फळे या नाशवंत उत्पादनाला दलालांच्या मध्यस्थीमुळे योग्य दर मिळत नाही. यामुळे नाशवंत उत्पादनांची विक्री शेतकर्‍यांनी थेट खुल्या बाजारात करण्याची प्रक्रिया राज्य शासनाने प्रस्तावित केली आहे.

शेतकर्‍यांनी पिकविलेल्या शेतमालाला गोदामांची व शीतगृहांची कमतरता असल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या लक्षात आले. शेतकर्‍यांचा शेतमाल थेट बाजारपेठेत नेता यावा, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात (एपीएमसी अँक्ट) बदल करण्याचा विचार केंद्रीय अर्थमंत्रालय करीत आहे. यासाठी निश्‍चित आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. यामध्ये फळे व भाज्या हा नाशवंत शेतमाल उत्पादक शेतकर्‍याला थेट बाजारात विकता यावा, दलालांची मध्यस्थी कमी करणे शक्य व्हावे, असा सरकारचा प्रयत्न आहे.

अतवृष्टी, अल्पवृष्टी, अवकाळी पाऊस अशा विविध कारणांनी फळे व भाज्यांचे मोठे नुकसान होऊन शेतकर्‍याला आर्थिक फटका बसतो. हे नुकसान टाळण्यासाठी शेतकर्‍याला आपला शेतमाल थेट बाजारात नेऊ देणे त्याच्या हिताचे असल्याचे शासनाचे मत आहे. यामुळे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात तसा बदल करण्याचा निर्णय घेवून दलाल हटविण्याबाबत विचार केला आहे.