शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात मास्क न वापरणाऱ्या ३६२१९ जणांनी भरला १ .६५ कोटींचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना प्रतिबंधासाठी गेल्यावर्षी २१ मार्चपासून उपायोजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. मास्क न वापरणाऱ्यांवर मनपाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना प्रतिबंधासाठी गेल्यावर्षी २१ मार्चपासून उपायोजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. मास्क न वापरणाऱ्यांवर मनपाच्या उपद्रव शोध पथकामार्फत कारवाई केली जात आहे. सुरुवातीला मास्क न वापरणाऱ्यांवर २०० रुपये दंड आकारला जात होता. परंतु त्यानंतरही संख्या कमी झाली नाही. घराबाहेर पडताना सर्वांनी मास्क वापरावा यासाठी मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रुपये दंड करण्यात आला. पथकामार्फत दररोज कारवाई केली जात आहे. त्यानंतरही अनेकजण मास्क वापरत नसल्याचे नागपूर शहरातील चित्र आहे. वर्षभरात पथकांनी ३६ हजार २९७ लोकांकडून १ कोटी ६५ लाख ७ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे.

...

२०० रुपये दंडानुसार ५७७० जणांवर कारवाई

मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोना संक्रमणाला सुरुवात झाली. त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विना मास्क फिरणाऱ्यांना २०० रुपये दंड आकारण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला. त्यानुसार ५ हजार ७७० लोकांकडून १० लाख ९४ हजारांचा दंड वसुल करण्यात आला.

....

५०० रुपये प्रमाणे ३६२२१ लोकांवर कारवाई

मनपाच्या उपद्रव शोध पथकांनी विनामास्क फिरणाऱ्या ३० हजार ८२७ लोकांकडून १ कोटी ५४ लाख १३ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे.

पथकामार्फत मनपाच्या सर्व झोनमध्ये दररोज कारवाई केली जात आहे.

....

५९ मंगल कार्यालयांना ८.५९ लाखांचा दंड

मंगल कार्यालय, लॉन येथील लग्न समारंभ व कार्यक्रमांत मर्यादेपेक्षा अधिक लोकांची व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५९ मंगल कार्यालय व लॉनवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ८ लाख ५९ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

...

१ जानेवारी ते २० मार्च दरम्यान १० हजार जणांवर कारवाई

शहरात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर एनडीएस पथकाने मास्क न वापऱ्यांच्या विरोधातील कारवाईला अधिक गती दिली. १ जानेवारी ते २० मार्च या कालावधीत १० हजार २७७ लोकांकडून ५१ लाख् ३८ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

...

कारवाईला गती देण्याचे निर्देश

शहरात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशानुसार मनपाच्या एनडीएस पथकातर्फे विना मास्क फिरणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाते. आजवर ३६ हजारांहून अधिक लोकांवर कारवाई करून १ कोटी ६५ लाखाहून अधिक दंड वसूल करण्यात आला. कारवाई मागे दंड वसूल करण्याचा हेतू नसून कोरोना संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांनी कोविड-१९ नियमांचे पालन करावे अशी अपेक्षा आहे.

वीरसेन तांबे, एनडीएस पथक प्रमुख मनपा