शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्याची चिंता नाही

By admin | Updated: June 28, 2014 02:36 IST

जून संपत आला तरी मृगाचा पाऊस बरसला नाही. त्यामुळे राज्यभर जलसंकट निर्माण झाल्याचे चित्र आहे. असे असले तरी नागपूरकरांना आताच चिंता करण्याची गरज नाही.

नागपूर : जून संपत आला तरी मृगाचा पाऊस बरसला नाही. त्यामुळे राज्यभर जलसंकट निर्माण झाल्याचे चित्र आहे. असे असले तरी नागपूरकरांना आताच चिंता करण्याची गरज नाही. नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह व नवेगाव खैरी या दोन्ही जलाशयात मुबलक जलसाठा उपलब्ध आहे. या दोन्ही जलाशयांमध्ये जवळपास चार महिने पुरेल एवढा साठा आहे. त्यामुळे नागपुरात सध्यातरी कुठल्याही प्रकारची पाणीकपात होण्याची शक्यता नाही, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही बाब नागपूरकरांना दिलासा देणारी आहे. तोतलाडोह जलाशयातून नवेगाव खैरी जलाशयात पाणी सोडले जाते. तेथून पाणी कन्हान येथे आणले जाते. कन्हानमध्ये पंपिंग करून पाणी गोरेवाडा तलावात पोहचविले जाते. तेथून राजभवन टाकीला पुरवठा करून शहरात सर्वत्र वितरित केले जाते. तोतलाडोह येथे ४६६ दलघमी म्हणजे क्षमतेच्या ४५ टक्के जलसाठा आहे. नवेगाव खैरीमध्ये १६३ दलघमी म्हणजे ९१ टक्के जलसाठा आहे. नागपूर शहराला दररोज ६५० दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. पाणी पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी महापौर अनिल सोले यांनी बैठक घेतली. तीत उपमहापौर जैतूनबी अंसारी, आ. सुधाकरराव देशमुख, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, आयुक्त श्याम वर्धने, सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, जलप्रदाय समितीचे अध्यक्ष सुधाकर कोहळे, रमेश शिंगारे उपस्थित होते. बैठकीनंतर सुधाकर कोहळे यांनी सांगितले की, गोरेवाडा तलावातील जलस्तर कमी होण्यासाठी आरेंजसिटी वॉटर वर्क (ओसीडब्ल्यू) महादुला येथे अनियमित वीज पुरवठा होत असल्याचे कारण देत आहे. वास्तविकता गोरेवाडा तलावाच्या गेटमध्ये कचरा फसल्यामुळे पाणीपुरवठ्यात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. संबंधित प्रकरणी महापौरांनी ओसीडब्ल्यूच्या कर्मचाऱ्यांना फटकारल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)