शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

टाकळीतील टोलनाक्याविरुद्धची याचिका खारीज

By admin | Updated: June 11, 2015 02:44 IST

नागपूर-बैतूल रोडवरील पाटणसावंगी येथून टाकळी येथे स्थानांतरित करण्यात आलेल्या टोलनाक्याविरुद्धची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ...

नागपूर : नागपूर-बैतूल रोडवरील पाटणसावंगी येथून टाकळी येथे स्थानांतरित करण्यात आलेल्या टोलनाक्याविरुद्धची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यापक जनहित व गुणवत्ता नसल्याचा निष्कर्ष नोंदवून फेटाळून लावली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांनी बुधवारी हा निर्णय दिला. विनोदकुमार जैन व इतर चौघांनी ही याचिका दाखल केली होती. टाकळी गाव नागपूरपासून केवळ २५ किलोमीटर अंतरावर आहे. नियमानुसार नागपूरपासून ५० किलोमीटर अंतरावर टोलनाका उभारता येत नाही. ३० आॅगस्ट २०१० रोजी रोडचे बीओटी तत्त्वावर चौपदरीकरण करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ओरिएंटल नागपूर-बैतूल हायवे कंपनी यांच्यात करार झाला आहे. या महामार्गावर मुलताई व बैतूल बायपास येथे आधीच टोल नाके आहेत. तसेच, टाकळी येथे टोलनाका उभारण्याचा निर्णय घेताना राष्ट्रीय महामार्ग कायदा-१९५६ व राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दर निश्चित करणे व वसुली) नियम-२००८ मधील तरतुदींचे उल्लंघन झाले असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. महेश धात्रक तर, प्राधिकरणतर्फे अ‍ॅड. अनिश कठाणे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)