शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
4
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
5
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
6
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
7
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
8
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
9
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
10
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
11
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
12
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
13
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
14
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
15
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
16
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
17
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
18
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
19
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
20
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

अंबाझरी तलावात तरंगताे आहे मृत माशांचा खच ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:07 IST

नागपूर : अंबाझरी तलावातील माशांचा मृत्यू अचानक वाढला आहे. माेठ्या संख्येने माशांचा खच तलावातील पाण्यावर तरंगताना दिसताे आहे. त्यामुळे ...

नागपूर : अंबाझरी तलावातील माशांचा मृत्यू अचानक वाढला आहे. माेठ्या संख्येने माशांचा खच तलावातील पाण्यावर तरंगताना दिसताे आहे. त्यामुळे आश्चर्य आणि चिंताही व्यक्त केली जात आहे. मात्र या माशांचा अचानक मृत्यू का हाेत आहे, याबाबत महापालिका किंवा कुठल्याही जबाबदार यंत्रणेचे लक्ष गेलेले दिसत नाही.

बुधवारी अचानक मृत माशांचा खच तलावाच्या पाण्यावर ठिकठिकणी तरंगताना आढळून आला. अचानक मासे का मरताहेत, हा प्रश्न निर्माण हाेत आहे. ग्रीन व्हिजिलचे संस्थापक काैस्तुभ चटर्जी यांनी तलावात घडणाऱ्या घडामाेडींवर प्रकाश टाकला व मासे मरण्याच्या काही शक्यता नाेंदविल्या.

- नागपुरातील बहुतेक तलावांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण घटलेले आहे. शहरातील तलावात कृत्रितपणे ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी फवारे किंवा कुठलीच यंत्रणा नाही. ऑक्सिजन कमी झाल्याने मासे व इतर जलचर प्राण्यांना अडचण येते.

- थंड पाण्यात डिसाॅल्व‌ड ऑक्सिजनचे प्रमाण अधिक असते. मात्र उन्हाळ्यात तापमान वाढल्याने पाण्याचेही तापमान वाढते आणि उष्ण पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण घटते. माशांच्या मृत्यूचे हेही एक कारण असण्याची शक्यता चटर्जी यांनी व्यक्त केली.

- दिवसा सूर्यप्रकाशाच्या मदतीने तलावातील वनस्पती ऑक्सिजन तयार करतात. त्याचा फायदा माशांना हाेताे. मात्र रात्री फाेटाेसिन्थेसिसची प्रक्रिया बंद हाेते व ऑक्सिजन निर्मितीही थांबते. दुसरीकडे जलकुंभीसारख्या परावलंबी वनस्पती माेठ्या प्रमाणात ऑक्सिजन ग्रहण करीत असल्याने माशांना ते पुरेसा प्रमाणात मिळत नाही.

- उन्हाळ्यातील उष्णतेमुळे तलावाच्या पाण्याचा वरचा स्तर गरम हाेताे. त्याखालचा कमी थंड तर आणखी खालचा थर अधिक थंड असताे. तळातील ऑक्सिजन घटल्याने मासे त्यासाठी वरच्या थरापर्यंत येतात आणि उष्ण पाणी सहन न झाल्याने त्यांचा मृत्यू हाेण्याची शक्यता असते.

- मासेमारी हेही एक कारण असू शकते. मासेमार अधिक मासे मिळावे म्हणून तलावात मासे व खाद्य टाकतात. यामुळे माशांची संख्या क्षमतेपेक्षा वाढते. त्यामुळे खाद्यपदार्थ व ऑक्सिजनसाठी माशांमध्ये संघर्ष वाढताे व त्यात कमजाेर माशांचा मृत्यू हाेताे. मासे मृत्यूचे हेही एक कारण असू शकते.

- तलावामध्ये कुठूनतरी प्रदूषित पाणी प्रवाहित हाेण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. एमआयडीसीकडून हे प्रदूषित व विषारी पाणी येण्याची शक्यता आहे. प्रदूषित पाण्यामुळे मासे मृत्यू हाेण्याचीही शक्यता असू शकते.

अंबाझरी तलावात मासे का मरताहेत यावर सर्वेक्षण हाेण्याची गरज आहे. माशांचे पाेस्टमार्टम केल्यानंतरच उष्णतेमुळे, ऑक्सिजन कमतरतेमुळे की प्रदूषणामुळे मासे मरताहेत, याबाबत खुलासा हाेऊ शकेल. मात्र सध्यातरी ही गंभीर घटना म्हणावी लागेल.

- काैस्तुभ चटर्जी, ग्रीन व्हिजिल