शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कॉ़ पानसरेंचा झंझावात आजही वैदर्भीयांच्या स्मरणात

By admin | Updated: February 22, 2015 02:29 IST

अख्खे आयुष्य समाज परिवर्तनाचा वसा घेऊन जगलेल्या कॉम्रेड गोविंद पानसरे नावाच्या वादळाचा झंझावात अवघ्या महाराष्ट्राप्रमाणे नागपूर-विदर्भानेही अनुभवला़ पुरोगामी

कॉ़ बाळ अलोणी अख्खे आयुष्य समाज परिवर्तनाचा वसा घेऊन जगलेल्या कॉम्रेड गोविंद पानसरे नावाच्या वादळाचा झंझावात अवघ्या महाराष्ट्राप्रमाणे नागपूर-विदर्भानेही अनुभवला़ पुरोगामी चळवळीशी निगडीत असलेल्या सर्व संस्था, कार्यकर्ते यांच्याशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता़ आज त्यांच्या मृत्यूनंतर या सर्व आठवणी एकामागून एक माझ्या डोळयासमोरून तरळत आहेत़ माझी व पानसरेंची ओळख १९७४ साली पक्षाच्या पहिल्या राज्य परिषदेत सोलापुरात झाली़ त्यावेळी शिवाजी महाराजांबद्दल होणाऱ्या चर्चेत शिवाजी आमचा की तुमचा, असा वाद होत होता़ तेव्हा कॉ़ पानसरे यांनी ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक लिहिले़ त्याच्या सुमारे एक लक्ष प्रती विकल्या गेल्या़या प्रक्रियेत मीसुद्धा सहभागी होतो़ आम्ही याच विषयावर धनवटे रंगमंदिरात एक व्याख्यानमाला आयोजित केली़ कॉ़ भाई बर्धन अध्यक्ष होते़ या व्याख्यानमालेला आम्ही केवळ दोन रुपये तिकीट ठेवले होते़ मला आजही लख्ख आठवतेय धनवटे रंगमंदिरात पाय ठेवायलाही जागा नव्हती़ नागपुरातील जवळ-जवळ सर्वच वृत्तपत्रांनी या कार्यक्रमाला भरघोस प्रसिद्धी दिली होती़ १९९९ साली अमरावती येथे झालेल्या पक्षाच्या राज्य परिषदेत कॉ़ पानसरेंचा महत्त्वाचा वाटा होता़