शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
3
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
5
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
6
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
7
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
8
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
9
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
10
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
11
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
12
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
13
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
14
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
15
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
16
भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
17
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
18
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
19
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
20
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
Daily Top 2Weekly Top 5

मानवी संवेदना व्यक्त करणारा ‘संविधान काव्य जागर’

By admin | Updated: December 5, 2014 00:41 IST

संविधान हे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क देणारे आणि त्याला समान पातळीवर दर्जा देणारे आहे. संविधानाने प्रत्येक नागरिक सारखाच मानला. त्यात गरिबी, श्रीमंतीचा भेद नाही

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
नागपूर : संविधान हे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क देणारे आणि त्याला समान पातळीवर दर्जा देणारे आहे. संविधानाने प्रत्येक नागरिक सारखाच मानला. त्यात गरिबी, श्रीमंतीचा भेद नाही आणि जातीपातीही नाहीत. यात केंद्रस्थानी आहे तो केवळ माणूसच. पण अद्यापही माणसाला त्याचे अधिकार मिळविण्यासाठी धडपडावे लागते. आपल्या देशात भेदभावाचे लोण अद्यापही कायम आहे. संविधानाचे संपूर्ण पालन झाले तर हा देश माणुसकीने बहरलेला असेल. पण संविधान योग्य पद्धतीने पाळल्या जात नसल्याने वेगवेगळ्या पातळ्यांवर माणसाचे जगणे वेदनादायी झाल्याची खंत व्यक्त करीत मानवी संवेदना व्यक्त करणाऱ्या संविधान काव्य जागरने आज रसिकांच्या ह्रदयाला हात घातला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे २६ नोव्हेंबर हा संविधान दिन केवळ दिन म्हणून न पाळता संविधान सप्ताह म्हणून पाळण्यात आला. या अंतर्गत विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभागाच्यावतीने संविधान काव्य जागर या काव्यसंध्येचे आयोजन दीक्षांत सभागृहात करण्यात आले. या काव्यसंध्येच्या अध्यक्षस्थानी भाऊ पंचभाई होते. याप्रसंगी कुलगुरु डॉ. विनायक देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मराठी विभागाचे डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी कार्यक्रमामागील भूमिका विशद केली. काव्यसंमेलनाचा प्रारंभ कवयित्री मनिषा साधू यांनी एका गझलने केला. समाजातील विषमतेचे दु:ख त्यांनी त्यांच्या कवितेतून व्यक्त करताना संविधान म्हणजे आई या भूमिकेतून त्यांनी काही ओळींनी भाष्य केले. यानंतर तीर्थराज कापगते यांनी ‘नवी गीता’आणि ‘युद्ध’ या कविता सादर केल्या. पण संविधानाच्या पालनातून निकोप समाजाचा आशावादही त्यांनी मांडला. ह्रदय चक्रधर यांनी संविधानाचे महत्त्व कवितेतून व्यक्त केले. सुनिता झाडे निसर्ग आणि निसर्गनियमांच्या माध्यमातून मानवी संवेदनांचा पट उलगडला. उल्हास मनोहर यांनी समाजाच्या दुटप्पीपणाची खंत व्यक्त करताना काही प्रश्न निर्माण केले. सुमती वानखेडे आजच्या एकूणच स्थितीवर मार्मिक भाष्य केले. वसंत वाहोकर व्यवस्थेच्या इतक्या भ्रष्टतेत गुलाब कसा फुलेल, असा प्रश्न करताना अशा स्थितीत कविताच येत नाही, असे मत मांडले. भाग्यश्री पेटकर यांनी स्त्रीच्या हळुवार भावनांचा पट व्यक्त केला. इ. मो. नारनवरे यांनी ‘काल आम्ही साहिला तो केवढा अंधार होता, केवढा रस्त्यावरी उन्माद अन अंगार होता’ अशी ओळींनी कविता गेय स्वरूपात सादर केली.
या कार्यक्रमाचे संचालन मनिषा रिठे यांनी केले. संचालनात काही भावस्पर्शी ओळींनी त्यांनी कार्यक्रमाचा समा बांधला. याप्रसंगी भाऊ पंचभाई यांनी कवितांच्या सादरीकरणातून संविधान मानवी जगण्याला किती पूरक आहे, त्याची मांडणी केली. (प्रतिनिधी)