शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शरीराला केवळ ३० टक्केच आहाराची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:09 IST

नागपूर : माणसाला शरीर सुदृढ ठेवण्यासाठी केवळ ३० टक्के आहाराची गरज असते. पण अनेक जण दिवसातून चार ते सहा ...

नागपूर : माणसाला शरीर सुदृढ ठेवण्यासाठी केवळ ३० टक्के आहाराची गरज असते. पण अनेक जण दिवसातून चार ते सहा वेळा खातात. या अतिरिक्त आहारामुळे लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग, कोलेस्टेरॉलसारख्या रोगांना आमंत्रण मिळत आहे, असे मत प्रसिद्ध न्यूरॉलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी व्यक्त केले.

इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीतर्फे ‘राष्ट्रीय मेंदू सप्ताह’ आयोजित

करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. चर्चासत्राच्या सहाव्या दिवशी मनोविकारतज्ज्ञ डॉ. सुधीर भावे यांनी डॉ. मेश्राम यांची मुलाखत घेतली. ‘डाएट फॉर डिसीज प्रिव्हेंशन अ‍ॅण्ड वेट कंट्रोल’ हा विषय होता. ‘आयएएन’चे प्रेसिडेंट इलेक्टडॉ. निर्मल सूर्या यावेळी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी चंदीगढचे डॉ. मनीष मोदी आणि जयपूरच्या डॉ. भावना शर्मा होत्या.

मेंदूशी संबंधित आजारांवर उपचार करताना डॉ. मेश्राम यांनी आहारशास्त्राचाही अभ्यास केला आणि त्याचा रुग्णांना लाभ करून दिला आहे. माणसाने शरीराला आवश्यक असेल तितकेच खाल्ले पाहिजे. एका जेवणानंतर दुसरे जेवण भूक लागल्यानंतरच केले पाहिजे. दोन जेवणांमध्ये किमान आठ तासांचे अंतर असले पाहिजे. मधल्या काळात पाण्याव्यतिरिक्त इतर कोणतेही पदार्थ खाणे टाळले पाहिजे, अशी माहिती त्यांनी दिली.

-रात्रीचे जेवण व सकाळच्या नाश्त्यात १२ तासांचे अंतर

रात्रीच्या जेवणानंतर सकाळच्या पहिल्या न्याहारीपर्यंत किमान १२ ते १४ तासांचे अंतर असले पाहिजे. उपवासाची प्राचीन परंपरा दैनंदिन जीवनात स्वीकारली तर सुदृढ आरोग्य राखता येईल, असेही ते म्हणाले. तरुण पिढी पाश्चात्य आहाराला प्राधान्य देत आहे. त्यांच्यामध्ये मद्यपान, धूम्रपानाचे प्रमाण वाढले. झोपेच्या सवयी, व्यायाम न करणे यामुळे तरुणांमध्ये आहारासंदभार्तील आजारांचे प्रमाण वाढले असल्याचे डॉ. मेश्राम म्हणाले. त्यांनी कीटकनाशक विरहित हिरवा भाजीपाला, फळे, घाणीचे तेल, शुद्ध तूप आदींचा आहारात अधिक प्रमाणात वापर करण्याचा सल्लाही दिला.

‘मोबाईल ब्रेन क्लिनिक’ विषयावर डॉ. बिंदू मेनन (नेल्लोर) यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, मोबाईल क्लिनिकच्या माध्यमातून ग्रामीण भागात जाऊन रुग्णांची तपासणी करणे, लसीकरण करणे, छोट्या-छोट्या आजारांवर उपचार करणे आदी उपक्रम राबविले जातात.