शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

चार वाजता बार बंद, मात्र रस्त्यावर भरतात मधुशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 11:18 AM

Nagpur News सरकारने कोरोनामुळे दारूची दुकाने व बीअरबारला ४ वाजतानंतर बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सायंकाळी पिणाऱ्यांचे अड्डे आता शहरातील रस्ते व मोकळे मैदाने झाली आहेत.

 

मंगेश व्यवहारे, विशाल महाकाळकर 

लोकमत न्यूज नेटवर्क  

नागपूर : शहरातील रस्ते, मोकळे मैदान, ओसाड पडलेली उद्याने, निर्जन स्थळांवर सायंकाळी चारचौघे एकत्र येऊन मधुशाळा भरविण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सरकारने कोरोनामुळे दारूची दुकाने व बीअरबारला ४ वाजतानंतर बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सायंकाळी पिणाऱ्यांचे अड्डे आता शहरातील रस्ते व मोकळे मैदाने झाली आहेत.

शहरामध्ये प्रशासनाने ४ वाजताचा अलर्ट दिला आहे. ४ नंतर शहरातील व्यापारी पेठा व गल्लीबोळीतील दुकाने बंद होत आहे. दाररूच्या दुकानांच्या बीअरबारच्या बाबतीत हाच नियम आहे. शहरात बीअरबारची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बारमध्ये दारू पिणारे शौकीनही मोठ्या संख्येने आहेत. दुपारच्या तुलनेत सायंकाळी दारू पिणाऱ्यांची संख्या मोठी असते. पण पिण्यासाठी जागाच नसल्याने शौकिनांनी रस्ते, मोकळे मैदान, उद्यान, निर्जन स्थळांना दारूचे अड्डे बनविले आहे. दुपारीच पार्सल घेऊन सायंकाळी त्यांच्या मैफली भरताहेत. या प्रकारामुळे सामाजिक वातावरण दूषित होत आहे. वाढलेल्या या प्रकारांना आळा घालण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.

- टीव्ही टॉवर चौक

सेमिनरी हिल्स परिसरातील टीव्ही टॉवर चौकात चार वाजतानंतर सर्व दुकाने बंद होतात. त्यामुळे वाहतूकही कमी असते. याचाच फायदा घेऊन परिसरातील युवक, असामाजिक तत्त्वे दुपारीच दारूचे पार्सल घेऊन संध्याकाळी दारूचा अड्डा भरवितात. वर्दळ कमी असल्याने रस्त्यावरच मधुशाळा भरलेली असते.

- फुटाळा परिसर

फुटाळा परिसरातील किरकोळ विक्रेते, पानठेले दुपारी ४ वाजतानंतर बंद होतात. परिसरात पोलिसांची गस्तही असते. पण पिणारे चांगलीच शक्कल लढवितात. बंद असलेल्या पानठेल्यात साहित्य ठेवतात. तरुण मंडळी तेथून दूर उभे राहून गप्पा करीत असतात. एक एक जण पानठेल्याजवळ जातो. दारू पिली की पुन्हा गप्पांमध्ये सहभागी होतो. हा प्रकार ना पोलिसांच्या लक्षात येत ना येणाऱ्या जाणाऱ्यांच्या.

- कॉटन मार्केट चौक

कॉटन मार्केट चौक व परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे. या परिसरात मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात असतो. ४ नंतर दारूची दुकाने बंद असल्याने ही मंडळी पूर्वीच सोय करून ठेवतात. दिवसभरातील कामे आटोपल्यानंतर घरी जाण्यापूर्वी चौकातील एका आडोशाच्या ठिकाणी मधुशाळा भरवितात. कुणाची रोकटोक नसल्याने हा प्रकार बिनधास्तपणे सुरू आहे.

- कोण वाद घालणार यांच्याशी

गेल्या काही महिन्यांपासून सायंकाळी शहरातील अनेक ठिकाणी उघड्यावर दारू रिचविली जाते. पिणारे दारू पितात, दारूच्या पाण्याच्या बॉटल तेथेच सोडून जातात. जास्त दारू चढली की शिवीगाळ सुरू होते. कधीकधी गप्पा रात्री उशिरापर्यंत रंगतात. सामान्यजन हे सर्व प्रकार बघून त्यांच्याकडे पाठ दाखवून निघून जातात. तक्रार केली किंवा त्यांना हटकले तर उगाच भानगडी म्हणून दुर्लक्ष करतात.

पुरुषोत्तम राऊत, नागरिक

- तक्रार आली तर कारवाई करू

मुळात दारू पिणाऱ्यांच्या बाबतीत तक्रारी नागरिकांकडून येत नाही. पोलिसांची गस्त नियमित असते. गस्तीमध्ये दारू पिणारे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होते. नागरीकांनी तक्रारी केल्यास पोलीस त्याचा त्वरीत बंदोबस्त करेल, असे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीliquor banदारूबंदी