शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

ऑगस्टमध्ये आलेल्या पुराच्या नुकसानीची पाहणी सुरू ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक दाखल झाले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक दाखल झाले आहे. गुरुवारी नागपूर जिल्ह्यातील कामठी, पाारशिवनी व मौदा या तालुक्यातील साोनेगाव राजा, निलज व सिंगारदीप या गावांना भेट दिली. यावेळी कृषी, पायाभूत सुविधा, वीज व अन्य नुकसानीची पाहणी केली. यावेळी पथकाने शेतकऱ्यांशी चर्चाही केली. दरम्यान, ऑगस्टमध्ये आलेल्या पुराची पाहणी आता डिसेंबरमध्ये होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी रोषही व्यक्त केला.

केंद्रातून आलेल्या पथकाची दोन गटात विभागणी झाली असून यातील एका पथकाने नागपूर जिल्ह्याची गुरुवारी पाहणी केली. केंद्रीय कृषी मंत्रालयाचे संचालक आर.पी. सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही पााहणी करण्यात आली. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व जि.प. चे सीईओ योगेश कुंभेजकर प्रामुख्याने उपस्थित होते. या पथकाने कामठी तालुक्यातील सोनेगाव राजा या कन्हान नदीच्या काठावरील गावांची पाहणी केली. गेल्या दोन महिन्यात शासनाकडून झाालेली प्राथमिक मदत, सर्वेक्षण, पूरग्रस्तांची मागणी याबाबतची माहिती जाणून घेतली. याचवेळी पारशिवनी तालुक्यातील सालई माहुली येथे पेंच नदीवरील पुलाच्या नुकसानीची पाहणी केंद्रीय रस्ते व दळणवळण आणि महामार्ग मंत्रालयाचे मुख्य अभियंता तुषार व्यास यांनी पाहणी केली. पारशिवनीचे तहसीलदार वरुणकुमार सहारे, कार्यकारी अभियंता विशेष प्रकल्प नागपूर मिलिंद बांधवकर, सहायक अभियंता सुनील दमाहे, शाखा अभियंता ए.एस. महाजन यांच्यासह मंडळ अधिकारी राजेश घुडे, तलाठी विश्वजित पुरामकर पाहणी पथकात होते. २०१८ मध्ये पूर्ण झाले होते......... मध्य प्रदेशातील चौराई धरणातून २९ ऑगस्ट राेजी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहात पुलाचा काही भाग कोसळला आहे. दुसरे एक पथक गडचिरोलीची पाहणी करीत आहे.

बॉक्स

शुक्रवारी चंद्रपूर, भंडाऱ्याची पाहणी

केंद्रीय पथक उद्या शुक्रवारी चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीची पाहणी करेल. यानंतर शनिवारी २६ डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात यासंदर्भात बैठक होईल.

बॉक्स

जिल्ह्यातील ६१ गावांना बसला होता फटका

ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. नागपूर जिल्ह्यातील पाच ताालुक्यातील ६१ गावे बाधित झाली होती. तर जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यातील ९०,८५८ नागरिक यामुळे बाधित झाले होते. २२,९९४ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले होते.