शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

सावधान... अन्यथा दिल्लीप्रमाणे दूषित हाेईल नागपूरची हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 11:13 IST

नागपूरमध्ये पीएम-२.५चा स्तर ४३.२ एमजीसीएम आहे. या हिशेबाने शहरातील हवेची गुणवत्ता धाेक्याच्या वरच आहे. त्यामुळे प्रदूषण थांबविण्यासाठी आताच उपाययाेजना करणे आवश्यक आहे, अन्यथा स्थिती भयावह होऊ शकते.

ठळक मुद्देलाॅकडाऊन संपताच प्रदूषणात वाढ एअर क्वाॅलिटी इंडेक्स १५० पार

लोकमत एक्सक्लुसिव्ह

शाहनवाज आलम

नागपूर : शहरामध्ये हवेचे प्रदूषण वेगाने वाढत आहे. लाॅकडाऊन उघडल्यानंतर प्रदूषणाच्या स्तरात सातत्याने वाढ हाेत आहे. रस्त्यावर धावणारी जुनी वाहने व साेबत उद्याेग कारखान्यांमधून निघणाऱ्या धुराने शहराची हवा प्रदूषित केली आहे. या कारणाने हवेच्या गुणवत्तेचा स्तर (एअर क्वाॅलिटी इंडेक्स-एक्यूआय) दरराेज दीडशे पार जात आहे.

रविवारी १५२ एक्यूआयची नाेंद झाली. दिवाळीनंतर प्रदूषणात आणखी भर झाली आहे. सध्या दिल्लीत प्रदूषणामुळे लाॅकडाऊन लागण्याची स्थिती आली आहे. नागपुरातही सतर्कता पाळली नाही तर दिल्लीप्रमाणे येथेही श्वास घेणे कठीण हाेईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

तज्ज्ञांच्या मते डब्ल्यूएचओनुसार वातावरणात पीएम-२.५चा स्तर २५ मायक्राेग्रॅम घनमीटर (एमजीसीएम) असे तर हवा स्वच्छ मानली जाईल. मात्र नागपूरमध्ये पीएम-२.५चा स्तर ४३.२ एमजीसीएम आहे. या हिशेबाने शहरातील हवेची गुणवत्ता धाेक्याच्या वरच आहे. त्यामुळे प्रदूषण थांबविण्यासाठी आताच उपाययाेजना करणे आवश्यक आहे. अन्यथा स्थिती भयावह हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सातत्याने हाेत आहे वाढ

नागपुरात वायुप्रदूषणात सातत्याने वाढ नाेंदविली जात आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार शनिवारी हवेमध्ये पीएम-२.५चा स्तर ३६.०८ एमजीसीएम व पीएम-१० चा स्तर ९६.३ एमजीसीएम हाेता. दुसरीकडे एक्यूआय १२ नाेव्हेंबरला १३७, १३ नाेव्हेंबरला १५३ तर १४ नाेव्हेंबर राेजी १५२ एक्यूआयची नाेंद करण्यात आली.

महाराष्ट्रातील टाॅप-१० प्रदूषित शहरे (सर्व आकडे एमजीसीएममध्ये)

१. मुंबई : १०७

२. मुंबई उपनगर : ९१

३. रायगड : ५८

४. ठाणे : ५१

५. नागपूर : ४३

६. गोंदिया जिल्हा : ४३

७. भंडारा : ३९

८. नंदुरबार : ३७

९. वर्धा : ३७

१०. नांदेड : ३६

वाढू शकताे अनेक आजारांचा धाेका

पीएम-२.५ हवेत राहणारा अतिसूक्ष्म कण हाेय. त्याचा व्यास २.५ मायक्राेमीटरपेक्षा कमी असताे. हा स्तर अधिक वाढल्यास धुके वाढतात. समाेरचे दिसायलाही कठीण जाते. हे धूलिकण सूक्ष्म आकाराचे असल्याने श्वसनावाटे शरीरामध्ये जाऊन फुप्फुस, यकृतावर परिणाम करतात. यामुळे खाेकला, ताप आदी आजारांसह अस्थमा आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धाेकाही वाढताे. पीएम-२.५ लहान मुले व ज्येष्ठांसाठी अधिक धाेकादायक आहे. यामुळे डाेळे, गळा व फुफ्फुसाचा त्रास वाढताे. दुसरीकडे पीएम-१०चा स्तर सरासरी १०० एमजीसीएम असायला हवा. यापेक्षा अधिक वाढल्यास धाेकादायक मानला जाताे.

टॅग्स :environmentपर्यावरणpollutionप्रदूषणair pollutionवायू प्रदूषण