शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
3
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
4
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
5
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
6
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
7
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
8
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
9
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
10
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
11
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
12
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
13
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
14
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
15
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
16
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
17
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
18
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
19
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
20
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
Daily Top 2Weekly Top 5

शरद जोशींचे आंदोलन म्हणजे विरोधाभासच

By admin | Updated: November 25, 2014 00:54 IST

शेतकऱ्यांशी संबंधित निरनिराळ्या मागण्यांसाठी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाची घोषणा केली आहे. परंतु आजपर्यंत ज्या शासनाचा सातत्याने विरोध केला

विजय जावंधिया यांची टीका : विदर्भ गौरव पुरस्काराने झाला सन्मान
नागपूर : शेतकऱ्यांशी संबंधित निरनिराळ्या मागण्यांसाठी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाची घोषणा केली आहे. परंतु आजपर्यंत ज्या शासनाचा सातत्याने विरोध केला त्यांच्याकडेच मागणी करायला जाणे हा विरोधाभासाचाच प्रकार आहे या शब्दांत विजय जावंधिया यांनी शरद जोशींवर जोरदार हल्लाबोल केला. कृषी विकास प्रतिष्ठानतर्फे स्व.माणिकलालजी गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणाऱ्या विदर्भ गौरव पुरस्काराने जावंधिया यांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रभाषा संकुल येथील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान जावंधिया यांनी मतप्रदर्शन केले.
देशातील शेतकऱ्यांच्या गरिबीचे कारण या व्यवस्थेतच आहे. ही बाब लक्षात आल्यामुळेच मी व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी आंदोलनात उतरलो. परंतु शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या हक्कापेक्षा स्वत:च्या स्वार्थाला जास्त प्राधान्य दिले. कार्यकर्ते जीव तोडून मेहनत करत होते आणि जोशी यांनीच नेहमी सर्व श्रेय लाटले. कार्यकर्त्यांच्या क्षमतांना वाव देण्यात जोशी अपयशी ठरले असे जावंधिया म्हणाले. उणे सबसिडीचे गणित शेतकऱ्यांच्याच अंगावर उलटले. शेतकऱ्यांच्या गरिबीचे कारण या व्यवस्थेत आहे. त्यामुळेच व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी आंदोलनात पडलो. पण अजूनही उत्तर काही सापडले नाही अशी खंतदेखील त्यांनी व्यक्त केली. विदर्भ गौरव पुरस्कार वितरणप्रसंगी माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, माजी खासदार दत्ता मेघे, माजी वनमंत्री नानाभाऊ एम्बडवार, माजी मंत्री रमेश बंग, कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी, कार्याध्यक्ष श्रीराम काळे, उपाध्यक्ष सोमेश्वर पुसदकर, सचिव बंडोपंत उमरकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. शाल, श्रीफळ व २५ हजार रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरुप होते. देशातील शेतकरी सर्वात दुर्दैवी आहे. त्याच्या शोषणावरच देशाची अर्थव्यवस्था आधारित आहे अशी टीका एम्बडवार यांनी केली. पुरोहित व बंग यांनीदेखील आपले मत यावेळी मांडले. गिरीश गांधी यांनी प्रास्ताविक केले तर डॉ.कोमल ठाकरे यांनी संचालन केले.(प्रतिनिधी)
मी पक्ष का बदलविले?
या कार्यक्रमप्रसंगी दत्ता मेघे यांनी चांगलीच शाब्दिक फटकेबाजी केली. चांगल्या लोकांचे विचार कृतीत येणे आवश्यक असते. त्यासाठी पद मिळणे फार आवश्यक असते. मी पक्ष बदलविले म्हणून माझ्यावर टीका होते. पण त्यात गैर ते काय? शेवटी सन्मान अन् भविष्याचाही विचार करायला हवा. माझ्या मुलाने लोकसभा निवडणुकीच्या वेळी माझे ऐकले नाही, अन्यथा तो खासदार राहिला असता असे ते म्हणाले.