शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रेती तस्करांना मदत करणाऱ्या पोलिसांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:07 IST

जगदीश जोशी नागपूर : रेती तस्कराला मदत करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करणे सुरू झाले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ...

जगदीश जोशी

नागपूर : रेती तस्कराला मदत करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करणे सुरू झाले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हुडकेश्वर ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. रेती तस्करांची वाहने पैसे घेऊन सोडल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार सांभाळताच अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या निर्देशानंतर कारवाई केल्यामुळे रेती तस्करी नियंत्रणात आली. काही दिवसांपासून पुन्हा रेती तस्करांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांशी सूत जुळवून तस्करी सुरू केली. त्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्तांनी २ फेब्रुवारीला वाहतूक शाखेचे उपायुक्त, अजनी, सक्करदरा, कामठी विभागाचे निरीक्षक आणि कामठी, कळमना, पारडी, वाठोडा, नंदनवन, हुडकेश्वर तसेच बेलतरोडी ठाण्याच्या अधिकाऱ्यांना बोलावले. आयुक्तांनी अधिकाऱ्यांना फटकारत त्वरीत रेती तस्करी बंद करण्याचे निर्देश दिले.

शहरात भंडारा मार्ग, उमरेड मार्ग आणि कोराडी मार्गाकडून रेती तस्करीची वाहने प्रवेश करतात. ते रोखण्यासाठी तिन्ही ठिकाणी पोलीस तैनात करण्यात येतात. रेती तस्कर रात्रीच्या वेळी पोलिसांचे खिसे भरून शहरात प्रवेश करतात. तैनात केलेले पोलीस एका रात्रीत मालामाल होतात. तेथे काही धोका असल्यास रेती तस्करांना आधीच सूचना दिली जाते. त्यामुळे ते पर्यायी मार्गाने वाहन घेऊन येतात. उमरेड मार्गाच्या विहीरगाव येथील पॉईंटवर तैनात सहायक उपनिरीक्षक प्रेमकुमार आणि शिपाई अश्विन रेती तस्करांच्या वाहनांना शहरात प्रवेश देत होते. याबाबत पोलीस आयुक्तांना सूचना मिळाली. त्यांनी प्रकरणाचा तपास केला. दोषी आढळल्यानंतर दोघांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. अनेक अधिकारी-कर्मचारी रेती तस्करांशी जुळले आहेत. त्यांची थेट बोलणी होते. रेती तस्करांशी संपर्क करण्यासाठी त्यांच्याजवळ अनेक मोबाईल असतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब माहिती आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन, बदली होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

...........

दुसऱ्या जिल्ह्यात बदलीची गरज

अवैध धंदे किंवा गैरकृत्यात सहभागी कर्मचाऱ्यांवर निलंबन किंवा बदलीची कारवाई करण्यात येते. परंतु स्थानिक पातळीवर मजबुत पकड असल्यामुळे ही कारवाई पुरेशी नाही. बदली करण्यास काही अर्थ नसून निलंबन ठराविक कालावधीनंतर संपते. जानकारांच्या मते अशा कर्मचाºयांची दुसऱ्या जिल्ह्यात बदली करणे आवश्यक आहे. पुण्यातील चाकन ठाणे रेती तस्करीसाठी कुख्यात होते. तत्कालीन अधिक्षक संदिप पाटील यांनी पोलीस महासंचालकांना प्रस्ताव पाठवून रेती तस्करीतील तीन कर्मचाऱ्यांची धुळे येथे बदली केली होती. एका कर्मचाऱ्याने बदली स्विकारली तर दोघांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘लोकमत’ला सांगितले की कोणीही शहरात अवैध धंदे चालवू शकत नाही. निलंबनाच्या कारवाईनंतर पोलिसांनी आपले कृत्य न थांबविल्यास भविष्यात ठोस पावले उचलण्यात येतील.

...............