शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
2
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
3
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
4
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
5
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
6
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
7
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
8
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
9
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
10
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
11
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
12
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
13
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
14
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
15
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
16
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
17
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
18
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
19
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
20
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ७,६८,६१४ कुटुंबीयांना मिळणार मोफत धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:07 IST

नागपूर : राज्य सरकार वाढत्या कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यासाठी आजपासून राज्यात कडक लॉकडाऊन लावत आहे. लॉकडाऊनमुळे आस्थापना, उद्योग ...

नागपूर : राज्य सरकार वाढत्या कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यासाठी आजपासून राज्यात कडक लॉकडाऊन लावत आहे. लॉकडाऊनमुळे आस्थापना, उद्योग आणि कामे बंद राहणार असल्याने गरीब आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य मोफत देणार आहे. या निर्णयाचा फायदा नागपूर जिल्ह्यातील ७६८६१४ शिधापत्रिका धारकांना होणार आहे.

राज्यात मार्च २०२० मध्ये केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन लावला होता. त्यावेळी स्वस्त धान्य दुकानदार अनेक कुटुंबीयांसाठी आधार ठरले होते. तेव्हाही अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सरकारने ५ किलो धान्य मोफत वाटले होते. आता परत राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. १५ दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात गरिबांची आबाळ होऊ नये म्हणून सरकारने आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गासाठी वेगवेगळे पॅकेज जाहीर केले आहे. त्यातच शिधापत्रिका धारकांना सुद्धा ५ किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या रेशन दुकानातून एप्रिल महिन्याच्या धान्याचे वाटप सुरू आहे. मे महिन्याचा धान्यसाठा सुद्धा लवकरच मिळणार आहे. त्याचबरोबर ५ किलो मोफत धान्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे शिधापत्रिका धारकांच्या पोटापाण्याची १५ दिवसांची सोय सरकारने केली आहे.

नागपूर जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण मिळून १३०० स्वस्त धान्य दुकानदार आहेत. यातील अंत्योदय व प्राधान्य गटातील शिधापत्रिका धारकांना रेशन मिळते. केशरी कार्डधारकांना नियमित रेशनचा लाभ मिळत नाही. परंतु गेल्या लॉकडाऊनमध्ये केशरी कार्डधारकांनाही ५ किलो मोफत धान्य सरकारने दिले होते. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयात केशरी कार्डबाबत स्पष्ट निर्देश नाहीत.

- शिधापत्रिकाधारक

ग्रामीण

अंत्योदय - ७७०७८

प्राधान्य - ३१५०८२

शहर

अंत्योदय - ४४६८८

प्राधान्य - ३३१७६६

- मोफत मिळणारे धान्य

३ किलो गहू व २ किलो तांदूळ

- मागच्यावर्षी सरकारने लॉकडाऊननंतर खरोखरच आम्हाला रेशनचा आधार दिला. आता पुन्हा सरकारने लॉकडाऊनच्या काळात नियमित धान्याबरोबर ५ किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेऊन शिधापत्रिका धारकांना दिलासा दिला आहे.

- अलका रामटेके, शिधापत्रिकाधारक

- रेशनच्या दुकानातून नियमित मिळणारे धान्य पुरे होते. या मोफत धान्याऐवजी खाद्यतेल दिले असते, तर गरिबांना त्याचा जास्त फायदा झाला असता. आज खाद्यतेलाच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत.

- तेजराम जनबंधू, शिधापत्रिकाधारक

- रेशन वितरण करण्याची आमची जबाबदारीच आहे. पण सरकारने आमच्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. मोठ्या संख्येने रेशन दुकानदार कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. आमची सरकारला मागणी आहे की, धान्याचे वितरण ऑफलाईन पद्धतीने करण्याची परवानगी द्यावी आणि रेशनकार्ड धारकांना विमा सुरक्षा प्रदान करावी.

- गुड्डू अग्रवाल, अध्यक्ष, राशन दुकानदार संघ