शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ५६, तर ग्रामीण भागात ३१ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : शहरासह तालुक्यातील विविध गावांमधील काेराेना संक्रमण आणि मृत्युदर वाढत आहे. काटाेल तालुक्यातील मृत्यूदर हा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काटाेल : शहरासह तालुक्यातील विविध गावांमधील काेराेना संक्रमण आणि मृत्युदर वाढत आहे. काटाेल तालुक्यातील मृत्यूदर हा हळूहळू शतकाजवळ पाेहाेचत असून, काेराेनाने आजवर तालुक्यातील ८७ रुग्णांचा बळी घेतला आहे. यात काटाेल शहरातील ५६, तर ग्रामीण भागातील ३१ रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे काेराेना संक्रमण वाढत असल्याची माहिती वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी दिली. वेळीच चाचणी न करणे आणि आजारपण लपवून अंगावर काढल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याची प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली. त्यामुळे संक्रमणाचा वेग कमी हाेण्याऐवजी वाढत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तालुक्यात आजवर ६,७२६ नागरिकांना काेराेनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून, त्यात २,९७३ नागरिक काटाेल शहरातील व २,७५३ नागरिक तालुक्याच्या ग्रामीण भागातील आहेत. यातील ४,२७८ रुग्णांनी काेराेनावर समर्थपणे मात केली आहे. मात करणाऱ्यांमध्ये २,७३२ रुग्ण काटाेल शहरातील, तर १,५४६ रुग्ण तालुक्याच्या ग्रामीण भागातील आहेत. सध्या १,१८५ शहरी व १,१७६ ग्रामीण भागातील अशा एकूण २,३६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

काेराेना संक्रमणाची साखळी ताेडण्यासाठी शासनाने लसीकरण माेहीम युद्धपातळीवर राबवायला सुरुवात केली. तालुक्यात आजवर ३३,८१६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात १०,३२३ काटाेल शहरातील तर २३,४९३ तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांचा समावेश आहे. कोरोना रुग्णांची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता सर्वांनी स्वतःच्या पातळीवर स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घेऊन व्यवहार करावे, असे आवाहन आपत्ती निवारण समिती प्रमुख तथा उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, तहसीलदार अजय चरडे, उपविभागीय पाेलीस अधिकारी नागेश जाधव, खंडविकास अधिकारी संजय पाटील, तालुका आराेग्य अधिकारी डॉक्टर शशांक व्यवहारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश डवरे, शिक्षणाधिकारी दिनेश धवड, डॉ. सुधीर वाघमारे, डॉ. नरेंद्र डोमके यांनी केले आहे.

...

नागरिकांचा बेजबाबदारपणा काेराेनाच्या पथ्यावर

एकीकडे काेराेना संक्रमण आणि त्यामुळे मृत्यू हाेण्याचे प्रमाण वाढत आहे तर दुसरीकडे प्रशासनाची हतबलता आणि नागरिकांचा बेजबाबदारपणाही दिसून येत आहे. नागरिकांच्या बेजबाबदारपणा काेराेनाच्या पथ्यावर पडत असून, अख्ख कुटुंब आणि गाव संक्रमित हाेत आहे. वारंवार सूचना देऊन, आवाहन करूनही नागरिक आठवडी बाजार भरवणे, राेडवर विनाकारण फिरणे, गर्दी करणे, कुठेही थुंकणे, मास्क न वापरणे यांसारख्या साध्या बाबींवर नागरिक अंमल करायला तयार नाही.