शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत ४४ वाघांचा मृत्यू

By admin | Updated: July 22, 2014 00:53 IST

देशभरात ‘वाघ वाचवा’ मोहीम राबविली जात असताना महाराष्ट्रात गत पाच वर्षांत ४४ वाघ व ३०४ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.

१० वाघांच्या शिकारी : वन विभागाला धक्का नागपूर : देशभरात ‘वाघ वाचवा’ मोहीम राबविली जात असताना महाराष्ट्रात गत पाच वर्षांत ४४ वाघ व ३०४ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार गत २००९ ते मार्च २०१४ पर्यंत २५ वाघांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. शिवाय ९ वाघांचा अपघाती मृत्यू झाला असून, १० वाघांना शिकाऱ्यांनी ठार केले आहे. गतवर्षी बहेलिया शिकारी टोळ्यांनी विदर्भातील अनेक वाघांना टार्गेट करून त्यांची शिकार केल्याची माहिती पुढे आली होती. यानंतर वन विभागाने वर्षभर आरोपींचा पाठलाग करून, गत ७ जून २०१४ पर्यंत ४० ते ४५ संशयितांना ताब्यात घेतले होते. मात्र यानंतरही शिकाऱ्यांनी किती वाघ ठार केले, याची वन विभागाला माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे शेवटी राज्य सरकारने हस्तक्षेप करून, संपूर्ण शिकारी प्रकरण सीबीआयच्या हाती सोपविण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, गत पाच वर्षांत वाघांसोबतच शेकडो बिबट्यांचाही मृत्यू झाला आहे. यात २००९ ते मार्च २०१४ पर्यंत १३९ बिबट्यांचा नैसर्गिक व ९७ बिबट्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे, तसेच ६८ बिबट शिकाऱ्यांनी ठार केले आहेत. वन विभागाने वाघ व बिबट्यांच्या मृत्यूची ही संख्या लक्षात घेता, व्याघ्र प्रकल्पात स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स (एसटीपीएफ) तैनात केली आहे. जाणकारांच्या मते, व्याघ्र प्रकल्पासोबतच प्रादेशिक वन क्षेत्रातही अनेक वाघांचा अधिवास आहे. परंतु मनुष्यबळाच्या अभावामुळे त्यांची सुरक्षा व संवर्धनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.(प्रतिनिधी)