शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

श्रीसूर्यावर ३५ हजार पानाचे आरोपपत्र

By admin | Updated: July 25, 2015 02:59 IST

श्रीसूर्या समूहाने मुदत ठेवींवर त्रैमासिक १२.५ टक्के व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधीने फसवणूक केल्या प्रकरणी ...

समीर जोशीसह ११ जणांचा समावेश : गुंतवणूकदारांना कोट्यवधीने फसवल्याचे प्रकरणनागपूर : श्रीसूर्या समूहाने मुदत ठेवींवर त्रैमासिक १२.५ टक्के व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधीने फसवणूक केल्या प्रकरणी गुरुवारी आर्थिक गुन्हे पथकाने एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयात आणखी ३५ हजार पानी आरोपपत्र दाखल केले.श्रीसूर्या समूहाचे प्रबंध संचालक समीर सुधीर जोशी, त्याची पत्नी पल्लवी समीर जोशी, श्रीसूर्या समूहांतर्गत कार्यरत श्रीसूर्या इन्टेकचा संचालक मनोज सुधीर तत्त्वादी, श्रीसूर्या बिझनेस असोसिएट्सचा निशिकांत नारायण मायी, श्रीकांत गोपाल प्रभुणे, दिलीप दामोदर डांगे, नितीन नारायण केसकर, मोहन मुकुंद पितळे, मुकुंद अंबादास पितळे, शंतनू ऊर्फ विवेक वासुदेव कुऱ्हेकर आणि आनंद जहागीरदार, अशा ११ आरोपीविरुद्ध हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी १३ डिसेंबर २०१३ रोजी समीर जोशी आणि पल्लवी जोशी यांच्याविरुद्ध ४ हजार ७०० पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या सर्व आरोपींनी आतापर्यंतच्या तपासात १ हजार २०० गुंतवणूकदारांची ९९ कोटी रुपयांनी फसवणूक केलेली आहे. पहिली तक्रार हॉटेल व्यावसायिकाचीफसवणूक झाल्याचे समजूनही आपला पैसा आपल्याला मिळेल, या आशेवर गुंतवणूकदार पोलिसात तक्रार करण्याची हिंमत करीत नव्हते. सोमलवाडा येथील रहिवासी हॉटेल व्यवसायी अमित मोरे यांनी हिंमत करून राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. श्रीसूर्या समूहाने त्यांची ५ लाख रुपयांनी फसवणूक केली . मोरे यांच्या तक्रारीवरून समीर जोशी, पल्लवी जोशी आणि इतरांविरुद्ध १४ नोव्हेंबर २०१३ रोजी भादंविच्या कलम ४०६, ४२०, ३४, महाराष्ट्र गुंतवणूकदार संरक्षण कायदा (एमपीआयडी) १९९९ च्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. आणखी८१ आरोपींची अटक बाकीश्रीसूर्या समूहाने पाच हजाराहून अधिक गुंतवणूकदारांची १०० कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचा अंदाज होता. अनेक गुंतवणूकदारांनी तक्रारीच न केल्याने केवळ ९९ कोटींची फसवणूक आतापर्यंत निष्पन्न झाली आहे. सर्व गुंतवणूकदारांनी तक्रार केल्यास फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात एकूण ९२ आरोपी आहेत. त्यापैकी ११ जणांनाच अटक झालेली आहे. आणखी ८१ आरोपींना अटक होणे बाकी आहेत. त्यात बऱ्याच बड्या व्यक्ती, दलाल आणि सीएचा समावेश आहे. पितळे कंपनीची दलाली ११ कोटीश्रीसूर्या समूहाने अकोला येथील मोहन पितळे आणि अमरावती येथील मुकुंद पितळे यांना ११ कोटींची दलाली वाटली आहे. मनोज तत्त्वादी याला २ कोटी २७ लाखांची दलाली मिळाली आहे. श्रीसूर्या समूहाने दलाल अर्थात बिझनेस असोसिएटस्ना मोठ्या प्रमाणावर दलाली वाटली आहे. ८१ जणांमध्ये बहुतांश दलाल आहेत. त्यांना अटक झाल्यास जप्ती मालमत्तेत वाढ होऊ शकते. श्रीसूर्याच्या एकूण ७३ मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून त्यापैकी २१ मालमत्ता नागपूरबाहेरील आहेत. या मालमत्ता विकून प्रत्येक गुंतवणूकदारांना त्यांच्या ठेवींची अर्धी रक्कम प्राप्त होऊ शकते, असे बोलले जात आहे.