शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २३ शाळा अनधिकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:17 IST

आशिष दुबे नागपूर : नागपूर जिल्ह्यात बऱ्याच काळापासून २३ शाळा अनधिकृत पद्धतीने सुरू आहेत. या शाळांनी मंजुरीसाठी आतापर्यंत प्राथमिक ...

आशिष दुबे

नागपूर : नागपूर जिल्ह्यात बऱ्याच काळापासून २३ शाळा अनधिकृत पद्धतीने सुरू आहेत. या शाळांनी मंजुरीसाठी आतापर्यंत प्राथमिक शिक्षण विभागाकडे कुठलेही दस्तावेज सादर केले नाहीत. विशेष म्हणजे या शाळांवर शिक्षण विभागानेही कुठलीच कारवाई केली नाही. त्यामुळे या शाळेत शिकणाऱ्या मुलांचे भविष्य अंधारात सापडले आहे.

लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वी जिल्ह्यात अनधिकृत शाळांची संख्या १५० च्यावर होती. २०१९-२० या शैक्षणिक सत्रात अशा शाळांची संख्या ५४ दाखविण्यात आली होती. तर २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात अनधिकृत शाळांची संख्या २३ दाखविण्यात आली. सूत्रांचे म्हणणे आहे की, अनधिकृत शाळांची संख्या यापेक्षा जास्त आहे. यात सीबीएसई अभ्यासक्रमाबरोबरच राज्य शिक्षण बोर्डाचा अभ्यासक्रम संचालित करणाऱ्या शाळांचा समावेश आहे. शिक्षण विभागाचेही म्हणणे आहे की, अनधिकृत शाळांची संख्या पूर्वी जास्त होती. परंतु आता कमी झाली आहे. ज्या शाळांजवळ मान्यता नाही, त्यांना मान्यता घेण्यासाठी आवश्यक दस्तावेज प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात जमा करण्यास सांगितले आहे. परंतु शाळेकडून त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही.

सर्वाधिक शाळा या ग्रामीण भागात आहेत. या शाळेत विद्यार्थ्यांची संख्याही जास्त आहे. विद्यार्थ्यांकडून या शाळा फीसुद्धा वसूल करीत आहे. याची माहिती शिक्षण विभागाला सुद्धा दिली आहे. त्यानंतरही कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. विभागाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.

- आरटीआयमध्ये माहिती दिली नाही

आरटीआय कार्यकर्ता सचिन बिसेन यांनी शिक्षण विभागाकडे माहितीच्या अधिकारात अनधिकृत शाळांची माहिती मागितली होती. परंतु विभागाने त्यांना कुठलीही माहिती दिली नाही. त्यामुळे बिसेन यांनी राज्य माहिती आयोगाकडे अपील केले. त्यानंतरही केवळ शाळांची संख्या सांगण्यात आली, परंतु शाळांची यादी दिलेली नाही.

- शाळांवर कारवाई होईल

प्राथमिक शिक्षण अधिकारी चिंतामण वंजारी यांना यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, अशा अनाधिकृत शाळांवर नक्कीच कारवाई होईल. काही शाळा अशा आहेत, ज्यांना सरकारने मान्यता दिली आहे. परंतु शाळा संचालित करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाची मंजुरी घेण्यासाठी आवश्यक कारवाई केलेली नाही. यासाठी शाळांना वेळसुद्धा दिला होता. कालावधी समाप्त झाल्यानंतरही त्या शाळांनी दस्तावेज जमा केले नाही. त्यांच्यावर कारवाई होणार आहे.