शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
4
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
5
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
6
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
7
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
8
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
9
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
10
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
11
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
12
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
13
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
14
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
15
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
16
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
17
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
18
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
19
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
20
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!

राज्यात १२१ पैकी ११८ कापूस खरेदी केंद्रे सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 13:11 IST

सीसीआयचा दावा: ग्राहक पंचायतने केला दिरंगाईचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यात १२१ कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्याचा सुरुवातीला निर्णय घेण्यात आला होता. यातील ११८ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ही केंद्रे सुरू करताना कापसाचा बाजारभाव व आवक विचारात घेण्यात आली. बहुतांश केंद्र १ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू करण्यात आल्याचा दावा सीसीआयच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. दुसरीकडे, सीसीआय कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्यास दिरंगाई करीत असल्याचे प्रतिज्ञापत्र ग्राहक पंचायतचे संघटक श्रीराम सातपुते यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला सादर केले आहे.

एमएसपी दराने कापसाची खरेदी करण्यासंदर्भात श्रीराम सातपुते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राज्यात यावर्षी १२१ कापूस खरेदी केंद्र १ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू केल्याचे सीसीआयने त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते. वास्तवात, सीसीआयने नागपूर जिल्ह्यात १३ डिसेंबर २०२४ रोजी, बुलढाणा जिल्ह्यात २५ ते २८ नोव्हेंबर २०२४ दरम्यान, अमरावती जिल्ह्यात नोव्हेंबर २०२४, अकोला जिल्ह्यात ११ ते २५ नोव्हेंबर २०२४ दरम्यान, वाशिम जिल्ह्यात ११ व १४ नोव्हेंबर २०२४ रोजी, यवतमाळ जिल्ह्यात ८ ते २५ नोव्हेंबर दरम्यान तर चंद्रपूर १४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान कापूस खरेदी केंद्र सुरू आहे. त्यामुळे सीसीआयने खेटे व बनावट प्रतिज्ञापत्र सादर करून न्यायालयाची दिशाभूल केल्याचे तसेच सीसीआयवर कायदेशीर कारवाई करावी, असे श्रीराम सातपुते यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. 

भंडारा व गोंदिया जिल्ह्यात कापूस खरेदी नाही भंडारा व गोंदिया जिल्ह्यात २ जानेवारी २०२४ पर्यंत एकही कापूस खरेदी केंद्र सीसीआयने सुरू केले नाही, असे श्रीराम सातपुते यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. मुळात हे दोन्ही धान उत्पादक जिल्हे आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये जिनिंग प्रेसिंग नाहीत. यावर्षी गोंदिया जिल्ह्यात तीन हेक्टर तर भंडाऱ्यात ६७८ हेक्टरमध्ये कापसाची पेरणी करण्यात आली होती. भंडाऱ्यातील कापूस पेरणी क्षेत्र हे नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यालगतचे आहे. या जिल्ह्यांमध्ये जिनिंग नसल्याने सीसीआयला कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यास अडचणी येत असून, ते आर्थिकदृष्ट्या तोट्याचे ठरते. 

बाजारभाव व आवक यावर्षी पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे कापूस वेचणी व बाजारात यायला विलंब झाला. सुरुवातीला कापसाचे दर दर एमएसपीला समांतर होते. दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी कापूस विक्री करणे तसेच सीसीआयकडे नोंदणी करणे टाळले. त्यामुळे बाजारातील कापसाची आवक संथ होती. नोंदणी शिवाय सीसीआय शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी करीत नाही. ज्याठिकाणी कापसाचे दर एमएसपीपेक्षा कमी आहे, अशा ठिकाणी सीसीआयने खरेदी केंद्र सुरू करण्यावर भर दिला. परंतु, आवक नसल्याने अडचणी निर्माण झाल्या.

टॅग्स :cottonकापूसfarmingशेतीFarmerशेतकरीnagpurनागपूर