शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ओळख भारतरत्नांची - इंदिरा गांधी

By admin | Updated: September 13, 2014 15:00 IST

गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या अलाहाबाद शहरात इंदिरा गांधींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला.

(भारतरत्न पुरस्कार सन १९७१)
 
गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या अलाहाबाद शहरात इंदिरा गांधींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला. इंदिराजींचं शिक्षण महात्मा गांधींच्या आश्रमात, रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘शांतिनिकेतन’मध्ये झालं. पुढील शिक्षणासाठी त्या इंग्लंडला गेल्या. वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी ‘कायदेभंगाच्या चळवळी’त भाग घेतल्याबद्दल त्यांना कारावास भोगावा लागला होता. स्वातंत्र्यलढय़ात सहभागी झालेल्यांना मदत करण्यासाठी त्यांनी ‘बालसेना’ स्थापन केली. इंदिराजींचा स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय सहभाग होता. चळवळी, मोर्चे, सत्याग्रह, जखमींची सेवा, तुरुंगवास हे इंदिराजींच्या जीवनाचे अंग बनले होते.
इंदिरा गांधींनी अपंगांविषयी सहानुभूती होती. दीनदुबळ्या लोकांविषयी कळकळ वाटत होती. त्यांच्यासाठी त्यांनी खूप मोठे समाजकार्य केलं. त्या कार्याचा गौरव म्हणून अमेरिकेने त्यांना १९५३ मध्ये ‘मातृ’ पारितोषिक दिलं. चीनने भारतावर आक्रमण केले, तेव्हा राष्ट्रीय संरक्षण मंडळाच्या सभासद म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यानंतर भारताच्या माहिती आणि नभोवणी मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं. १९६६ला भारताच्या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधींची निवड झाली. भारताच्या इतिहासात या एकाच स्त्रीनं पंतप्रधानपद भूषविलं. प्रौढ शिक्षण, शेतीचा विकास, पाणी, वीज, औद्योगिक विकास, संशोधन, अणुशक्ती, अंतराळ संशोधन, बँकांचे राष्ट्रीयीकरण याद्वारे भारताला प्रगतिपथाकडे नेण्यासाठी इंदिरा गांधींनी भरपूर परिश्रम घेतले. १९७१ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने बांगलादेशविरुद्धचे युद्ध जिंकले होते. कुशल, कणखर, धाडसी, कर्तबगार व झुंजार नेत्या म्हणून त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा राजकीय क्षेत्रावर उमटवला होता.
३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांची निर्घृण हत्या झाली. 
‘मृत्यू जवळपास वावरतो आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे; पण रक्ताचा अखेरचा थेंब असेपर्यंत मी देशसेवेचे व्रत सोडणार नाही! ’ हे मृत्यूपुर्वी काढलेले उद्गार इंदिराजींनी खरे करून दाखविले.
- सुबोध मुतालिक
(लेखक पुणे मराठी ग्रंथालयाचे कार्यकारिणी सदस्य आहेत.)