शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

ऐकून धक्का बसला ना..! पण, हे खरंय...महिलेने कमी केले तब्बल २१४ किलो वजन ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 12:55 IST

वयाच्या ६ व्या वर्षापासून अमिता यांचे वजन वाढण्यास सुरुवात झाली. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचे वजन १२६ किलो होते.

ठळक मुद्देपुण्यातील डॉ. शशांक शहा यांनी केली शस्त्रक्रिया : आशियातील सर्वाधिक वजन

पुणे : आशियातील सर्वाधिक वजन असलेल्या पालघर जिल्ह्यातील वसई येथे राहणाऱ्या ४२ वर्षांच्या अमिता राजानी यांनी चक्क २१४ किलो वजन कमी केले, ऐकून धक्का बसला ना! पण, हे खरंय. चार वर्षांपूर्वी केलेल्या बेरिअ‍ॅट्रिक शस्त्रक्रियेमुळे त्यांना नवसंजीवनी मिळाली असून, आता त्यांचे वजन आहे ८६ किलो.  या लढ्यामध्ये पुण्यातील प्रसिद्ध बेरिअ‍ॅट्रिक सर्जन आणि लॅपरो ओबेसो सेंटरचे संस्थापक डॉ. शशांक शहा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.वयाच्या ६ व्या वर्षापासून अमिता  यांचे वजन वाढण्यास सुरुवात झाली. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचे वजन १२६ किलो होते. आपल्या दैनंदिन क्रियासुद्धा त्या व्यवस्थितपणे करू शकत नव्हत्या. भारत आणि लंडन मधील आघाडीच्या एंडोक्रिनोलॉस्ट्सनासुद्धा त्यांच्या स्थूलपणाचे नक्की कारण सापडत नव्हते. जेव्हा त्यांचे वजन ३०० किलोपर्यंत पोहोचले, तेव्हा परिस्थिती अजूनच गंभीर झाली होती आणि त्यांना घराबाहेर पडणेही शक्य नव्हते. त्यांच्या कुटुंबीयांना त्यांची खूप काळजी वाटत होती. कारण, चालण्यापासून सगळ्या दैनंदिन क्रिया करण्यासाठी त्यांना मदतीची गरज लागत होती. त्याचप्रमाणे अमिता यांना श्वसनाच्या समस्यांमुळे आॅक्सिजनचा सपोर्ट लागत असे. त्याचप्रमाणे त्यांना शेकडो टॉवेलने पुसावे लागत असे. शस्त्रक्रियेच्या आधी ८ वर्षे त्या अंथरूणाला खिळून होत्या.पुण्यातील डॉ. शशांक शहा यांची त्यांनी भेट घेतली. अनेक वर्षांनी त्या घराबाहेर पडल्या. त्यांना अतिस्थूलपणाचा विकार होताच. त्याचबरोबर त्यांच्या कोलेस्टॉरलची पातळी असंतुलित होती, मूत्रपिंडांच्या कार्यात बिघाड झाला होता, टाईप २ प्रकारचा मधुमेह आणि श्वसनाच्याही समस्या होत्या. शस्त्रक्रियेपूर्वी दोन महिन्यांची पूर्वतयारी करण्यात आली होती. हॉस्पिटलमध्ये त्यांना विशिष्ट आहार घेण्यास सांगितला होता आणि त्यांच्यासाठी खास बेड, कपडे, वजन करण्याचे मशीन ठेवण्यात आले होते. त्यांची शस्त्रक्रिया २ टप्प्यांमध्ये पार पडली. २०१५ मध्ये त्यांच्यावर पहिल्या टप्प्यातील लॅपरोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टोनॉमी ही चयापचय शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांची परिस्थिती सुधारू लागली आणि त्यांचे बरेचसे वजन कमी झाले आणि त्या स्वत:हून चालू लागल्या. २०१७ मध्ये अमिता यांच्यावर दुसरी गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. त्या वेळी त्यांचे वजन १४० किलो होते. हे दोन चयापचय उपचार आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांचे वजन कमी झाले.डॉ. शशांक शहा म्हणाले की, कर्करोग किंवा एचआयव्ही एवढाच स्थूलपणा हा गंभीर आजार आहे. पुरुषांच्या तुलनेने महिलांना हा आजार अधिक प्रमाणात होतो. अमिता यांच्या शस्त्रक्रियेच्या चार वर्षांनंतर त्या मधुमेह आणि रक्तदाबासारख्या आरोग्याच्या समस्यांपासून त्या दूर आहेत. त्यांचे मूत्रपिंड सामान्यपणे कार्य करत आहे. आता आम्ही अमिताची केस लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्याच्या प्रयत्नात आहोत........माझा आनंद गगनात मावेना४आधी मी अंथरूणाला खिळलेली होते व आता मी स्वतंत्र आहे व मुक्तपणे हालचाल करू शकते. मी आवडीचे कपडे घालू शकते व मला हवे तसे आयुष्य जगू शकते. माझ्या आनंदाला पारावार राहिलेला नाही, असे अमिता राजानी यांनी सांगितले. .....

टॅग्स :Puneपुणेpalgharपालघरdoctorडॉक्टरWeight Loss Tipsवेट लॉस टिप्सWomenमहिला