शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

ऐकून धक्का बसला ना..! पण, हे खरंय...महिलेने कमी केले तब्बल २१४ किलो वजन ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 12:55 IST

वयाच्या ६ व्या वर्षापासून अमिता यांचे वजन वाढण्यास सुरुवात झाली. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचे वजन १२६ किलो होते.

ठळक मुद्देपुण्यातील डॉ. शशांक शहा यांनी केली शस्त्रक्रिया : आशियातील सर्वाधिक वजन

पुणे : आशियातील सर्वाधिक वजन असलेल्या पालघर जिल्ह्यातील वसई येथे राहणाऱ्या ४२ वर्षांच्या अमिता राजानी यांनी चक्क २१४ किलो वजन कमी केले, ऐकून धक्का बसला ना! पण, हे खरंय. चार वर्षांपूर्वी केलेल्या बेरिअ‍ॅट्रिक शस्त्रक्रियेमुळे त्यांना नवसंजीवनी मिळाली असून, आता त्यांचे वजन आहे ८६ किलो.  या लढ्यामध्ये पुण्यातील प्रसिद्ध बेरिअ‍ॅट्रिक सर्जन आणि लॅपरो ओबेसो सेंटरचे संस्थापक डॉ. शशांक शहा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.वयाच्या ६ व्या वर्षापासून अमिता  यांचे वजन वाढण्यास सुरुवात झाली. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचे वजन १२६ किलो होते. आपल्या दैनंदिन क्रियासुद्धा त्या व्यवस्थितपणे करू शकत नव्हत्या. भारत आणि लंडन मधील आघाडीच्या एंडोक्रिनोलॉस्ट्सनासुद्धा त्यांच्या स्थूलपणाचे नक्की कारण सापडत नव्हते. जेव्हा त्यांचे वजन ३०० किलोपर्यंत पोहोचले, तेव्हा परिस्थिती अजूनच गंभीर झाली होती आणि त्यांना घराबाहेर पडणेही शक्य नव्हते. त्यांच्या कुटुंबीयांना त्यांची खूप काळजी वाटत होती. कारण, चालण्यापासून सगळ्या दैनंदिन क्रिया करण्यासाठी त्यांना मदतीची गरज लागत होती. त्याचप्रमाणे अमिता यांना श्वसनाच्या समस्यांमुळे आॅक्सिजनचा सपोर्ट लागत असे. त्याचप्रमाणे त्यांना शेकडो टॉवेलने पुसावे लागत असे. शस्त्रक्रियेच्या आधी ८ वर्षे त्या अंथरूणाला खिळून होत्या.पुण्यातील डॉ. शशांक शहा यांची त्यांनी भेट घेतली. अनेक वर्षांनी त्या घराबाहेर पडल्या. त्यांना अतिस्थूलपणाचा विकार होताच. त्याचबरोबर त्यांच्या कोलेस्टॉरलची पातळी असंतुलित होती, मूत्रपिंडांच्या कार्यात बिघाड झाला होता, टाईप २ प्रकारचा मधुमेह आणि श्वसनाच्याही समस्या होत्या. शस्त्रक्रियेपूर्वी दोन महिन्यांची पूर्वतयारी करण्यात आली होती. हॉस्पिटलमध्ये त्यांना विशिष्ट आहार घेण्यास सांगितला होता आणि त्यांच्यासाठी खास बेड, कपडे, वजन करण्याचे मशीन ठेवण्यात आले होते. त्यांची शस्त्रक्रिया २ टप्प्यांमध्ये पार पडली. २०१५ मध्ये त्यांच्यावर पहिल्या टप्प्यातील लॅपरोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टोनॉमी ही चयापचय शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांची परिस्थिती सुधारू लागली आणि त्यांचे बरेचसे वजन कमी झाले आणि त्या स्वत:हून चालू लागल्या. २०१७ मध्ये अमिता यांच्यावर दुसरी गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. त्या वेळी त्यांचे वजन १४० किलो होते. हे दोन चयापचय उपचार आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांचे वजन कमी झाले.डॉ. शशांक शहा म्हणाले की, कर्करोग किंवा एचआयव्ही एवढाच स्थूलपणा हा गंभीर आजार आहे. पुरुषांच्या तुलनेने महिलांना हा आजार अधिक प्रमाणात होतो. अमिता यांच्या शस्त्रक्रियेच्या चार वर्षांनंतर त्या मधुमेह आणि रक्तदाबासारख्या आरोग्याच्या समस्यांपासून त्या दूर आहेत. त्यांचे मूत्रपिंड सामान्यपणे कार्य करत आहे. आता आम्ही अमिताची केस लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्याच्या प्रयत्नात आहोत........माझा आनंद गगनात मावेना४आधी मी अंथरूणाला खिळलेली होते व आता मी स्वतंत्र आहे व मुक्तपणे हालचाल करू शकते. मी आवडीचे कपडे घालू शकते व मला हवे तसे आयुष्य जगू शकते. माझ्या आनंदाला पारावार राहिलेला नाही, असे अमिता राजानी यांनी सांगितले. .....

टॅग्स :Puneपुणेpalgharपालघरdoctorडॉक्टरWeight Loss Tipsवेट लॉस टिप्सWomenमहिला