शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

वनवास संपणार का ?

By admin | Updated: February 26, 2015 02:00 IST

चर्चगेट ते डहाणू, सीएसटी ते पनवेल आणि कर्जत-कसारापर्यंत पसरलेल्या लोकल सेवेतून रेल्वे मंत्रालयाला दरवर्षी १००० कोटींहून अधिक महसूल मिळतो

चर्चगेट ते डहाणू, सीएसटी ते पनवेल आणि कर्जत-कसारापर्यंत पसरलेल्या लोकल सेवेतून रेल्वे मंत्रालयाला दरवर्षी १००० कोटींहून अधिक महसूल मिळतो. मात्र उत्पन्नाच्या तुलनेत या ठिकाणी लोकल सेवा सुधारण्यासाठी तितक्या घोषणा रेल्वेकडून अभावानेच केल्या जातात. दररोज ७५ लाख प्रवासी वाहून नेणाऱ्या लोकल सेवेला किमान या अर्थसंकल्पात तरी प्राधान्य दिले जाईल आणि वर्षोनवर्ष सुरू असलेला प्रवासातील वनवास थांबेल, असा आशावाद लोकल प्रवाशांकडून व्यक्त केला जात आहे. उपनगरीय प्रवासी तिकिट सेवेतून पश्चिम आणि मध्य रेल्वेची कोटींच्या कोटी उड्डाणे सुरु असून दरवर्षी यामध्ये वाढ होत आहे. मात्र पश्चिम रेल्वेचे विरार आणि मध्य रेल्वेचे कल्याण स्टेशन वगळल्यास त्या पुढील उपनगरीय स्टेशन्सवर आजही प्राथमिक सुविधांची बोंब आहे. तसेच आरक्षणाबाबतही अधिक पारदर्शक करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. या शिवाय उपनगरी रेल्वेचा प्रवास दिवसागणिक जीवघेणा ठरत असल्याने लोकल प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वेकडून भरीव तरतूदीची मागणी केली जात आहे. या दोन्ही रेल्वे विभागांना उपनगरीय तिकिटांमधून २0१४-१५ मध्ये फेब्रुवारीपर्यंत एकूण १,५२0 कोटी रुपये उत्पन्न मिळाले. त्यामुळे रेल्वेची तिजोरी भरणाऱ्या मुंबईतील लोकल प्रवाशांना यंदा प्रवास सुखकर होणा-या घोषणा केल्या जातील, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. गेल्या वर्षभरात रेल्वेकडून सहजरितीने तिकिट उपलब्ध व्हावे यासाठी एटीव्हीएम, सीव्हीएम, जेटीबीस आणि मोबाइल तिकिट सेवा देण्यात आली. यातील एटीव्हीएम सेवेचा वापर वाढत असून सर्वच उपनगरीय स्टेशनवर पुरेशा प्रमाणात एटीव्हीएम मशिन बसवण्याची मागणी केली जात आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंना लोकल प्रवासाची जाण असल्याने लाखो प्रवाशांना चांगली सेवा देण्याच्यादृष्टीने ते भरीव तरतूद करण्यासाठी हात आखडता घेणार नाहीत, असा आशावाद सामान्य प्रवाशांनी व्यक्त केली आहे.