शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
4
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
5
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
6
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
7
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
8
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
9
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
10
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
11
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
12
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
13
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
14
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
15
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
16
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
17
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
18
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
19
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
20
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

भाजप अन् काँग्रेस आसने-सामने: सावरकरांचा मुद्दा पुन्हा पुन्हा चर्चेला का येतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 09:48 IST

स्वा. सावरकर यांना वादाचे केंद्रबिंदू ठरविण्यात येत आहे का?

अतुल भातखळकर, भाजप आमदारळात सावरकरांच्या तथाकथित पत्रांचा, माफीचा उल्लेख २००३ पासून चालू झाला. त्याचे कारण असे आहे की, अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या दृष्टीने देशभरात प्रतिष्ठा मिळायला लागली. वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे तैलचित्र संसदेच्या सभागृहात लागले. तेव्हापासून या डाव्या इतिहासकारांनी जे ‘सो कॉल्ड लेफ्ट लिबरल’, आहेत त्यात पहिले नाव घ्यावे लागेल ए. जी. नुरानी यांचे. त्यावेळी काही लेख लिहिले, मग हे सावरकरांचे तथाकथित माफीपत्र त्यांनी त्या लेखांमधून मांडले. त्यामुळे याचे मूलभूत कारण हे आहे की, हिंदुत्वाचा आणि सावरकरांचा वैचारिक विजय होत आहे आणि राजकीयदृष्ट्या त्यांचे विचार समाजाने स्वीकारलेले आहेत. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांची आणि पर्यायाने या विचारांची बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे. २००४ मध्ये विधान परिषदेचे सभापती ना. स. फरांदे यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र विधानसभेच्या मध्यवर्ती सभागृहात सावरकरांचे तैलचित्र लागले. त्यावेळी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते, पण त्यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि काँग्रेसने त्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. २००२ पासून या सगळ्या गोष्टी काँग्रेसने चालू केल्या. मणिशंकर अय्यर यांनी अंदमानातील ज्योतीवरील सावरकरांच्या पंक्ती काढल्या. जसा प्रभाव वाढत चालला, तसा हा प्रयत्न वाढत गेला. 

सचिन सावंत, काँग्रेस नेतेदेशातील वैचारिक संघर्ष आहे. एका ठिकाणी गांधीजींचा विचार आहे, दुसरीकडे सावरकर-गोळवलकरांचा विचार आहे. केंद्रातील भाजपचे सरकार त्या विचारांनी देश पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. गांधीजींनी दिलेल्या विचारांनी हा देश चालला, आता मार्ग बदलायचा प्रयत्न होतोय. त्यामुळे हा विषय येणे साहजिकच आहे. देशात मने दुभंगवण्याचे काम करणाऱ्यांना विरोध करण्यासाठी भारत जोडो यात्रा आहे. त्यामुळे त्यांचे जे आदर्श आहेत त्यांचे खरे स्वरूप लोकांसमोर आणणे हेदेखील गरजेचे ठरते. पंडित नेहरूंबद्दल आता भाजप जे पसरवते आहे ती अतिशयोक्ती आहे. अनेक जणांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, त्यांनी अशा पद्धतीने माफीनामे लिहिले नव्हते. सावरकरांना गोळवलकर गुरुजींनी राष्ट्रविरोधी हिंदू आवृत्ती आणि सावरकरांचे हिंदुत्व प्रतिक्रियात्मक, नकारात्मक हिंदुत्व आहे, म्हटले होते. सावरकरांनी हिंदुत्वाची व्याख्या संघाला दिली, तिलाच नाकारण्याचे काम गोळवलकरांनी केले होते. त्याचा निषेध भाजप कधी करणार ते सांगावे. दुसरीकडे सावकरांबद्दल इतकी आत्मीयता आहे, तर त्यांच्या विचारांवर भाजप का चालत नाही. गोहत्याबंदीचा कायदा हा सावरकरांच्या विचारांच्या विरोधातला आहे. सावरकरांच्या विचारात वैज्ञानिक दृष्टिकोन होता, त्याचाही अवलंब भाजपने करावा. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर