शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्र मागे का?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 10:29 IST

तरीही महाराष्ट्रातून केवळ पाच खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत असल्याने नेमके आपण कुठे मागे पडलो, असा प्रश्न आहे.

रोहित नाईक, उप-मुख्य उपसंपादकदाची ऑलिम्पिक स्पर्धा भारतासाठी नेमबाजांनी गाजवली. त्यातही स्वप्नील कुसाळेच्या शानदार कामगिरीमुळे महाराष्ट्राची मान उंचावली. असे असले तरी यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राकडून स्वप्नीलसह प्रवीण जाधव (तिरंदाजी), चिराग शेट्टी (बॅडमिंटन), अविनाश साबळे (ॲथलेटिक्स) आणि सर्वेश कुशारे (ॲथलेटिक्स) हे पाच खेळाडूच सहभाग झाले आहेत. राज्यातील केवळ पाच खेळाडूच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले. त्याचवेळी, हरयाणा (१८), पंजाब (१८), तामिळनाडू (१३) आणि राजस्थान (८) या राज्यांनी मात्र देशात बाजी मारली आहे. देशातील सर्वांत प्रगत राज्य, सर्वाधिक कर देणारे, सर्वाधिक गुंतवणूक होणारे राज्य अशी महाराष्ट्राची ओळख आहे. तरीही महाराष्ट्रातून केवळ पाच खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत असल्याने नेमके आपण कुठे मागे पडलो, असा प्रश्न आहे.

मुळात खेळांना विशेष प्राधान्य मिळत नाही आणि हीच मोठी खंत आहे. आज सर्वांत जास्त प्राधान्य करमणुकीला मिळत आहे. त्यानंतर शिक्षण, नोकरी, आरोग्य अशा गोष्टी येतात; पण खेळाचा क्रम खूप मागे लागतो. मुंबईत जागांची वानवा आहेच; पण राज्यातील अनेक भागांत असलेल्या खुल्या मैदानांचाही खेळांसाठी पूर्ण वापर होताना दिसत नाही. अशा मैदानांवर ‘सरकारी परवानगी’ घेऊनच सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम होतात; तसेच पावसाळी वातावरणात मैदाने जवळपास बंदच राहतात. पाऊस ओसरल्यानंतर मात्र येथे सण-उत्सवांचे कार्यक्रम होतात; तसेच बहुतांश मैदानांचा वापर वाहनतळ म्हणून होत आहे. त्यामुळे लोकांचे प्राधान्य बदलत चालले आहेत, मुळात हे आधी बदलले पाहिजे.

बाहेरच्या देशांत दोन व्यक्ती भेटल्यावर त्यांच्यात खेळांची चर्चा रंगते. आपल्याकडे मात्र राजकीय, फिल्मी आणि आर्थिक चर्चा रंगतात. यावरून आपल्याकडे क्रीडा संस्कृती किती पिछाडीवर आहे, हे दिसून येते. कित्येक वर्षांपासून नाही, तर कित्येक दशकांपासून म्हटले जाते की, सोयीसुविधांचा अभाव आहे; पण आज सरकारच्या वतीने अनेक उपक्रम सुरू झाल्यानंतरही नागरिक त्याचा वापर किंवा फायदा करून घेत नाहीत. मुंबईसारख्या शहरांमध्ये अनेक उड्डाणपुलाखाली खेळाचे कोर्ट, मैदाने तयार करण्यात आली आहेत; पण त्याचा पूर्णपणे वापर नागरिकांकडून होत नाही. ज्यांचा खेळाकडील दृष्टिकोन खंबीर आणि गंभीर आहे त्यांना या अडचणींवर चांगल्याप्रकारे मात करता येईल.

क्रीडा विद्यापीठासाठी जागा मिळेना!दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य शासनाने मोठा गाजावाजा करत क्रीडा विद्यापीठ सुरू करण्याची घोषणा केली. गेल्यावर्षी यासाठी अभ्यासक्रम ठरवून हे विद्यापीठ सुरूही होणार होते; मात्र राज्य क्रीडा विभागातील एका अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अद्याप या क्रीडा विद्यापीठासाठी जागेचा शोध सुरू आहे.

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Maharashtraमहाराष्ट्र