शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 17:09 IST

माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सातपुडा हा सरकारी बंगला अजूनही सोडलेला नाही...

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराड यांचे नाव समोर आले आहे. कराड हे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जातात, यामुळे मुंडे यांनी आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, आता मंत्रिपद जाऊनही त्यांनी अजून 'सातपुडा' हा सरकारी बंगला सोडलेला नाही. या प्रकरणी आता चर्चा सुरू झाल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी प्रश्न उपस्थित केले आहेत. 

दरम्यान, छगन भुजबळ यांना अजूनही सरकारी बंगला मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे. याच सातपुडा बंगल्यामध्ये मंत्री छगन भुजबळ हे वास्तव्यास येणार आहेत. पण, मुंडे यांनी हे निवासस्थान सोडले नसल्यामुळे ते या बंगल्यात राहण्यासाठी येऊ शकलेले नाहीत. 

मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं

४२ लाख रुपये दंड

माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा देऊन चार महिने पूर्ण झाली आहेत. पण. अजूनही बंगला सोडलेला नाही. ४ मार्च रोजी त्यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. यानंतर पुढील चार दिवसात शासकीय निवासस्थान सोडणे अपेक्षित होते. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मंत्री पद हे छगन भुजबळांना मिळाले आणि 23 मेला सातपुडा बंगल्याचा शासकीय आदेश निघाला. पण सरकारी बंगला न मिळाल्यामुळे छगन भुजबळ अद्याप गृहप्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, मुंडेंनी हा बंगला सोडला नसल्यामुळे त्यांना दंड आकारण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.  ही रक्कम ४२ लाख रुपये असल्याची चर्चा सुरु आहे. 

धनंजय मुंडेंनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिले

माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. "माझ्या आजारपणावर उपचारासाठी मुंबईत रहावे लागत असल्याने आणि लहान मुलीच्या एॅडमिशनचा प्रश्न असल्याने वेळ लागत आहे.  मुदतवाढीसाठी सरकारकडे विनंती केली आहे. याआधीही हजारोवेळा अनेक मंत्र्‍यांना पद नसताना अशा प्रकारे मुदतवाढ दिलेली आहे",असंही मुंडे म्हणाले.

अंजली दमानियांनी केले आरोप

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी आरोप केले आहेत." चार मार्चला धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला. आज चार ऑगस्ट आहे. म्हणजे तब्बल पाच महिने त्यांनी त्यांचा शासकीय बंगला खाली केलेला नाही, त्यावर त्यांचं म्हणणं मुलीच्या शाळेमुळे आणि माझ्या आजारपणामुळे मला मुंबईत राहण गरजेचं आहे असं आहे. तर त्यासाठी कुठलाही स्वाभिमानी माणूस दोन बेडरुमचे घर विकत नाहीतर भाड्याने घेऊन राहिला असता. पण शासकीय बंगला न सोडणे हे चुकीचे आहे, त्यांच्यावर आता ४२ नाही तर ४६ लाखांचा दंड बसतो. त्यांना हा दंड माफ केला नाही पाहिजे, त्यांच्याकडून हा दंड वसूल केला पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस