शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 17:09 IST

माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सातपुडा हा सरकारी बंगला अजूनही सोडलेला नाही...

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराड यांचे नाव समोर आले आहे. कराड हे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जातात, यामुळे मुंडे यांनी आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, आता मंत्रिपद जाऊनही त्यांनी अजून 'सातपुडा' हा सरकारी बंगला सोडलेला नाही. या प्रकरणी आता चर्चा सुरू झाल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी प्रश्न उपस्थित केले आहेत. 

दरम्यान, छगन भुजबळ यांना अजूनही सरकारी बंगला मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे. याच सातपुडा बंगल्यामध्ये मंत्री छगन भुजबळ हे वास्तव्यास येणार आहेत. पण, मुंडे यांनी हे निवासस्थान सोडले नसल्यामुळे ते या बंगल्यात राहण्यासाठी येऊ शकलेले नाहीत. 

मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं

४२ लाख रुपये दंड

माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा देऊन चार महिने पूर्ण झाली आहेत. पण. अजूनही बंगला सोडलेला नाही. ४ मार्च रोजी त्यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. यानंतर पुढील चार दिवसात शासकीय निवासस्थान सोडणे अपेक्षित होते. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मंत्री पद हे छगन भुजबळांना मिळाले आणि 23 मेला सातपुडा बंगल्याचा शासकीय आदेश निघाला. पण सरकारी बंगला न मिळाल्यामुळे छगन भुजबळ अद्याप गृहप्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, मुंडेंनी हा बंगला सोडला नसल्यामुळे त्यांना दंड आकारण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.  ही रक्कम ४२ लाख रुपये असल्याची चर्चा सुरु आहे. 

धनंजय मुंडेंनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिले

माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. "माझ्या आजारपणावर उपचारासाठी मुंबईत रहावे लागत असल्याने आणि लहान मुलीच्या एॅडमिशनचा प्रश्न असल्याने वेळ लागत आहे.  मुदतवाढीसाठी सरकारकडे विनंती केली आहे. याआधीही हजारोवेळा अनेक मंत्र्‍यांना पद नसताना अशा प्रकारे मुदतवाढ दिलेली आहे",असंही मुंडे म्हणाले.

अंजली दमानियांनी केले आरोप

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी आरोप केले आहेत." चार मार्चला धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला. आज चार ऑगस्ट आहे. म्हणजे तब्बल पाच महिने त्यांनी त्यांचा शासकीय बंगला खाली केलेला नाही, त्यावर त्यांचं म्हणणं मुलीच्या शाळेमुळे आणि माझ्या आजारपणामुळे मला मुंबईत राहण गरजेचं आहे असं आहे. तर त्यासाठी कुठलाही स्वाभिमानी माणूस दोन बेडरुमचे घर विकत नाहीतर भाड्याने घेऊन राहिला असता. पण शासकीय बंगला न सोडणे हे चुकीचे आहे, त्यांच्यावर आता ४२ नाही तर ४६ लाखांचा दंड बसतो. त्यांना हा दंड माफ केला नाही पाहिजे, त्यांच्याकडून हा दंड वसूल केला पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस