शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 17:57 IST

Balaji Kalyankar Nanded: एकनाथ शिंदेंनी बंड केलं. त्यांच्यासोबत जे आमदार गुवाहाटीला गेले होते, त्यात एक होते बालाजी कल्याणकर... पण, तिथे गेल्यानंतर बालाजी कल्याणकरांच्या मनात स्वतःला संपवण्याचे विचार सुरू होते. त्याबद्दल मंत्री संजय शिरसाटांनी पहिल्यांदाच गौप्यस्फोट केला.  

Balaji Kalyankar News: "दोन माणसं आम्ही बालाजी कल्याणकरसोबतच ठेवायचो. त्याने पाऊल ठेवलं की माणूस अलर्ट व्हायचा", असे म्हणत कॅबिनेट मंत्री संजय शिरसाटांनीएकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडातील बालाजी कल्याणकरांचा किस्सा सांगितला. बालाजी कल्याणकर गुवाहाटीत असताना हॉटेलमधून उडी मारणार असे म्हणत होते. जेव्हा बालाजी कल्याणकरांना विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी त्यावेळी डोक्यात काय सुरू होते आणि कसे त्यांना कुणी धीर दिला, याबद्दल सांगितलं. 

बालाजी कल्याणकर म्हणाले, "शिरसाटांनी सांगितलं की, दोन दिवस मी जेवण केलं नाही. ते खरंच आहे. मी दोन-तीन दिवस वाईट मनस्थितीत होतो. ज्यावेळी मला विनंती करत होते, तेव्हा मी म्हटलं की, मी इथून हॉटेलवरून उडी मारेन आणि मी मला संपवून टाकेन. कारण तसे विचारच माझे झाले होते."

बालाजी कल्याणकर म्हणाले, "पण शिंदे साहेबांनी मला ताकद दिली. ते मला म्हणाले की, बालाजी अडीच वर्षे जनतेची कामे करण्यासाठी तुझ्यासोबत आहे. मी जोपर्यंत आहे, बालाजी मी तुझ्यासोबत राहीन. जेव्हा आम्ही उठाव केला, आमच्या घरावर दगडफेक केली. आमच्या अंत्ययात्रा काढल्या. दारू पिऊन लोक घरी आले. त्यावेळी मी खूप चिंतेत होतो. त्यावेळी एकनाथ शिंदेंनी साथ दिली."

बालाजी कल्याणकरांच्या मनात काय सुरू होतं?

"मनात एकच होतं की, जनतेनं निवडून दिलं. आमदार केलं आणि मी जनतेशी बेईमानी कशी करणार, अशी द्विधा मनस्थिती झाली होती. जनतेची कामे झाली पाहिजेत, हेही बरोबर आहे. मग आम्ही उठाव केला. एकनाथ शिंदेंसोबत राहिलो", असे बालाजी कल्याणकर म्हणाले. 

शिरसाटांनी सांगितला कल्याणकरांचा उडी मारण्याचा किस्सा

एका कार्यक्रमात बोलताना शिरसाट म्हणाले, "जेव्हा आम्ही बंडखोरी केली. त्यावेळी आम्ही यालाही (बालाजी कल्याणकर) घेऊन गेलो होतो. याची आमदारकीची पहिली वेळ होती. आम्ही झटके खाल्लेले लोक. माझी तिसरी वेळ होती, याची पहिली वेळ. आयला चुकून झालोय आमदार आणि हे आम्हाला घेऊन चाललेत. मतदारसंघात गेलो तर काय होईल. आमदारकी रद्द झाली तर काय होईल? आलेली संधी गेली. जेवतच नव्हता. मग त्याला सांगायचो, बालाजी खा रे बाबा. तो म्हणायचा नाही साहेब. अरे बालाजी असे नाहीये. आम्ही पण हिंमत केली. ४२ वर्षे राजकारणात आहोत. तू पहिल्यांदा निवडून आलास. आम्हीही राजकीय आयुष्य पणाला लावले आहे. तू खा रे बाबा. तो म्हणायचा नाही साहेब. आम्ही म्हणालो, तू नाही जेवला, तर तसा मरशील. खाऊन तर मर. एकदा तर म्हणाला हॉटेलच्या वरून उडीच मारतो. आता आम्हाला संख्या मोजायचं पडलेले आणि याला उडी खायचे पडलेले. आम्ही बहुमतात आलो नसतो, तर आमचीही आमदारकी रद्द झाली असती. मग दोन माणसं आम्ही त्याच्यासोबतच ठेवायचो."

English
हिंदी सारांश
Web Title : Balaji Kalyankar Considered Suicide During Rebellion; MLA's Emotional Turmoil Revealed

Web Summary : Balaji Kalyankar contemplated suicide during the Shinde rebellion, overwhelmed by the political uncertainty. He felt torn between his duty to his constituents and the upheaval. Shinde's support and encouragement ultimately persuaded him to persevere, preventing a tragic outcome amid the crisis.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Shirsatसंजय शिरसाटShiv SenaशिवसेनाMLAआमदारPoliticsराजकारण