शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

नव्याने येणाऱ्या सरकारसमोर ओल्या दुष्काळाचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 11:14 IST

सत्ता कुणाचीही आली तरीही या नव्या सरकारसमोर राज्यातील अनेक भागात निर्माण झालेल्या ओला दुष्काळजन्य परिस्थितीतेचे मोठे आव्हान असणार आहे.

मुंबई : राज्यात एकीकडे सत्तास्थापनेच्या राजकीय घडामोडींना वेग आला असताना दुसरीकडे राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान केले आहेत.पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून अशा संकटाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे. त्यामुळे राज्यात नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारपुढे ओला दुष्काळाचे आव्हान असणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राजकीय पक्षांकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु आहेत. युती करून विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या भाजपचे १०५ तर शिवसेनेच्या ५६ उमेदवार निवडून आली आहेत. मात्र सत्तेचा फॉर्म्युल्यामुळे या दोन्ही पक्षात वाद सुरु आहेत. त्याचप्रमाणे भाजपकडून हव तसा प्रतिसाद मिळाला नाही तर, शिवसेना राष्ट्रवादीचा पाठींबा घेऊन सरकार स्थापना करण्याचा अंदाज सुद्धा वर्तवला जात आहे. मात्र सत्ता कुणाचीही आली तरीही या नव्या सरकारसमोर राज्यातील अनेक भागात निर्माण झालेल्या ओला दुष्काळजन्य परिस्थितीतेचे मोठे आव्हान असणार आहे.

राज्यातील अनेक भागात झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून ओला दुष्काळजन्य परिस्थती निर्माण झाली आहे. सर्वच पिके खरिपाची उध्वस्त झाली असल्याने शेतकऱ्यांचे दिवाळीत दिवाळे निघाले. परतीच्या पावसाने मका, बाजरी, तुरी, कपाशी पिकांचे करोडो रुपयांचे अतोनात नुकसान केले आहेत. शेतात पाणी तुंबल्याने मका व बाजरीच्या कणसांना कोंब फूटले तर कपाशीचे पिक पाण्यामुळे पिवळी पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकरी मदतीची गरज निर्माण झाली आहे.

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे. प्रशासनाकडून पिंकाचे पंचनामे करण्यास सुद्धा सुरवात झाली असली तरीही राज्यातील नवीन सरकार स्थापना होईपर्यंत मदत मिळणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राज्यात नव्याने आलेल्या सरकारकडून पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांन कश्याप्रमाणे मदत मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.