शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

नव्याने येणाऱ्या सरकारसमोर ओल्या दुष्काळाचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 11:10 AM

सत्ता कुणाचीही आली तरीही या नव्या सरकारसमोर राज्यातील अनेक भागात निर्माण झालेल्या ओला दुष्काळजन्य परिस्थितीतेचे मोठे आव्हान असणार आहे.

मुंबई : राज्यात एकीकडे सत्तास्थापनेच्या राजकीय घडामोडींना वेग आला असताना दुसरीकडे राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान केले आहेत.पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून अशा संकटाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे. त्यामुळे राज्यात नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारपुढे ओला दुष्काळाचे आव्हान असणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राजकीय पक्षांकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु आहेत. युती करून विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या भाजपचे १०५ तर शिवसेनेच्या ५६ उमेदवार निवडून आली आहेत. मात्र सत्तेचा फॉर्म्युल्यामुळे या दोन्ही पक्षात वाद सुरु आहेत. त्याचप्रमाणे भाजपकडून हव तसा प्रतिसाद मिळाला नाही तर, शिवसेना राष्ट्रवादीचा पाठींबा घेऊन सरकार स्थापना करण्याचा अंदाज सुद्धा वर्तवला जात आहे. मात्र सत्ता कुणाचीही आली तरीही या नव्या सरकारसमोर राज्यातील अनेक भागात निर्माण झालेल्या ओला दुष्काळजन्य परिस्थितीतेचे मोठे आव्हान असणार आहे.

राज्यातील अनेक भागात झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून ओला दुष्काळजन्य परिस्थती निर्माण झाली आहे. सर्वच पिके खरिपाची उध्वस्त झाली असल्याने शेतकऱ्यांचे दिवाळीत दिवाळे निघाले. परतीच्या पावसाने मका, बाजरी, तुरी, कपाशी पिकांचे करोडो रुपयांचे अतोनात नुकसान केले आहेत. शेतात पाणी तुंबल्याने मका व बाजरीच्या कणसांना कोंब फूटले तर कपाशीचे पिक पाण्यामुळे पिवळी पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकरी मदतीची गरज निर्माण झाली आहे.

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे. प्रशासनाकडून पिंकाचे पंचनामे करण्यास सुद्धा सुरवात झाली असली तरीही राज्यातील नवीन सरकार स्थापना होईपर्यंत मदत मिळणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राज्यात नव्याने आलेल्या सरकारकडून पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांन कश्याप्रमाणे मदत मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.