शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाचे सूत्रच चुकीचे!

By admin | Updated: May 30, 2014 09:07 IST

चंद्रकांत शेळके, अहमदनगर मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वीजचोर्‍या, जुनाट वीज यंत्रणेमुळे होणारी गळती व बिलांची थकबाकी यामुळे महावितरणचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी भारनियमन या समस्येचा जन्म झाला.

चंद्रकांत शेळके, अहमदनगर मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वीजचोर्‍या, जुनाट वीज यंत्रणेमुळे होणारी गळती व बिलांची थकबाकी यामुळे महावितरणचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी भारनियमन या समस्येचा जन्म झाला. जो ग्राहक मुदतीत व प्रामाणिकपणे वीजबिल भरतो त्याला नाहक याचा फटका बसतो. चोर सोडून संन्याशाला फाशी या महावितरणच्या धोरणाला आता ग्राहकांमधून जोरदार विरोध होत आहे. ४२ टक्क्यांच्या पुढे गळतीचे प्रमाण गेले तर अशा फिडरवर सव्वासहा तास भारनियमन सध्या नगर शहरासह उपनगरांत होत आहे. त्याखालील फिडर भारनियमनमुक्त आहेत. परंतु इमर्जन्सी शटडाऊनचा फटका सर्वांनाच बसतो. मुळात भारनियमन होते कशामुळे, नियमित बिल भरणार्‍या ग्राहकांना त्याचा त्रास का, महावितरण वीजचोरांवर कडक कारवाई करून गळती नियंत्रणात का आणत नाही, जुनाट यंत्रणेत सुधारणा करून किंवा थकबाकीदारांचे वीजजोड खंडित करण्याचे धाडस का दाखवत नाही, याची उत्तरे अधिकार्‍यांकडून मिळत नाहीत. आम्ही नियमित बिल भरतो आम्हाला २४ तास वीज मिळाली पाहिजे एवढी साधी आणि सरळ मागणी ग्राहकांची असते. फिडरवरील १० ग्राहक बिल थकवतात किंवा वीजचोरी करतात. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी महावितरण निर्माण झालेली गळती भरून काढण्यासाठी इतर ९० लोकांना भारनियमनाचा झटका देते. याचाच संताप ग्राहकांमध्ये आहे. (समाप्त) वीजचोर बिनधास्त दिवसाढवळ्या वीजचोरी होते. वायरमन खांबाच्या खालून जातात, पण त्यांना टाकलेले आकडे दिसत नाहीत. विजेचे दर एवढे प्रचंड वाढले आहेत, त्यामुळे काटकसरीने वीज वापरावी लागते. झोपताना साधा झिरो बल्बसुध्दा लावत नाही अन् दुसरीकडे वीजचोर शेगड्या, हिटर बिनधास्त वापरतात. म्हणजे नियमित बिल भरून वीज वापरात काटकसर आम्ही करायची व त्यांनी फुकटात लागेल तेवढी वीज वापरायची, हा कोणता न्याय. - ईश्वर निमसे, ग्राहक भारनियमनाचे सूत्र बदला जो ग्राहक नियमित बिल भरतो, त्याला २४ तास वीज मिळालीच पाहिचे. तो त्याचा हक्क आहे. वीजचोरी, गळती, थकबाकी याला आळा घालणे हे सर्वस्वी महावितरणचे काम आहे. त्यावर त्यांनी काय उपाययोजना करायची हा त्यांचा प्रश्न. प्रामाणिक ग्राहकांवर झालेला अन्याय खपवून घेणार नाही. गळतीवर आधारित भारनियमनाचे हे सूत्रच चुकीचे असून, त्यात तातडीने बदल करण्याची गरज आहे. - आमदार अनिल राठोड राज्यस्तर अंमलबजावणी गळती व वसुली या सूत्रावरच संपूर्ण महाराष्ट्रभर भारनियमन होते. त्यात कोठेही बदल नाही. फिडरवरील वसुली १०० टक्के व गळती कमी असेल तर तेथील भारनियमन त्वरित रद्द केले जाते. त्यामुळे भारनियमनातून सुटका करणे हेही ग्राहकांच्याच हाती आहे. ४२ टक्क्यांच्या पुढे गळती असेल तर तेथे सध्या सव्वासहा तास भारनियमन आहे. दर महिन्याला त्यात बदल होतो. याबाबत निर्णयही वरिष्ठ स्तरावरूनच होतात. - प्रभाकर हजारे, अधीक्षक अभियंता