शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अंतिम वर्षाच्या परीक्षेमुळे निर्माण होणाऱ्या कायदेशीर पेचवर " असा " निघू शकतो मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 23:27 IST

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा विषय राजकीय बनला आहे...

ठळक मुद्देअंतिम वर्षाच्या परीक्षेवर कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यताराज्यपाल व मुख्यमंत्री यांनी एकत्रितपणे चर्चा करून यावर निर्णय घेण्याची आवश्यकता

पुणे: विद्यापीठ कायद्यानुसार राज्यपाल सर्व विद्यापीठांचे प्रमुख असून त्यांना शैक्षणिक निर्णय घेण्याचे सर्वाअधिकार आहेत.तर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार मुख्यमंत्री विद्यापीठांना परीक्षेसंदर्भात सूचना देऊ शकतात. त्यामुळे अंतिम वर्षांच्या परीक्षा घ्याव्यात किंवा घेऊ नयेत याबाबतचा एक नवा कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यपाल व मुख्यमंत्री यांनी एकत्रितपणे चर्चा करून यावर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी 'जीबीव्हीसी'ची बैठक हा पर्याय असू शकतो,असे मत शिक्षण व विधी क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा विषय राजकीय बनला आहे. राज्यातील कुलगुरू बरोबर घेतलेल्या बैठकीनंतर कायदेशीर बाबी तपासून अंतिम वर्षाच्या परीक्षेला बाबत निर्णय घेतला जाईल ,असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करून सरासरी गुणांच्या आधारे निकाल जाहीर केले जातील. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेचा पर्यायही उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. परंतु, विद्यापीठांचे कुलपती म्हणून सर्व विद्यापीठांचे कुलपती म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी  विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षा घेतल्या जातील, असे राज्य शासनाला कळविले. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदी आणि विद्यापीठ कायद्यातील तरतुदी तपासाव्या लागणार आहेत.परंतु, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जॉईंट बोर्ड ऑफ व्हॉइस चान्सलर्सची (जीबीव्हीसी) बैठक बोलविली यास त्यातून मार्ग निघू शकतो.

कायद्याचे अभ्यासक अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार मुख्यमंत्री विद्यापीठांना परीक्षेसंदर्भात आदेश देऊ शकतात. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार राज्य शासनाला परीक्षेसंदर्भातील वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करता आला असता. सरासरी गुणांच्या आधारे निकाल जाहीर केल्यानंतरही ज्यांना परीक्षा द्यायची आहे. त्यांना परीक्षा देण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. मात्र, बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा प्रश्न निर्माण होतो.

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अ‍ॅ​​​​​​​ड. एस. के. जैन म्हणाले, मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राज्यपाल यांनी काम करावे. हे जरी खरे असले तरी; कुलपती म्हणून राज्यपालांचे विशिष्ट स्थान आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांशी चर्चा करून निर्णय घेतला असता तर मध्यम मार्ग निघाला असता. सरासरी गुण देऊन निकाल जाहीर केल्यामुळे पुढील काळात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे याबाबत जीबीव्हीसी घेऊन लोकप्रिय नाहीतर विद्यार्थ्यांच्या भले होईल,असा निर्णय घ्यावा.

विद्यापीठ विकास मंचचे प्रांत प्रमुख डॉ.ए.पी.कुलकर्णी म्हणाले, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर परीक्षा घ्यावी.परीक्षा घेणे विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे. जीबीव्हीसीमध्ये यावर मार्ग काढता येऊ शकतो.---------------------अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात निर्माण झालेल्या एकूण परिस्थितीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ऑनलाइन जीबीव्हीसी बोलवून सर्व कुलगुरू व राज्य शासनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी बरोबर चर्चा करणे योग्य होईल. जीबीव्हीसीच्या बैठकीमध्ये कोरोनाची परिस्थिती, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि भवितव्य याबाबत सकारात्मक चर्चा करून मार्ग काढता येऊ शकतो.- डॉ. वासुदेव गाडे, माजी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ--------राज्यपाल हे जीबीव्हीसीचे अध्यक्ष असतात. जीबीव्हीसीमध्ये सर्व कुलगुरू तसेच मुख्यमंत्री, उच्च शिक्षण मंत्री ,शिक्षण सचिव यांच्याबरोबर चर्चा करता येऊ शकते. जेबीव्हीसीला एक विशिष्ट स्थान असल्यामुळे गांभीर्याने चर्चा करून एका दिवसात अंतिम वर्षाच्या परीक्षेवर मार्ग काढला जाऊ शकतो.-डॉ.आर.एस.माळी ,माजी कुलगुरू ,जळगाव विद्यापीठ----------जेबीव्हीसी म्हणजे काय?राज्यातील उच्च शिक्षण विषयक बाबींवर जेबीव्हीसीमध्ये चर्चा केली जाते. यापूर्वीही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित आणि राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली जेबीव्हीसीच्या बैठका पार पडल्या आहेत. राज्यपाल हे 'जीबीव्हीसी' चे पदसिद्ध अध्यक्ष असून या बैठकीला सर्व कुलगुरू मुख्यमंत्री, उच्च शिक्षण मंत्री, राज्याचे प्रधान सचिव, उच्च शिक्षण विभागाचे सचिव ,आदी उपस्थित असतात. त्यामुळे जेबीव्हीसीमधून परीक्षेचा पेच सोडविला जाऊ शकतो.--------* मुख्यमंत्री यांच्याबरोबर झालेल्या चर्चेमध्ये राज्यातील केवळ दोन कुलगुरूंनी परीक्षेबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली. इतर कुलगुरूंनी राजकीय दबावाखाली बोलणे टाळले, असे बोलले जात आहे. मात्र 'जी​​​​​​​बीव्हीसी'मध्ये मोकळेपणाने चर्चा होऊ शकते.

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणcollegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठState Governmentराज्य सरकारbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीexamपरीक्षाStudentविद्यार्थीUddhav Thackerayउद्धव ठाकरे