शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

संपूर्ण महाराष्ट्रात पाणीबाणी; उपयुक्त पाणीसाठा २० टक्केच, सर्वाधिक झळ मराठवाड्याला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 05:48 IST

पावसाळा आणखी किमान दीड महिना दूर असताना महाराष्ट्रातील जलसाठा जेमतेम २० टक्के शिल्लक राहिला आहे. दुष्काळ जाहीर केलेल्या २० हजार गावांसह राज्यातली अनेक गावे, तांडे पाण्याच्या शोधात रात्रंदिवस भटकू लागली आहेत.

पुणे : पावसाळा आणखी किमान दीड महिना दूर असताना महाराष्ट्रातील जलसाठा जेमतेम २० टक्के शिल्लक राहिला आहे. दुष्काळ जाहीर केलेल्या २० हजार गावांसह राज्यातली अनेक गावे, तांडे पाण्याच्या शोधात रात्रंदिवस भटकू लागली आहेत. उष्णतेच्या तीव्र लाटेत जलसाठ्यांच्या बाष्पीभवनाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे धरणांमधले पाणी वेगाने आटत असून उपयुक्त जलसाठा फक्त २०.०९ टक्के आहे. मराठवाड्याची स्थिती भयानक असून औरंगाबादमध्ये जेमतेम ५.२८ टक्के पाणी शिल्लक आहे. नागपूर विभागातील पाणीसाठा ११.०९ टक्के तर पुणे विभागातील पाणीसाठा २४.३९ टक्के आहे. तुलनेने कोकणात पाण्याची स्थिती बरी असून तेथे ४१.२९ टक्के पाणीसाठा आहे.

राज्यातील लहान, मोठ्या व मध्यम धरणांत १४४४.१३ अब्ज घनफूट उपयुक्त पाणीसाठा असतो. त्यापैकी तब्बल १०२७.२९ टीएमसी पाणी मोठ्या धरणांत साठते. यापैकी ४३९.४० टीएमसी म्हणजेच ३० टक्के पाणी पुणे विभागात आहे. यातील उपयुक्त पाणीसाठा आज १००.६२ टीएमसी होता. औरंगाबाद व नाशिकच्या मोठ्या धरणांची उपयुक्त पाणीसाठा क्षमता अनुक्रमे १५९.०८ आणि १३२.०८ टीएमसी आहे. सध्या ४.३६ टीएमसी औरंगाबादेत तर २२.४१ टीएमसी पाणी नाशकात आहे. राज्याचा उपयुक्त पाणीसाठा १,४४४.१३ अब्ज घनफूट असून, सध्या २९०.०८ अब्ज घनफूट शिल्लक आहे.पुढच्या काही दिवसांत उन्हाचा तडाखा वाढणार आहे. मराठवाड्यात ४१ व ४२ आणि विदर्भात ४४ ते ४५ अंश सेल्सिअस तापमान आहे. तीव्र तापमानामध्ये बाष्पीभवनाचा वेगही प्रचंड असतो. त्यामुळे पाणीसाठ्यात वेगाने घट होण्याची शक्यता आहे.

राज्यातील उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता

विभागउपयुक्त साठा क्षमता

आजचा साठा

(कंसात टक्केवारी)

२०१८

(टक्के)

२०१७

(टक्के)

२०१६

(टक्के)

अमरावती१४८.०६३६.११(२४.३९)१९.२०३४.११११.८१
औरंगाबाद२६०.३११४.०६ (५.२८)५०.१९५५.०८३५.९२
कोकण१२३.९४५१.१७ (४१.२९)१७.०८१९१२.५७
नागपूर१६२.६७१८.०३ (११.०९)३५.२८३१.७४१२.७३
नाशिक२१२४० (१८.८७)३८.०८२७.०५१५.७१
पुणे५३७.१२१३१.०१ (२४.३९)३०.८९३४.१२०.९९
एकूण१४४४.१३२९०.०८ (२०.०९)३३.०८३१.४११३.६५

(आकडेवारी टीएमसीमध्ये)

फक्त धरणसाठ्याची आकडेवारी लक्षात घेणे चुकीचे ठरेल. कारण मोठी शहरे आणि काही गावांचा अपवाद वगळता उर्वरित महाराष्ट्र आजही भूजलावरच अवलंबून आहे. या भूजलसाठ्याची स्थिती काय आहे, याची आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे तहान टँकरवरच भागवावी लागेल. त्यादृष्टीने काटेकोर नियोजन हवे. - डॉ. दि. मा. मोरे, माजी जलसंपदा सचिव

 

टॅग्स :droughtदुष्काळMaharashtraमहाराष्ट्रwater shortageपाणीटंचाईDamधरण