शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

संपूर्ण महाराष्ट्रात पाणीबाणी; उपयुक्त पाणीसाठा २० टक्केच, सर्वाधिक झळ मराठवाड्याला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 05:48 IST

पावसाळा आणखी किमान दीड महिना दूर असताना महाराष्ट्रातील जलसाठा जेमतेम २० टक्के शिल्लक राहिला आहे. दुष्काळ जाहीर केलेल्या २० हजार गावांसह राज्यातली अनेक गावे, तांडे पाण्याच्या शोधात रात्रंदिवस भटकू लागली आहेत.

पुणे : पावसाळा आणखी किमान दीड महिना दूर असताना महाराष्ट्रातील जलसाठा जेमतेम २० टक्के शिल्लक राहिला आहे. दुष्काळ जाहीर केलेल्या २० हजार गावांसह राज्यातली अनेक गावे, तांडे पाण्याच्या शोधात रात्रंदिवस भटकू लागली आहेत. उष्णतेच्या तीव्र लाटेत जलसाठ्यांच्या बाष्पीभवनाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे धरणांमधले पाणी वेगाने आटत असून उपयुक्त जलसाठा फक्त २०.०९ टक्के आहे. मराठवाड्याची स्थिती भयानक असून औरंगाबादमध्ये जेमतेम ५.२८ टक्के पाणी शिल्लक आहे. नागपूर विभागातील पाणीसाठा ११.०९ टक्के तर पुणे विभागातील पाणीसाठा २४.३९ टक्के आहे. तुलनेने कोकणात पाण्याची स्थिती बरी असून तेथे ४१.२९ टक्के पाणीसाठा आहे.

राज्यातील लहान, मोठ्या व मध्यम धरणांत १४४४.१३ अब्ज घनफूट उपयुक्त पाणीसाठा असतो. त्यापैकी तब्बल १०२७.२९ टीएमसी पाणी मोठ्या धरणांत साठते. यापैकी ४३९.४० टीएमसी म्हणजेच ३० टक्के पाणी पुणे विभागात आहे. यातील उपयुक्त पाणीसाठा आज १००.६२ टीएमसी होता. औरंगाबाद व नाशिकच्या मोठ्या धरणांची उपयुक्त पाणीसाठा क्षमता अनुक्रमे १५९.०८ आणि १३२.०८ टीएमसी आहे. सध्या ४.३६ टीएमसी औरंगाबादेत तर २२.४१ टीएमसी पाणी नाशकात आहे. राज्याचा उपयुक्त पाणीसाठा १,४४४.१३ अब्ज घनफूट असून, सध्या २९०.०८ अब्ज घनफूट शिल्लक आहे.पुढच्या काही दिवसांत उन्हाचा तडाखा वाढणार आहे. मराठवाड्यात ४१ व ४२ आणि विदर्भात ४४ ते ४५ अंश सेल्सिअस तापमान आहे. तीव्र तापमानामध्ये बाष्पीभवनाचा वेगही प्रचंड असतो. त्यामुळे पाणीसाठ्यात वेगाने घट होण्याची शक्यता आहे.

राज्यातील उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता

विभागउपयुक्त साठा क्षमता

आजचा साठा

(कंसात टक्केवारी)

२०१८

(टक्के)

२०१७

(टक्के)

२०१६

(टक्के)

अमरावती१४८.०६३६.११(२४.३९)१९.२०३४.११११.८१
औरंगाबाद२६०.३११४.०६ (५.२८)५०.१९५५.०८३५.९२
कोकण१२३.९४५१.१७ (४१.२९)१७.०८१९१२.५७
नागपूर१६२.६७१८.०३ (११.०९)३५.२८३१.७४१२.७३
नाशिक२१२४० (१८.८७)३८.०८२७.०५१५.७१
पुणे५३७.१२१३१.०१ (२४.३९)३०.८९३४.१२०.९९
एकूण१४४४.१३२९०.०८ (२०.०९)३३.०८३१.४११३.६५

(आकडेवारी टीएमसीमध्ये)

फक्त धरणसाठ्याची आकडेवारी लक्षात घेणे चुकीचे ठरेल. कारण मोठी शहरे आणि काही गावांचा अपवाद वगळता उर्वरित महाराष्ट्र आजही भूजलावरच अवलंबून आहे. या भूजलसाठ्याची स्थिती काय आहे, याची आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे तहान टँकरवरच भागवावी लागेल. त्यादृष्टीने काटेकोर नियोजन हवे. - डॉ. दि. मा. मोरे, माजी जलसंपदा सचिव

 

टॅग्स :droughtदुष्काळMaharashtraमहाराष्ट्रwater shortageपाणीटंचाईDamधरण