शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण महाराष्ट्रात पाणीबाणी; उपयुक्त पाणीसाठा २० टक्केच, सर्वाधिक झळ मराठवाड्याला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 05:48 IST

पावसाळा आणखी किमान दीड महिना दूर असताना महाराष्ट्रातील जलसाठा जेमतेम २० टक्के शिल्लक राहिला आहे. दुष्काळ जाहीर केलेल्या २० हजार गावांसह राज्यातली अनेक गावे, तांडे पाण्याच्या शोधात रात्रंदिवस भटकू लागली आहेत.

पुणे : पावसाळा आणखी किमान दीड महिना दूर असताना महाराष्ट्रातील जलसाठा जेमतेम २० टक्के शिल्लक राहिला आहे. दुष्काळ जाहीर केलेल्या २० हजार गावांसह राज्यातली अनेक गावे, तांडे पाण्याच्या शोधात रात्रंदिवस भटकू लागली आहेत. उष्णतेच्या तीव्र लाटेत जलसाठ्यांच्या बाष्पीभवनाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे धरणांमधले पाणी वेगाने आटत असून उपयुक्त जलसाठा फक्त २०.०९ टक्के आहे. मराठवाड्याची स्थिती भयानक असून औरंगाबादमध्ये जेमतेम ५.२८ टक्के पाणी शिल्लक आहे. नागपूर विभागातील पाणीसाठा ११.०९ टक्के तर पुणे विभागातील पाणीसाठा २४.३९ टक्के आहे. तुलनेने कोकणात पाण्याची स्थिती बरी असून तेथे ४१.२९ टक्के पाणीसाठा आहे.

राज्यातील लहान, मोठ्या व मध्यम धरणांत १४४४.१३ अब्ज घनफूट उपयुक्त पाणीसाठा असतो. त्यापैकी तब्बल १०२७.२९ टीएमसी पाणी मोठ्या धरणांत साठते. यापैकी ४३९.४० टीएमसी म्हणजेच ३० टक्के पाणी पुणे विभागात आहे. यातील उपयुक्त पाणीसाठा आज १००.६२ टीएमसी होता. औरंगाबाद व नाशिकच्या मोठ्या धरणांची उपयुक्त पाणीसाठा क्षमता अनुक्रमे १५९.०८ आणि १३२.०८ टीएमसी आहे. सध्या ४.३६ टीएमसी औरंगाबादेत तर २२.४१ टीएमसी पाणी नाशकात आहे. राज्याचा उपयुक्त पाणीसाठा १,४४४.१३ अब्ज घनफूट असून, सध्या २९०.०८ अब्ज घनफूट शिल्लक आहे.पुढच्या काही दिवसांत उन्हाचा तडाखा वाढणार आहे. मराठवाड्यात ४१ व ४२ आणि विदर्भात ४४ ते ४५ अंश सेल्सिअस तापमान आहे. तीव्र तापमानामध्ये बाष्पीभवनाचा वेगही प्रचंड असतो. त्यामुळे पाणीसाठ्यात वेगाने घट होण्याची शक्यता आहे.

राज्यातील उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता

विभागउपयुक्त साठा क्षमता

आजचा साठा

(कंसात टक्केवारी)

२०१८

(टक्के)

२०१७

(टक्के)

२०१६

(टक्के)

अमरावती१४८.०६३६.११(२४.३९)१९.२०३४.११११.८१
औरंगाबाद२६०.३११४.०६ (५.२८)५०.१९५५.०८३५.९२
कोकण१२३.९४५१.१७ (४१.२९)१७.०८१९१२.५७
नागपूर१६२.६७१८.०३ (११.०९)३५.२८३१.७४१२.७३
नाशिक२१२४० (१८.८७)३८.०८२७.०५१५.७१
पुणे५३७.१२१३१.०१ (२४.३९)३०.८९३४.१२०.९९
एकूण१४४४.१३२९०.०८ (२०.०९)३३.०८३१.४११३.६५

(आकडेवारी टीएमसीमध्ये)

फक्त धरणसाठ्याची आकडेवारी लक्षात घेणे चुकीचे ठरेल. कारण मोठी शहरे आणि काही गावांचा अपवाद वगळता उर्वरित महाराष्ट्र आजही भूजलावरच अवलंबून आहे. या भूजलसाठ्याची स्थिती काय आहे, याची आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे तहान टँकरवरच भागवावी लागेल. त्यादृष्टीने काटेकोर नियोजन हवे. - डॉ. दि. मा. मोरे, माजी जलसंपदा सचिव

 

टॅग्स :droughtदुष्काळMaharashtraमहाराष्ट्रwater shortageपाणीटंचाईDamधरण