शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

निढळने राज्याला दिला जलसंधारणाचा संदेश

By admin | Updated: June 8, 2015 00:47 IST

शशिकांत शिंंदे : चंद्रकांत दळवींकडून लोकहिताच्या योजना

पुसेगाव : ‘निढळला जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेच्या पाण्याचा लाभ तसेच येथील पंचतारांकित एमआयडीसीसाठी कण्हेर धरणातून पाणी आरक्षित करण्यात आले आहे. सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी कल्पकता व दूरदृष्टीच्या जोरावर गाव केंद्रबिंदू मानून अनेक लोकहिताच्या योजना तयार केल्या आणि शासनाने त्या यशस्वीपणे राबविल्या म्हणूनच निढळ हे छोटेसे गाव देशाच्या नकाशावर झळकत आहे. निढळने तर राज्याला जलसंधारणाचा संदेश दिला आहे,’ असे गौरवोद्गार माजी पालकमंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी काढले. निढळ, ता. खटाव येथील विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी अध्यक्षस्थानी होते. उद्योजक गजानन खुस्पे, सतीश फडतरे, अर्जुन वलेकर, मारुती ठोंबरे, पै. सागर साळुंखे, सरपंच संगीता इंजे, उपसरपंच श्रीमंत निर्मळ, सोसायटीचे अध्यक्ष किसन पाटील, उपाध्यक्ष शैलेश मोहिते, जोतिराम घाडगे, अभिषेक दळवी, संदीप सत्रे, दत्तात्रय खुस्पे, उबंरमळेचे सरपंच नवनाथ वलेकर, अशोक खुस्पे, अशोक यादव, विलास पाटोळे, विजय शिंदे, संतोष खुस्पे, दिनकर खुस्पे, जगन्नाथ दळवी, तुकाराम यादव, बळीराम ठोंबरे, बाळासाहेब ठोंबरे, रामचंद्र ठोंबरे, संतोष ठोंबरे, निवृत्ती ठोंबरे, दिलीप ठोंबरे, सुधीर ठोंबरे, कातळगेवाडीचे उपसरपंच भरत मोरे, संदीप जाधव, भगवान जाधव उपस्थित होते.आमदार शिंदे म्हणाले, ‘१९७२ च्या दुष्काळामध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागात मोठ्या प्रमाणात पाझर तलावांची कामे झाली आहेत. परंतु त्या कामांकडे वेळीच लक्ष न दिल्याने पाझर तलावाची गळती, गाळ साठणे अशा या परिस्थितीमुळे पाणीसाठा अद्यापही होत नव्हता. अनेक साईट्स उपलब्ध असतानाही बंधाऱ्यांची कामे न झाल्याने पावसाचे पाणी वाहून जात होते. पाण्याचे गांभीर्य ओळखून कोरेगाव विधानसभा मतदारसंघात पाझर तलाव दुरुस्ती, खोलीकरण, रुंदीकरण, नवीन सिमेंट बंधारे कामांसाठी निधी उपलब्ध करून प्रत्यक्षात कामे मार्गी लावली. पाणी साठवण क्षमतेत चांगलीच वाढ झाल्यामुळे शेतजमिनीला फायदा होऊ लागला आहे.’पाच वर्षांत मतदारसंघात ९५० कोटींची विकासकामे मार्गी लावली. निढळ ग्रामस्थ आणि त्यांचे मार्गदर्शक चंद्रकांत दळवी यांनी केलेले कार्य आदर्शवत आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी निढळला भेट देऊन कौतुकाची थाप टाकावी. यासाठी त्यांना निढळला आणण्यासाठी आग्रह धरणार आहे, असेही त्यांनी सांगितले. विजय गुरव यांनी प्रास्ताविक केले. संतोष खुस्पे यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर) सर्वांसमोर इतिहास उभा...४पावसाच्या पाण्याचा थेंबन्थेंब जमिनीत मुरला पाहिजे. पावसाचे पाणी अडविले जावे, ओढ्यांना स्वच्छ पाण्याचा पूर यावा, यासाठी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी व ग्रामस्थांनी एकसंधतेने पुढाकार घेऊन दहा वर्षांपूर्वी साखळी सिमेंट बंधारे, माती नालाबांधसह जलसंधारणाची कामे प्रभावीपणे करून जलक्रांती करण्याचा इतिहास केला आहे. हा इतिहास संपूर्ण राज्यापुढे निढळकरांनी उभा केला आहे