शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

रोजंदारीवर या, साहेब बना !

By admin | Updated: June 9, 2015 03:59 IST

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या मुंबई मुख्यालयात रोजंदारीवर लागलेल्यांना बढत्या देण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

यदु जोशी, मुंबई साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या मुंबई मुख्यालयात रोजंदारीवर लागलेल्यांना बढत्या देण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार रमेश कदम हे महामंडळाचे अध्यक्ष असताना हे प्रकार बिनबोभाटपणे घडत राहिले. जवळपास तीन वर्षे सेवा कालावधीत लिपिक ते साहाय्यक महाव्यवस्थापक अशी बढती देण्याचे उजेडात आले आहे़ वैशाली विशाल मुडळे १३ जुलै २०१० रोजी लिपिक म्हणून रोजंदारीवर लागल्या. आता त्या साहाय्यक महाव्यवस्थापक आहेत. ८ नोव्हेंबर २०१४ रोजी त्यांना ही बढती मिळाली. त्यांचा सेवा कालावधी केवळ दोन वर्षे १० महिने झालेला होता. सुजाता पांडुरंग सणस साहाय्यक लेखाधिकारी पदावर, मात्र रोजंदारीवर महामंडळात रुजू झाल्या आणि त्यांना या पदावर कायमस्वरूपी नियुक्ती देण्यात आली. कार्यालयीन साहाय्यक सुषमा रामकृष्ण कसबे यांना १ वर्षे पाच महिन्यांत रोजंदारीवरून कायम करण्यात आले. अपूर्वा बावणे, मीनाक्षी अरुण टुंबरे, दर्शन रमेश जोशी यांच्याबाबत असेच घडले. ११ महिने ते २ वर्षांच्या कालावधीत त्यांना कायम करण्यात आले. याच कर्मचाऱ्यांवर एवढी कृपादृष्टी का दाखविण्यात आली, याबाबत उलटसुलट चर्चा आहे. जिल्हा व्यवस्थापकांचा कार्यकारी भार लिपिकांना देण्याचे प्रकारही महामंडळात घडले. बढत्यांव्यतिरिक्त भरतीमध्येही प्रचंड घोळ करण्यात आले. सरकारी नोकरी कोणताही अर्ज, मुलाखत, परीक्षा न देता मिळविता येते यावर महाराष्ट्रात तरी कोणाचा विश्वास बसणार नाही़ पण महामंडळात दोन-अडीच वर्षांत तब्बल ७१ कर्मचाऱ्यांची अशा पद्धतीने भरती करण्यात आली. त्यातील ५५ जणांना कायमस्वरूपी नोकरीत घेण्यात आले. महामंडळ हे स्वायत्त आहे आणि सरकारचे नियम त्याला लागू होत नाहीत, अशी उद्दाम भूमिका घेण्यात आली. ‘जम्पिंग प्रमोशन’ची महामंडळाची कबुलीया महामंडळात मनमानी बढती देण्यात आल्याची बाब महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी मान्य केली आहे. ‘लोकमत’ला दिलेल्या पत्रात महाव्यवस्थापकांनी म्हटले आहे की, २०१२-१३ ते २०१४-१५ या काळात असे प्रकार घडले. नियुक्ती वा बढतीमध्ये कोणत्याही विहित प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली नाही. नियम धाब्यावर बसविण्यात आले.‘लोकमत’च्या मालिकेचे राज्यभर पडसादच्‘लोकमत’ने या महामंडळातील ३८५ कोटींच्या घोटाळ्यांची लक्तरे वेशीवर टांगल्यानंतर आता घोटाळ्यात अडकलेल्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी होत आहे. काँग्रेसचे नेते मधुकर कांबळे म्हणाले की, इतके ढळढळीत पुरावे असताना भ्रष्टाचाऱ्यांना तातडीने गजाआड केले पाहिजे. च्क्रांतिसूर्य लहूजी साळवे विचार मंचचे अध्यक्ष दीपक सोनोने यांनी महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम यांच्या अटकेची मागणी पत्रकाद्वारे केली आहे. लालसेना या संघटनेचे अध्यक्ष गणपत भिसे हे रमेश कदम आणि इतरांच्या अटकेच्या मागणीसाठी ७ जुलैपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करणार आहेत. मनमानी कर्जवाटपाचा पर्दाफाश‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात मनमानी कर्जवाटपाचा पर्दाफाश केला होता. आज त्यातील एक धक्कादायक प्रकरण समोर आले. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील मातंग आणि तत्सम जातीच्या महिला भाग्यवानच म्हटल्या पाहिजेत. महिला समृद्धी योजनेच्या नावाखाली या ठिकाणी १ हजार ३१३ महिलांना प्रत्येकी ५० हजार याप्रमाणे ६ कोटी ५६ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज दिले. तसेच ७०५ महिलांना प्रत्येकी २५ हजार रुपये याप्रमाणे १ कोटी ७६ लाख २५ हजार रुपयांचे कर्ज देण्यात आले. चारचाकी वाहनांसाठी आठ जणांना ८७ लाख ४२ हजार ८९१ रुपये कर्ज देण्यात आले. असे मोहोळ तालुक्यात १० कोटी ९८ लाख १७ हजार ८९१ रुपये वाटण्यात आले.