शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

“BJP वाल्यांनी शुद्धीत राहून बोलावं, राज्य सरकार केंद्राच्या सूचनेनुसार काम करतंय”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 4:08 PM

भाजपच्या शंखनाद आंदोलनावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणेच राज्य सरकार काम करत आहेभाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी शुद्धीवर असल्यासारखी वक्तव्ये करावीभाजपचा शंखनाद राज्य सरकारच्या नसून केंद्र सरकारच्या विरोधात असावा

मुंबई: महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार भाविकांसाठी मंदिरे खुली करत नसल्याबाबत भाजप चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. भाजपची राज्यात विविध ठिकाणी सरकारविरोधी आंदोलने सुरू आहेत. पुणे, पंढरपुर, नाशिक, औरंगाबाद, नागपूरमध्ये भाजपकडून निदर्शने सुरू असून, काही ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांचा विरोधाला झुगारून थेट मंदिरात शिरण्याचाही प्रयत्न केला आहे. भाजपच्या शंखनाद आंदोलनावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी जोरदार टीका केली असून, BJP वाल्यांनी शुद्धीत राहून बोलावे, राज्य सरकार केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनुसार काम करत आहे, असा टोलाही लगावला आहे. (vijay wadettiwar criticised bjp over agitation to reopen temples)

“शिवसेनेची टीम लूटमार करतेय, ही आहे ठाकरे सरकारची ‘महान’ ११”; भाजपचे टीकास्त्र

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वात पुण्यात कसबा गणेश मंदिराबाहेर घंटानाद आंदोलन करत चंद्रकांत पाटील यांनी नियम मोडून मंदिरात शिरण्याचा आक्रमक पवित्रा घेतला. पंढरपुरात भाजपकडून जोरदार आंदोलन केले असून कार्यकर्त्यांनी नामदेव पायरीजवळील भिंत ओलांडून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. नागपूर आणि औरंगाबादमध्येही भाजपकडून जोरदार आंदोलन सुरू असून, मंदिरे खुली करण्याच्या मागणीवर कार्यकर्ते ठाम आहेत. ठिकठिकाणी ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी आणि निदर्शने केली जात आहेत. यावर विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार पलटवार करत प्रत्युत्तर दिले. 

“आता पळपुटेपणा न करता हिंमत असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जा”; नितेश राणेंचा टोला

राज्य सरकार केंद्राच्या सूचनेनुसार काम करतेय

केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणेच राज्य सरकार काम करत आहे. त्यामुळं भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी शुद्धीवर असल्यासारखी वक्तव्ये करावी आणि विचार करून भूमिका घ्यावी. भाजपचे सरकार असलेल्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटकात काय सुरू आहे? तिथे कुठे मंदिरे उघडी आहेत? तिथे दारूची दुकाने सुरू नाहीत का? त्यामुळे भाजपच्या लोकांनी शुद्धीवर असल्यासारखे बोलावे. बेधुंद असल्यासारखे बोलू नये, असा पलटवार विजय वडेट्टीवार यांनी केला. 

“योग्य वेळ आली की सीडी लावणार”; एकनाथ खडसेंनी दिला थेट इशारा

केंद्र सरकारकडून निर्बंधांच्या सूचना

मंदिरे उघडण्याचा विषयच नाही. केंद्र सरकारने निर्बंधांच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसारच राज्य सरकार पावले टाकत आहे. केंद्र सरकारच्या सूचना फक्त राज्यासाठी नाहीत, संपूर्ण देशासाठी आहेत. केरळमध्ये अवघ्या चार दिवसांत पुन्हा १ लाखांहून अधिक नवे करोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे भूमिका घेताना केवळ सरकारला विरोध म्हणून न बोलता भाजपवाल्यांनी लोकांचा विचार करावा, असा टोला लगावत धार्मिक भावना भडकवून मत मिळवणे एवढेच भाजपचे काम आहे. खरे तर भाजपवाल्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडे घालायला हवे. त्यांचा हा शंखनाद राज्य सरकारच्या नसून केंद्र सरकारच्या विरोधात असावा, असा दावा वडेट्टीवार यांनी केला. ते 'टीव्ही ९'शी बोलत होते. 

“असं कधीच पाहिलं नाही; आमचेच नेते आणि मंत्र्यांना टार्गेट केलं जातंय”; सुप्रिया सुळेंची टीका

दरम्यान, राज्यांनी लसीकरण मोहिमेला वेग दिला पाहिजे. त्यासाठी अधिक लसमात्रांची गरज असेल तर तातडीने केंद्राकडून अपेक्षित लसमात्रा राज्यांना पुरवल्या जातील, असे केंद्रीय गृहसचिवांनी राज्यांना सांगितले होते. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले पाहिजे व सणासुदींच्या दिवसांमध्ये सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी टाळली पाहिजे, असेही केंद्र सरकारने राज्यांना स्पष्ट केले होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारBJPभाजपाTempleमंदिरagitationआंदोलन