शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

मुलींवर झाले उपनयन संस्कार

By admin | Updated: August 17, 2016 21:38 IST

मुलांचे उपनयन संस्कार करणे, हे सर्वांना परिचित आहे.

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 17 - मुलांचे उपनयन संस्कार करणे, हे सर्वांना परिचित आहे. परंतू मुलींवर सामूहिक उपनयन संस्कार करण्याचा सोहळा बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडला. शहरातील गारखेडा परिसर येथील आर्य समाजाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ८ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या ३० मुली आणि ७ मुलांवर या कार्यक्रमात उपनयन संस्कार करण्यात आले. खूप पुर्वी मुलींवर उपनयन संस्कार करण्याची पद्धत प्रचलित होती. याशिवाय उपनयन संस्कार हा केवळ ह्यब्राह्मणह्ण समाजापुरता मर्यादित नसून तो ह्यहिंदूह्ण लोकांचा संस्कार आहे. स्त्री असो अथवा पुरूष प्रत्येक ह्यहिंदू ह्णला तो करण्याचा अधिकार आहे, त्यामुळे सामाजिक समता येण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. याच तत्त्वाला अनुसरूण या कार्यक्रमात ब्राह्मण समाजापेक्षा इतर समाजातील बालिकांचे प्रमाण अधिक आढळून आले. महाराष्ट्रात दिड हजार वर्षांनंतर प्रथमच मुलींवर सामुहिक उपनयन संस्कार करण्यात आले असून शहरात हा कार्यक्रम पहिल्यांदाच होत असल्याचे प्रा. रमेश पांडव यांनी सांगितले. शहरवासीयांसाठी तर ही घटना अगदीच नविण्यपुर्ण आहे. यामध्ये ह्यसंजापाह्ण (मुंज या सोहळ्यातील केस कापण्याचा विधी) हा विधी सोडून वैदिक पद्धतीने मुलींची मुंज लावण्यात आली. या कार्यक्रमाचे पौरोहित्यदेखील एका महिला विदुषीने केले. आचार्या नंदिता शास्त्री चतुर्वेदी या खास वाराणसी येथून या कार्यक्रमासाठी शहरात आल्या होत्या. त्यांच्या पौरोहित्याखाली हा सोहळा पार पडला. याप्रसंगी प्रा. रमेश ठाकूर, डॉ. लक्ष्मण माने, प्रविण माळी, ज्योती तोष्णीवाल, माधव शास्त्री, प्रतिभा शिंदे, महिपाल व्यवहारे, डॉ. सुजाता क रजगावकर, मंगलमुर्ती शास्त्री , अर्चना गणगे आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. स्वस्तीवचन, शांतीकरणम, मेखला बंधन, संध्या वंदन, गायत्री मंत्राचा उपदेश, आर्शिवचन, आणि हवन असे विधी या संस्कारात समाविष्ठ आहेत. सोळा संस्कारांपैकी एक असणारा उपनयन संस्कार झाल्यानंतर प्रत्येकाला तीन धागे असलेले यज्ञोपवीत (जाणवे) देण्यात आले. या संस्कारानंतर ती व्यक्ती माता-पिता ऋण, गुरू ऋण आणि समाज ऋण फेडण्याचा अधिकारी झाला आहे, असे समजण्यात येते. आचार्या नंदिता शास्त्री यांनी बालिकांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की मुलींना उपनयन संस्काराचे अधिकार आहेत, याचे दाखले प्रत्येक वेदात आढळून येतात. नंदिता शास्त्री या वाराणसी येथील वेद विद्यालयाच्या प्रधान असून त्यांना चारही वेद मुखोद्गत आहेत. पांढऱ्या रंगाची वेशभुषा करून अत्यंत साधेपणाने बालिका या सोहळ्यासाठी तयार झाल्या होत्या.