शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

वंचित बहुजन आघाडीत 'या' ठिकाणी हवी एमआयएमला उमदेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 3:15 PM

औरंगाबाद लोकसभेत विजय मिळवल्यानंतर एमआयएम पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. आणि त्याचांच पुढचा भाग म्हणून एमआयएमनं राज्यात वंचित बहूजन आघाडीकडे विधानसभेच्या १०० जागांची मागणी केली आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. सगळेच राजकीय पक्ष जोरात कामाला लागले आहे. त्यात या निवडणूकीत महाराष्ट्रात पहिल्यांदाच खासदारकी जिंकणार एमआयएम सुद्धा रिंगणात उतरलं आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेत ही वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्याखाली निवडणूक लढताना एमआयएमनं १०० जागांची मागणी केली आहे. यात औरंगाबादेत,बीड,परभणी आणि नांदेडसह मुस्लिम बहूल भागात एमआयएमनं उमेदवारीची मागणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

औरंगाबाद लोकसभेत विजय मिळवल्यानंतर एमआयएम पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. आणि त्याचांच पुढचा भाग म्हणून एमआयएमनं राज्यात वंचित बहूजन आघाडीकडे विधानसभेच्या १०० जागांची मागणी केली आहे. त्यासाठी एमआयएनं एक यादीही आंबेडकरांना दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यात औरंगाबादेत,बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर, ठाणे, मुंबईतल्या काही जागा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातही मुस्लिम बहूल भागातील काही मतदारसंघाचा समावेश आहे. तर एकट्या औरंगाबाद जिल्हात ४ जागांची मागणी एमआयएमने केली आहे.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे विरोधकांचा मोठ नुकसान झाले. खास करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे. वंचितला एकगठ्ठा मुस्लीम आणि दलित मते मिळाल्याने महाआघाडीच्या मतांमध्ये फुट पडली. त्यामुळे मुस्लिम दलित मतं एका ठिकाणी आली तर काय होवू शकते याची प्रचिती मात्र या निवडणूकीत आली, त्यानुसार एमआयएमनं आता मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

तर यावर बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, एमआयएम विधानसभेला १०० जागा लढवणार आहे, अशी चर्चा असली तरी अद्याप तसे ठरलेले नाही. माझी व खासदार असदुद्दीन ओवेसी यांची दिल्लीत बैठक झाली. त्यात उमेदवार जिंकण्याच्या शक्यता हा निकष लावून जागावाटप करायचे ठरले आहे.