शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

महाराष्ट्राला दिलासा! यूजीसीकडून परीक्षा घेण्यास १ महिन्याची मुदतवाढ; राज्य सरकारची विनंती मान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 11:10 PM

३० ऑक्टोबरपर्यंत परीक्षा घेता येणार; नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याच्या सूचना

मुंबई: विद्यापीठ अनुदान आयोगानं (यूजीसी) राज्य सरकारला दिलासा दिला आहे. विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यासाठी यूजीसीनं राज्य सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. राज्यातील कोरोना संकटाचा विचार करता परीक्षा घेण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती राज्य सरकारकडून करण्यात आली होती. या विनंतीचा सकारात्मक विचार करून यूजीसीनं एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारला ३० ऑक्टोबरपर्यंत परीक्षा घ्याव्या लागतील. महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा विचार करता, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाऊ नयेत, अशी मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. तसा निर्णयदेखील राज्य सरकारनं घेतला होता. मात्र अंतिम वर्षाची परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना आधीच्या वर्षांतील कामगिरीच्या आधारे पदवी देण्याचा किंवा पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय कायद्याला धरून नाही. परिणामी अंतिम परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांना पदवी देता येणार नाही, असा निकाल न्यायालयानं दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणारच हे स्पष्ट झालं. मात्र राज्यातील सध्याची स्थिती पाहता सरकारनं यूजीसीकडे एक महिन्याची वाढीव मुदत मागितली. राज्य सरकारची ही विनंती यूजीसीनं मान्य केली. त्यामुळे आता ३० ऑक्टोबरपर्यंत परीक्षा घेता येतील. परीक्षा घेतल्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात निकाल जाहीर करण्याच्या सूचना यूजीसीनं राज्य सरकारला केल्या आहेत. 

टॅग्स :universityविद्यापीठSupreme Courtसर्वोच्च न्यायालय