शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

युगांडा, केनियाचे पुढचे पाऊल

By admin | Updated: December 5, 2014 11:17 IST

युगांडा आणि केनिया हे दोन छोटेसे देश. पण, त्यांनीही महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल भारतासारख्या महासत्ता होऊ पाहणाऱ्या देशासाठी एक धडाच असल्याचे वास्तव येथील उच्चायुक्तांनी उलगडले.

संसदेत ३३ टक्केंहून जादा महिला : औद्योगिक कंत्राटांमध्येही आरक्षणपुणे : आफ्रिकेतील युगांडा आणि केनिया हे दोन छोटेसे देश. पण, त्यांनीही महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल भारतासारख्या महासत्ता होऊ पाहणाऱ्या देशासाठी एक धडाच असल्याचे वास्तव येथील उच्चायुक्तांनी उलगडले. या दोन्ही देशांच्या भारतातील उच्चायुक्त महिलाच असल्याने त्या आवर्जून ‘लोकमत वुमेन समिट’च्या चर्चासत्रात सहभागी झाल्या होत्या. ‘स्टेटस आॅफ इंडो-अफ्रिकन वर्किंग वूमन’ या विषयावर परिसंवादात भारतातील युगांडाच्या उच्चायुक्त एलिझाबेथ पायला नापेयॉक आणि केनियाच्या उच्चायुक्त फ्लॉरेन्स इमिसा वेचे यांच्यासह खासदार विजय दर्डा सहभागी झाले होते. युगांडा हा अजूनही टोळीपद्धत असलेला देश. विवाहाच्या वेळी मुलीच्या वडिलांना गायींच्या रूपाने हुंडा देण्याची येथील पद्धत होती. पण शिक्षणाच्या वाटेवर दमदार पावले टाकत येथील परिस्थिती बदलली असल्याचे सांगताना नापेयॉक म्हणाल्या, ‘‘आमच्या संसदेमध्ये महिलांना ३० टक्के आरक्षण आहेच. पण त्याचबरोबर सर्वसाधारण जागांतूनही महिला निवडून येतात. त्यामुळे ३०० सदस्यांच्या सभागृहात आता महिलांची संख्या १२० आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण पहिल्यापासून आहेच.’’ महिलांना केवळ राजकीय- सामाजिकच नव्हे, तर आर्थिक पातळीवरही स्वातंत्र्य देण्यासाठी केनियाने उचललेल्या पावलांची माहिती देताना फ्लॉरेन्स वेचे म्हणाल्या, ‘‘तर केनियामध्ये औद्योगिक क्षेत्रासाठी काढण्यात येणाऱ्या निविदांमध्येही महिलांसाठी आरक्षण आहे. व्यापार-उद्योगांत महिलांनी पुढे येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. निर्णयप्रक्रियेत त्यांना स्थान देण्याचा प्रयत्न आहे.’’ खासदार दर्डा म्हणाले, ‘‘महिलांच्या प्रश्नांचे स्वरूप हे वैश्विक आहे. एक महिला संस्कारित झाली तर संपूर्ण कुटुंब संस्कारित होते, हे सर्वत्र दिसते. त्या दृष्टीने आपण महिलांना स्वतंत्र आणि गौरवास्पद स्थान देणे गरजेचे आहे.’’ -----------’’ महिला ‘ट्रॉफी’’ आहेत याभावनेतून आजही त्यांच्याकडे पाहिले जाते. लग्नाच्या वेळीस वर रितसर पैसे देऊन वधूला आपल्याकडे आणण्याची आजही केनियामध्ये प्रथा आहे. महिलांनी मुलालाच जन्म देण्याचा आग्रह केला जात होता.मुलीच जास्त काळजी घेतात, याची जाणीव होत आहे. मुलींना शिक्षण देण्याचे प्रमाण वाढत आहे.  - फ्लॉरेंस इमिसा विचे, केनियाच्या भारतातील उच्चायुक्त ------------युगांडामध्ये जातिव्यवस्था नाही. टोळ्यांमध्येही आपसांत लग्न होतात. शिक्षण आणि डॉट कॉमच्या क्रांतीमुळे वधूसाठी हुंडा घेण्याची पद्धत बंद होत आहे. त्यामुळे हुंडा केवळ प्रतीकात्मक घेतला जातो. मुलींनी स्वत:ला सिद्ध केले असल्याने मुलगाच हवा ही मानसिकताही कमी झाली आहे. मुलीच अधिक काळजी घेतात, हे पटू लागले आहे. एलिझाबेथ नापेयॉकन, युुगांडाच्या भारतातील उच्चायुक्त ------------महिलेला संधी द्या... निवड चुकणार नाहीयुगांडामध्ये गेल्या वर्षी अध्यक्षपदासाठी एक महिला रिंगणात होत्या. त्यांच्या प्रचाराचे सूत्रच होते महिलेला संधी द्या...तुमची निवड कधीही चुकणार नाही. याचे कारण म्हणजे महिला विचार करताना मेंदूबरोबरच हृदयापासून विचार करते. महिलेला संधी मिळाली की ती नेहमीच चांगले काम करते, असे एलिझाबेथ नापेयॉकन यांनी सांगितले. आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.