शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी 'मातोश्री' बंगल्यासमोर नतमस्तक अन् संध्याकाळी शिंदेसेनेत घेतला पक्षप्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 10:25 IST

मालक आणि नोकर बनवून पक्ष मोठा होत नाही. आपल्याकडून लोक का जातायेत याचं कधीतरी आत्मपरीक्षण करणार की नाही असा सवाल एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना विचारला.

मुंबई - आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. 'ऑपरेशन टायगर' मोहिम हाती घेत शिंदेसेनेने ठाकरेंकडील नेत्यांना पक्षात घेण्याचा चंग बांधला आहे. अलीकडेच राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरेंची साथ सोडली. त्यानंतर ते शिंदेसेनेत दाखल झाले. ठाकरेंची साथ सोडणाऱ्या नेत्यांची सध्या रीघ लागली आहे त्यात मातोश्री असलेल्या वांद्रे परिसरातच ठाकरेंना धक्का बसला. 

वांद्रे येथील उपविभाग प्रमुख जितेंद्र जानावळे यांनी पक्षात अन्याय होत आहे असं सांगत त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जानावळे यांनी मातोश्रीत जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत त्यांनी पक्षात अन्याय होत असल्याचा सूर आवळला. त्यानंतर ते मातोश्रीतून बाहेर पडले आणि बंगल्याबाहेर नतमस्तक झाले. जितेंद्र जानावळे पक्षात राहणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत असतानाच संध्याकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

देशाला हिंदुत्वाचे विचार देणारे एकमेव नेते बाळासाहेब ठाकरे होते. मात्र उद्धव ठाकरेंना खुर्चीचा मोह झाला आणि सगळं संपलं. ते मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना पक्ष फुटला नसता. तुम्ही सहकाऱ्यांना नोकर समजायला लागलात. मालक आणि नोकर बनवून पक्ष मोठा होत नाही. आपल्याकडून लोक का जातायेत याचं कधीतरी आत्मपरीक्षण करणार की नाही. आज जितू आपल्याकडे आला. मातोश्रीवर पहिली मशाल घेऊन जाणारा हा जितेंद्रने आज धनुष्यबाण हाती घेतला. जो जाईल तो कचरा, त्यांना नवनवीन उपाध्या देतात असं सांगत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

जानावळेंनी काय आरोप केले?

विलेपार्ले विधानसभेबाबत निर्णय घेणारे संजय राऊत आणि अनिल परब कोण आहेत? ही विधानसभा ‘आप’ला दिली होती. पण आम्ही ‘झाडू’बरोबर काम करायला विरोध दर्शवला. त्यामुळे ती जागा शिवसेनेकडे आली. भाजपाकडून ती जागा काढून शिवसेनेकडे घ्यायची होती, ही माझी इच्छा होती. पण माझी इच्छा लक्षात न घेता मला बाहेरच्या वॉर्डात टाकले. म्हणजे तुमचे मनसुबे काय आहेत? तुम्हाला संघटना जिंकवायची आहे की भाजपा जिंकवायची आहे? असा आरोप करत उद्धव ठाकरे यांच्यावर माझा राग नाही. विभागीय राजकारण सुरू होते, त्याला कंटाळलो होतो. माझी राजकीय कोंडी विभागात केली. एवढे मी लढलो, माझी नोकरी आणि घर गेले. तरीही मी जिद्दीने उभा होतो असं जितेंद्र जानावळे यांनी म्हटलं होते. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे