शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमीयुगुलांना उद्ध्वस्त करणाऱ्या टोळ्या सक्रिय

By admin | Updated: December 4, 2014 00:48 IST

शहराबाहेर सामसूम रस्त्यांवर गुन्हेगारांच्या टोळ्या प्रेमीयुगुलांना उद्ध्वस्त करीत आहेत. बदनामीच्या भीतीने या टोळ्यांच्या कृत्यांवर आपोआप पडदा पडत आहे. कळमना भागात घडलेल्या एका शिक्षिकेवरील

नराधम अंधारातच : शिक्षिकेवर सामूहिक बलात्कारानंतर भयावह वास्तव उजेडातराहुल अवसरे - नागपूरशहराबाहेर सामसूम रस्त्यांवर गुन्हेगारांच्या टोळ्या प्रेमीयुगुलांना उद्ध्वस्त करीत आहेत. बदनामीच्या भीतीने या टोळ्यांच्या कृत्यांवर आपोआप पडदा पडत आहे. कळमना भागात घडलेल्या एका शिक्षिकेवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेला ४८ तास लोटले. परंतु अद्यापही आरोपी गवसले नाहीत. हे घृणित कृत्य याच टोळीचे असावे, अशी शंका व्यक्त केली जात आहे. १ डिसेंबरच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास मोटरसायकलींवर असलेल्या पाच नराधमांनी स्वत:ला पोलीस असल्याचे सांगून कापसी उड्डाण पुलावरून आपल्या प्रियकरासोबत येत असलेल्या शिक्षिकेला पळवून नेऊन सामूहिक बलात्कार केला. लपवा-छपवीचे प्रेम मोबाईल फोन उपलब्ध झाल्यापासून प्रेमप्रकरणे फुलू लागली आहेत. प्रेमसंबंध घरच्यांना अंधारात ठेवून केले जात आहेत. प्रेमीयुगुले एकांतवास मिळावा म्हणून शहराबाहेरील निर्जन ठिकाणे शोधतात. तोंडाला फडके बांधलेली ही युगुले मोटारसायकलींवर मोठ्या प्रमाणावर एकांताच्या शोधात ‘हाय-वे’वर नजरेस पडतात. कुण्या ओळखीच्या व्यक्तीला आपण दिसू नये, आपले प्रेम घरच्या लोकांना माहीत होऊ नये, यासाठीच तोंडाला फडके बांधून ते स्वत:ची ओळख लपवतात. केवळ बदनामीची भीतीयुगुले आपापल्या कुटुंबाला माहीत होऊ न देता प्रेम करतात याची जाणीव या टोळीला असते. त्यामुळेच दररोज किमान दोन युगुले या टोळ्यांची शिकार होतात. उद्ध्वस्त प्रेमीयुगुलाने पोलिसात तक्रार केलीच तर केवळ जबरीचोरीचा गुन्हा दाखल होतो. कारण पीडित तरुणी केवळ बदनामीच्या भीतीने मुद्दाम बलात्काराच्या घटनेला अंधारात ठेवत असते.शहरात अशा तीन-चार टोळ्या सक्रिय आहेत. एका टोळीचा म्होरक्या अफरोज याला २०१२ मध्ये एका खुनाच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. आता तो उच्च न्यायालयातून निर्दोष सुटला आहे. अन् टोळ्या घेतात गैरफायदालपून-छपून केल्या जाणाऱ्या प्रेमसंबंधांचा सक्रिय झालेल्या गुन्हेगारी टोळ्या गैरफायदा घेत आहेत. गुन्हेगारांच्या या टोळ्या शिकाऱ्याप्रमाणेच प्रेमीयुगुलांच्या मागावरच असतात. प्रत्येक टोळीत चार ते पाच सदस्य असतात. त्यांच्याजवळ चोरीच्या मोटारसायकली असतात. नंबर प्लेट बदललेली असते. सामसूम ठिकाणी घेराबंदी करून टोळीतील माणसे लफडेवाले है असे म्हणत प्रेमीयुगुलांवर झडप घेतात. स्वत:ला पोलीस सांगत युगुलांना दाट झाडीत घेऊन जातात. जीवाच्या भीतीने कुणी ओरडतही नाही. आधी दोघांचीही झडती घेऊन मोबाईल, घड्याळ, पैसे, सोन्याचे दागिने हिसकावून घेतात. त्यानंतर असहाय प्रेयसी प्रियकराच्या डोळ्यादेखत या टोळीच्या वासनेला बळी पडते. तिच्यावर सामूहिक बलात्कार होतो. ही टोळी प्रियकरावर दबाव टाकून त्याला प्रेयसीवर बलात्कार करायला लावते. त्याने तसे केले नाही तर अमानवीपणे त्याला मारहाण केली जाते. प्रेमीयुगुलांचे नाव व पत्ते घेऊन अटक करून बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांना सोडून देतात. तरुणीवर बलात्कार अन् प्रियकराचा खूनअफरोजच्या टोळीने १६ जून २००५ रोजी शिवणगावनजीकच्या कलकुही येथील अशुकामाशुका दर्ग्याच्या परिसरात बसलेल्या एका प्रेमीयुगुलाला पकडले होते.प्रियकर हा उमरेड मार्गावरील एका बारचा संचालक होता. तो विवाहित असूनही त्याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. या तरुणीचाही अन्य दुसऱ्यासोबत विवाह जुळला होता. अफरोजच्या टोळीने या दोघांना दाट झाडीत नेऊन त्यांच्याजवळील किमती वस्तू व पैसे हिसकावून घेतले होते. टोळीने स्वत:पुढेच प्रियकराला प्रेयसीसोबत संबंध करण्यास सांगितले. नकार देताच त्याला मारहाण केली. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न करताच टोळीतील सदस्यांनी त्याचा निर्घृण खून केला. नराधमांनी तरुणीला रात्रभर ओलीस ठेवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सोनेगाव पोलिसांनी खुनाचे प्रकरण उजेडात आणत पीडित तरुणीलाही त्यांनी हुडकून काढले होते. केवळ बदनामीमुळे तिने स्वत:सोबत घडलेल्या प्रसंगाची वाच्यता केली नव्हती.