शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात रोज तीन शेतक-यांच्या आत्महत्या

By admin | Updated: June 11, 2015 12:14 IST

राज्यातील शेतक-यांच्या आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून महाराष्ट्रात रोज तीन शेतकरी आत्महत्या करत असल्याचे समोर आले आहे. २०१५ मेपर्यंत राज्यात एकूण १,०८८ शेतक-यांनी आत्महत्या केली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - राज्यातील शेतक-यांच्या आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून महाराष्ट्रात रोज तीन शेतकरी आत्महत्या करत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. २०१५ मेपर्यंत राज्यात एकूण १,०८८ शेतक-यांनी आत्महत्या केली असून दोन महिन्यांत हे प्रमाण दुपटीने वाढले आहे. जानेवारी ते मार्चदरम्यान ६०१ शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे राज्य सरकारने नमूद केले होते. गेल्या वर्षी आलेल्या दुष्काळामुळे अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले आणि त्यानंतर आलेला अवकाळी पाऊस व वादळामुळे परिस्थिती आणखीनच बिघडली. 
राज्यातील परिस्थिती इतकी भीषण असतानाच सरकारने निम्म्याहून अधिक शेतक-यांच्या आत्महत्या मदतीसाठी 'अपात्र' ठरवल्या आहेत. १०८८ पैकी अवघ्या ५४५  ( आत्महत्येच्या) केसेस नुकसानभरपाईसाठी पात्र ठरत असल्याचे समोर आले आहे. त्या पात्रतेचेही काही निकष आहेत. ज्या शेतक-याने जीव दिला त्याच्या नावावरच जमीन असेल आणि कर्जबाजारीपणाचा ठोस पुरावा असेल तरच ती आत्महत्या नुकसानभरपाईसाठी 'पात्र' ठरते. आत्महत्याग्रस्त शेतक-यांचा आकडा कमी दिसावा यासाठी हे निकष आहेत असे टीकाकारांचे म्हणणे आहे. मात्र असे असले तरीही मार्च ते मे महिन्यादरम्यान 'पात्र आत्महत्यांचे' प्रमाण २४१ वरून वाढून ५४५ वर पोचले आहे. 
ही माहिती महसूल विभागाच्या मुख्यालयातून मिळाली असून राज्य सरकारने ती अद्याप संकलित केलेली नाही. मात्र नॅशनल क्राईम ब्युरोकडून मिळालेल्या माहितीच्या तुलनेत हे आकडे अतिशय कमी असल्याचे टीकाकारांचे म्हणणे आहे. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्या विदर्भात शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वात अधिक आहे. १०८८ पैकी ५६४ केसेस या विदर्भातील आहेत. विदर्भातील शेतक-यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात ७६ टक्के वाढ झाली असून मार्चमध्ये विदर्भात ३१९ शेतक-यांनी आपले जीवन संपवले होते. तर मराठवाड्यात ३६७ केसेस असून मार्चपर्यंत हेच प्रमाण २१५ इतके होते. 
अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसलेल्या नाशिकमध्येही मे अखेरपर्यंत १३० शेतक-यांनी आत्महत्या केली तर पुण्यात २६ व कोकणात एका शेतक-याने आपले जीवन संपवले आहे. 
शेतक-यांच्या आत्महत्या रोखणे हीच आमची प्राथमिकता असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केल्यानंतरही आत्महत्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यावर  'आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. शेतकरी आत्महत्येचा हा गंभीर प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून एका रात्रीतच तो सुधारता येऊ शकत नाही' असे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.
याप्रकरणी सरकारने आत्तापर्यंत ९० लाख शेतक-यांना ४ हजार कोटींची मदत नुकसानभरपाई जाहीर केली आह. तसेच ३५ लाख शेतकरी १६०० कोटींच्या पीक विम्यासाठी पात्र ठरल्याचेस सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. 
मात्र शेतक-यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्यात सरकार अपयशी ठरले, असे शेतकरी संघटनांच्या नेत्यांचे म्हणणे आहे. 'ही समस्या अतिशय बिकट बनली आहे. पीक पेरणीचा खर्च वाढतच चालला असला तरी विक्री किंमत मात्र अजूनही तितकीच (कमी) आहे' असे त्यांचे म्हणणे आहे.