शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

कायद्यातच ‘दुष्काळ’ नाही, तर मदत कुठली?

By admin | Updated: September 24, 2015 00:24 IST

बुधाजीराव मुळीक : सरकारच्या नाकर्तेपणावर बोट; एनपीए तरतूद शेतीसाठी वापरावी

कोल्हापूर : कायद्यातच ‘दुष्काळी’ हा शब्द नसल्याने शेतकऱ्यांना मदत मिळूच शकत नाही. इतर राज्यांप्रमाणे कायद्यात बदल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली पण त्याबाबत कोणी फारसे गांभीर्याने घेत नसल्याची खंत ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी कोल्हापुरात मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. डॉ. मुळीक म्हणाले, दुष्काळाने राज्य होरपळून निघाले आहे, राजकीय पक्षाची मंडळी केवळ भेटी देण्याचे काम करत आहेत; पण मुळात आपल्या कायद्यातच ‘दुष्काळी’ असा उल्लेख नसल्याने तो जाहीर करून त्यानुसार मदत करण्यावर सरकारवर मर्यादा येत आहेत. ‘दुष्काळ’ शब्द राहू दे ‘तीव्र टंचाई’ असाही उल्लेख नसल्याने शासन केवळ ‘टंचाई’ अशाच शब्दप्रयोगात अडकले आहे. कायद्याने जबाबदारीत अडकण्यात सरकार तयार नाही. ‘दुष्काळ’ जाहीर केला तर सर्व जबाबदाऱ्या महसूल विभागावर येतात. थकीत कर्जासाठी बँका तगादा लावत नाहीत, यासह केंद्राकडूनही न मागता मदत मिळू शकते. कायद्यातील त्रुटी माहीत असून दुरूस्त करत नसेल तर हा गुन्हाच आहे. यावेळी शेती पदवीधर असोसिएशनचे अध्यक्ष अरुण नरके, विजयराव भोसले, डॉ. नामदेव मदने, डॉ. जे. पी. पाटील, डॉ. एन. डी. जांभळे, अरुण मराठे, भरत मोळे, आदी उपस्थित होते. ...तर आत्महत्याच होणार नाहीतकायद्यात बदल करून ‘दुष्काळ’ जाहीर करण्याबाबत आपण २२ जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. असेच चालले तर लोक संपतील. यासाठी, ‘आत्महत्या करू नका, तुमच्या कर्जाची जबाबदारी आमची,’ अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली तर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही; पण हे होईल का? असा सवाल डॉ. मुळीक यांनी उपस्थित केला. राज्यात पूर्णवेळ व अर्धवेळ शेतकरी आहेत. इतर व्यवसाय, नोकरी सांभाळून शेती करणाऱ्यांवर दुष्काळासह इतर संकटांचा परिणाम होत नाही; पण पूर्णवेळ शेती करणारा लगेच अडचणीत येतो; पण दुर्दैवाने शासनाच्या सर्वाधिक सुविधा या अर्धवेळ शेतकऱ्यांनाच मिळतात, असे डॉ. मुळीक यांनी सांगितले. खालील उपाययोजना कराव्यात शेतीसाठी एनपीए तरतूद वापरावी.दुष्काळग्रस्त कुटुंबीयांना बिनव्याजी १५ हजार खावटी कर्ज द्याविद्यार्थांच्या शिक्षणाचा खर्च शासनाने करावापश्चिम घाटावरील गवताचे लायलेज करून त्याचा वापर करावा.साखर कारखान्यांच्या मोलॅसिसमध्ये मिनरलचा वापर करून पेंड करावी.कुटुंबातील दोन व्यक्तींना त्यांच्याच जमिनीत मृदू जलसंधारणाचे काम द्यावेअपूर्ण सिंचन प्रकल्पांना केंद्राने ‘एआयबीपी’ अंतर्गत निधी द्यावा.जूनपासूनच कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरू करावा, त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी. शेती व्यवस्थापनाचे धोके सुरक्षित केले पाहिजेत.हमी भाव देऊन पीक पद्धतीत बदलास प्रोत्साहन द्यावे.