शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
5
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
6
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
7
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
8
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
9
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
10
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
11
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
12
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
13
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
14
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
15
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
16
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
17
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
18
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
19
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
20
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"

...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 17:56 IST

तटकरे म्हणाले, "संजय राऊतांनी सुरुवात केली की, उद्धवजी दिल्लीवरून आल्यापासून या मन:स्थितीत आले आहेत की, आपण महाविकास आघाडीचे सरकार पाडूयात. राजीनामा देऊयात, बाहेर पडूयात आणि भाजपसोबत सरकार स्थापन करूया..."

संपूर्ण राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांचा कंबर कसून प्रचार करत आहेत. दरम्यान, नेते मंडळी एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे करतानाही दिसत आहेत. यातून, आजपर्यंत जनतेच्या समोर न आलेल्या अनेक गोपनीय गोष्टी, घटना, घडामोडी समोर येत आहेत. नेते मंडळींकडून अशा अनेक घटनांचे खुलासे, दावे आणि गौप्यस्फोट होत आहेत. यातच आज लोकमतसोबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात एक मोठा गोप्यस्फोट केला आहे. लोकमत डिजिटल मीडियाचे संपादक आशिष जाधव यांनी त्यांची मुलाखत घेतली.

यावेळी, उद्धव ठाकरे फॅक्टर चालतोय, असे रिपोर्ट आहेत. तुमची काय भूमिका आहे? कारण काल-परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मुलाखती म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना जेव्हा-जेव्हा मदत लागेल तेव्हा मी धावून जाईल, मी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत होतो. एक विंडो भाजपने उद्धव ठाकरेंसमोर ओपन केली अशी चर्चा आहे. यावर बोलताना तटकरे यांनी मोठा गोप्यस्फोट केला. ते म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या संदर्भात वक्तव्य केले हे मला माहीत नाही आणि राज्याचे मुख्यमत्री म्हणून उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री म्हणून अजित दादा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, हे पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्यासाठी गेले होते. तिघांची एकत्रित चर्चा झाल्यानंतर, हे दोघेही बाहेर आले आणि पंतप्रधान-उद्धवजी यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. या चर्चेनंतर, उद्धवजी मुंबईला आल्यानंतर, सात-आठ दिवसांनी संजय राऊतांचा मला फोन आला की, कीही करून मला अजित दादांना भेटायचे आहे. एक दिवस अजित दादांनी वेळ दिली होती. मात्र ती होऊ शकली नाही. संजय राऊत नाराज झाले. मी पुन्हा दादांची समजूत घातली. यानंतर, मुंबईच्याच एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ती बैठक झाली. त्यावेळी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि मिलिंद नार्वेकरही तेथे होते."

तटकरे पुढे म्हणाले, "संजय राऊतांनी सुरुवात केली की, उद्धवजी दिल्लीवरून आल्यापासून या मन:स्थितीत आले आहेत की, आपण महाविकास आघाडीचे सरकार पाडूयात. राजीनामा देऊयात, बाहेर पडूयात आणि भाजपसोबत सरकार स्थापन करूया. उद्धवजींनी संजय राउतासोबत तीन-चार वेळा चर्चा केली, असं संजय राऊत सांगत आले. मग त्यांनी प्रश्न विचारला शिंदे साहेबांना की मी जे सांगतोय, ते म्हणाले होय, मलाही तसंच म्हणाले, असं उत्तर शिंदेंनी दिलं. मिलिंद नार्वेकरांनीही त्याला दुजोरा दिला... अशी एकंदरित चर्चा होती. पण मग असं ठरलं की, आज महाविकास आघाडी बनलेली आहे, ती आपण टिकवली पाहीजे, वैगेरे वैगेरे..."

"माझ्या सांगण्याचा मतितार्थ असा की, ज्या अर्थी पंतप्रधान महोदय असं म्हणतात, मला माहित नाही, त्या म्हणण्याचा संदर्भात नेमका काय आहे? पण उद्धव ठाकरेंच्या मनात त्यावेळेला भाजप बद्दल ज्या भावना होत्या, त्या स्पष्ट होत्या, ज्या मला संजय राऊतांनी सांगितल्या. विद्यमान मुख्यमंत्री आणि मिलिंद नार्वेकर यांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं," असेही तटकरे म्हणाले. 

...ते प्रेम पुन्हा कधी उचंबळून येईल, सांगता येणार नाही -यावर, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की, उद्या परवा उद्धव ठाकरे पुन्हा भाजपकडे जाऊ शकतात, म्हणजेच महायुतीकडे येऊ शकतात? यावर बोलताना तटकरे म्हणाले, "महाविकास आघाडी सरकार बनण्यासाठी ज्या पद्धतीने प्रचंड मेहनत पवार साहेबांनी घेतली, सोनिया गांधी यांची परवानगी मिळवण्यासाठी त्यांनी जे राजकीय कौशल्य पणाला लावलं, ते एका भेटीत कसं विरघळलं, हे मला कळत नही. त्यामुळे ते प्रेम पुन्हा कधी उचंबळून येईल, या बद्दल मला फारसं सांगता येणार नाही." खरे तर, "ही (भाजप - शिवसेना) दीर्घ काळाची एनडीएची युती आहे. अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केलेली राष्ट्रीय लोकशाही आघाडी आहे. प्रकाश सिंद बादल यांचेही यात मोठे योगदान होते. त्यामुळे आता जुन्या आठवणी, जुने प्रेम...," असेही तटकरे म्हणाले.  

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४sunil tatkareसुनील तटकरेNarendra Modiनरेंद्र मोदीAjit Pawarअजित पवारSanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAshok Chavanअशोक चव्हाणNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा