शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

अधिका-यांनी फिरवली मंत्र्यांकडे पाठ!

By admin | Updated: April 6, 2015 23:22 IST

आयएएस अधिकारीच जर मंत्र्यांकडे पाठ फिरवत असतील तर बाकी अधिकाऱ्यांना आम्ही कोणत्या अधिकारात बोलायचे, सभागृह चालू असताना देखील

अतुल कुलकर्णी, मुंबईआयएएस अधिकारीच जर मंत्र्यांकडे पाठ फिरवत असतील तर बाकी अधिकाऱ्यांना आम्ही कोणत्या अधिकारात बोलायचे, सभागृह चालू असताना देखील अधिकाऱ्यांच्या गॅलऱ्या रिकाम्या असतात यावरुन सध्या वरिष्ठ मंत्र्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव सतीश गवई एकही दिवस मंत्र्यांना भेटायला गेले नाहीत की त्यांच्या विभागाचे ब्रिफींगही त्यांनी केलेले नाही. अधिवेशन चालू असताना अनेक विभागांचे अधिकारी त्यांच्या विभागाचे विषय आले तरीही अधिकाऱ्यांसाठीच्या गॅलरीत येऊन बसत नाहीत. यावर दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात जाहीरपणे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अर्थसंकल्पाच्या निमित्ताने विभागवार चर्चा होतात तेव्हा संपूर्ण राज्याचे चित्र आमदारांच्या बोलण्यातून उभे रहाते. त्याकडेच अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली तर राज्याच्या भावना त्यांना कळणार कशा? असेही वळसे म्हणाले होते.याबाबत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले, याबाबत आपण मुख्य सचिवांना याआधीच पत्र दिले होते. मात्र ही बाब सरकार गांभीर्याने घेईल. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी गवई आणि झेंडे यांच्यावरुन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गवई यांच्या कारभाराचे पुरावे तुम्हाला देतो,असेही मेहता यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे समजते. तर विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे नातेवाईक असल्यामुळे झेंडे यांची बदली म्हाडा चे उपाध्यक्ष म्हणून करण्यात आल्याचे राष्ट्रवादीतील काही नेत्यांचे म्हणणे आहे. शालेय शिक्षण विभागाचे सचिव म्हणून देबाशिष चक्रवर्ती यांची नेमणूक करण्यात आली होती; मात्र त्यांनी या पदावर जाण्यास नकार दिल्याने आता तेथे नंदकुमार यांची नेमणूक करण्यात आली आहे.