शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

आधी पुनर्वसन नंतरच टॅक्सी-वे

By admin | Updated: July 22, 2014 00:57 IST

आधी पुनर्वसन, नंतरच टॅक्सी-वे, अशी भूमिका घेत प्रकल्पग्रस्तांनी बोर्इंगच्या टॅक्सी-वेचे काम बंद पाडले आहे. आजच्या बाजारभावानुसार शेतीचा वाढीव मोबदला, १२.५ टक्के विकसित जमीन,

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची भूमिका : प्रकल्प समस्यांच्या कचाट्यातनागपूर : आधी पुनर्वसन, नंतरच टॅक्सी-वे, अशी भूमिका घेत प्रकल्पग्रस्तांनी बोर्इंगच्या टॅक्सी-वेचे काम बंद पाडले आहे. आजच्या बाजारभावानुसार शेतीचा वाढीव मोबदला, १२.५ टक्के विकसित जमीन, संपूर्ण गावाचे पुनर्वसन अशी ताठर भूमिका शिवणगावातील प्रकल्पग्रस्तांनी घेतल्याने बोर्इंगला जोडणारा टॅक्सी-वे पूर्णत्वास येणार वा नाही, यावर सध्या प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. छोट्या छोट्या समस्या सोडविण्यात एमएडीसीचे अधिकारी उत्सुक नसल्याने मिहानचा विकास संथगतीने सुरू आहे. निवडणुकीत सरकार बदलले तर नव्या सरकारची धोरणे मिहानला लागू होतील. कदाचित अधिकारीही बदलतील. पुन्हा टॅक्सी-वे आणि दुसऱ्या धावपट्टीचा प्रश्न नव्याने सोडविण्याच्या कसरती सुरू होतील. त्यामुळे समस्या ‘जैसे थे’ राहतील, अशी भीती प्रकल्पग्रस्तांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. एमएडीसीचे अभियंते चहांदे यांनी टॅक्सी-वेचे काम सुरू असल्याचे सांगितले. पण प्रस्तुत प्रतिनिधीने पाहणी केली असता काम बंद दिसले. टॅक्सी-वेच्या मधोमध शेतटॅक्सी-वेच्या मधोमध बापू डवरे यांचे २.२५ एकर शेत आहे. या शेताचा प्रश्न एमएडीसी अद्यापही सोडवू शकले नाही. भू-संपादनाचा अवॉर्ड, अवॉर्डची न केलेली उचल, हायकोर्टात याचिका, शासनाने बापू डवरेंच्या नावावर करून दिलेला सातबारा, संयुक्त मोजणी व बाजारभावानुसार चौरस फूट दराची त्यांची मागणी, एमएडीसीने शेत ताब्यात घेण्यासाठी केलेली बळजबरी, एमएडीसीचे अधिकारी व डवरे यांची ना. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेली चर्चा, जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे गडकरी यांचे डवरेंना आवाहन आदी घटनाक्रमांनी ‘टॅक्सी-वे’चा प्रश्न सध्या गाजत आहे. निवडणुकीच्या तोंडावर टॅक्सी-वे पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर बोर्इंगच्या विकासात अडथळा ठरलेले शेत बळजबरीने ताब्यात घेण्याची तयारी शासनाने चालविल्याची अधिकृत माहिती आहे. पुनर्वसनासाठी ४१.१३ कोटींचा निधीपुनर्वसनांतर्गत शिवणगावातील शेतकऱ्याची जागा व घर, नवीन गावठाणमधील जागा व घर आणि अतिक्रमणकर्त्याचे घर आदी अशा एकूण ११०४ घरांसाठी शासनाने ४१ कोटी १३ लाख आणि ३८ हजार रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी गावातील १७९ घरांसाठी शेतकऱ्यांनी जवळपास १४ कोटींची उचल केली आहे. अद्याप २७ कोटी ५० लाख रुपयांचे वाटप व्हायचे आहे. १२.५ टक्के विकसित जमीन सुमढाणा गावात सरकारने देऊ केली आहे, पण प्रकल्पग्रस्तांना शहरात जमीन हवी आहे. यावर तोडगा मुख्यमंत्रीच काढू शकेल, असा प्रकल्पग्रस्तांना विश्वास आहे. (प्रतिनिधी)पुनर्वसनाचा आराखडाच नाहीप्रकल्पग्रस्तांच्या मागण्या २००६ पासून प्रलंबित आहे. एमएडीसीचे अनेक अध्यक्ष अर्थात राज्याचे मुख्यमंत्री आणि उपाध्यक्ष बदलले पण परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. पुनर्वसनाचा आराखडा तयार नाही. अशा स्थितीत प्रकल्पग्रस्तांच्या ३-४ मागण्या शासनाने पूर्ण केल्या तरीही पुनर्वसनाअभावी वर्धा मार्गावरून शिवणगावला जोडणारा मार्ग टॅक्सी-वे मुळे बंद होईल. येथील नागरिकांना जयताळामार्गे शहरात यावे लागेल. शासनाच्या योजनेनुसार प्रकल्पग्रस्तांना चिचभुवन येथे विकसित प्लॉट देण्यात येणार आहे. शेतकरी ३ हजार चौ.फूट, बिगर शेतकरी १५०० चौ.फूट आणि अतिक्रमणकर्त्याला ३५० चौ.फूट जागा मिळेल. पण शासनाच्या अध्यादेशानुसार प्रकल्पग्रस्तांना तीनऐवजी चार हजार आणि दीडऐवजी दोन हजार चौ. फूट जागा हवी आहे. १५० एकर जागा पुनर्वसनासाठी ताब्यात घेतली आहे. केवळ ५० एकरवर पुनर्वसन अपेक्षित असून उर्वरित १०० एकर जागा व्यावसायिक दराने विकण्याची एमएडीसीची तयारी आहे. केवळ प्लॉट पाडून पुनर्वसन होणार नाही. सर्व सोयीसुविधांच्या उपलब्धतेनंतर गाव सोडण्याची प्रकल्पग्रस्तांची तयारी आहे. शासनाचे बांधकाम निकृष्ट असल्याचा आरोप करीत कलकुही, तेल्हारा, दहेगाव येथील प्रकल्पग्रस्त अद्यापही शासनाच्या शंकरपूर येथील घरांमध्ये निवासाला गेलेले नाही, हे उल्लेखनीय.