शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

घेतला पुढाकार... वाट्याला आला बहिष्कार!--लोकमत विशेष

By admin | Updated: February 19, 2015 23:44 IST

मरडमुऱ्यात मानापमान नाट्य : मंडळाच्या परवानगीशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल कुटुंबाला टाकले वाळीत

राजीव मुळये -सातारा -गावातील तरुणांच्या मंडळाला न विचारता गावच्या यात्रेत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल संबंधिताच्या कुटुंबाला गावाने वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार जावली तालुक्यातील मरडमुरे गावात घडल्याचे समोर आले आहे. या ‘गुन्ह्या’बद्दल या कुटुंबाला दंडही ठोठावण्यात आला असून, या कुटुंबाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे धाव घेतली आहे.वाळीत टाकण्यासारख्या अनिष्ट रूढीचे आपण बळी ठरलो असल्याची तक्रार तानाजी गणपत आढाव आणि त्यांच्या पत्नी रंजना यांनी केली आहे. दरवर्षी रामनवमीला गावची यात्रा असते. आढाव यांचा मुलगा सुनील याने गेल्या वर्षी यात्रेनिमित्त गावात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. गावचे सरपंच आणि शिवशक्ती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना न विचारता, परवानगी न घेता कार्यक्रम आयोजित केल्यामुळे वाद झाला होता. तेव्हापासूनच आपल्याला वाळीत टाकले असून, गावातील धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमास आपल्याला बोलावले जात नाही, असे आढाव दाम्पत्याचे म्हणणे आहे. मंडळाचे बहुतांश तरुण पदाधिकारी मुंबईत असतात. तेथूनच ते आढाव कुटुंबीयांना कोणत्याही कार्यक्रमास बोलावू नका, असे ग्रामस्थांना सांगत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.यात्रेत कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल २५ हजार रुपयांचा दंड भरावा लागेल, असे या कुटुंबाला सांगण्यात आले आणि तडजोड करून एक हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मात्र, दंड भरूनही हळदी-कुंकू समारंभ, लग्नसमारंभ किंवा कोणत्याही कार्यक्रमात सहभागी करून घेतले जात नाही, असे आढाव यांचे म्हणणे आहे. बचत गटाच्या बैठकीहून परतताना आपणास झालेल्या शिवीगाळीबाबत सरपंचांकडे तक्रार केल्यावर ‘मीटिंग घेऊ’ असे सांगितले गेले; मात्र मीटिंग झालीच नाही, अशी रंजना आढाव यांची तक्रार आहे. गावचे सरपंच भिकू जानू मर्ढेकर असा प्रकार घडल्याचे मान्य करतात; मात्र वादावादीतून हे घडल्याचे सांगताना गावकारभाऱ्यांपेक्षा मुंबईकरांचीच ‘सत्ता’ गावात चालते, याचीही नकळत कबुली देतात.‘जातपंचायतीला मूठमाती’ या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या उपक्रमात पुढाकार असणारे नाशिकचे कृष्णा चांदुगडे यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली. त्यांनी सातारच्या कार्यकर्त्यांना लक्ष घालण्यास सांगितले.त्यानुसार जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पोतदार, कार्यकर्ते शंकर कणसे, हातगेघरचे प्रताप सपकाळ आणि रहिमतपूरचे उत्तम धोनकर यांनी आढाव दाम्पत्याची भेट घेतली आणि गुरुवारपासून याप्रश्नी तोडगा काढण्याच्या प्रयत्नांना सुरुवातही केली. मरडमुरे या गावातील आढाव कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले आहे, हे मान्य; पण मरडमुरे गावातला कार्यक्रम मंडळाच्या कार्यकर्त्यांना विचारात न घेता आयोजित केल्यानंतर झालेल्या वादावादीतून हे घडले आहे. या कुटुंबाकडून १ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे ऐकावे लागते. त्यांची मीटिंग आणि निर्णयही मुंबईत होत असतात.- भिकू जानू मर्ढेकर,सरपंच, मरडमुरा, ता. जावली१८ महिने लोटले... वीण घट्टच!अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अग्रदूत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला शुक्रवारी १८ महिने पूर्ण होत आहेत. या काळात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत १०७ गुन्ह्यांची नोंद राज्यभरात झाली आहे. डॉक्टरांसारखाच हल्ला भाकप नेते गोविंद पानसरे यांच्यावर नुकताच झालेला असताना कार्यकर्ते मात्र भीती झुगारून, ध्येयाने प्रेरित होऊन विवेकाच्या रस्त्याने मार्गक्रमण करीतच आहेत. तसेच ‘अंनिस’ कार्यकर्त्यांचे राज्य पातळीवरील संघटन आणि त्यांच्यातील ताळमेळ याची प्रचीती मरडमुरा घटनेमुळे आली आहे.मरडमुरा येथील शिवशक्ती विकास मंडळाचे अध्यक्ष रवींद्र राजाराम मर्ढेकर आणि पदाधिकाऱ्यांशी आम्ही संपर्क साधला आहे. ते येत्या शनिवारी भेटायला येणार आहेत. गावचे पोलीस पाटील आणि सरपंचांच्याही संपर्कात आम्ही आहोत. लवकरच याप्रश्नी तोडगा निघेल आणि बहिष्कृत कुटुंबाला गावात आनंदाने राहता येईल, अशी खात्री आहे.- प्रशांत पोतदार, जिल्हा कार्याध्यक्ष,अंधश्रद्धा निर्मूलन समितीलोकमत विशेष